शहरं
Join us  
Trending Stories
1
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
2
'AB फॉर्म'चा झोल केला! भाजपच्या बंडखोर उमेदवाराने पक्षालाच गंडवलं, अमित साटमांचे थेट अधिकाऱ्यालाच पत्र
3
सिगरेट, पान मसाला, तंबाखू महागणार, नवीन कर आणि सेस लागू होणार; १ फेब्रुवारीपासून किंमत वाढणार? जाणून घ्या
4
आजपासून 'भारत टॅक्सी'ची सुरुवात; स्वस्त प्रवास अन् 'नो सर्ज प्रायसिंग'ने प्रवाशांना मिळणार दिलासा
5
दोन वर्षांत १४ लाख पाकिस्तान्यांनी देश सोडला! कारण काय?
6
१ वर्षासाठी एफडीमध्ये १ लाख रुपये गुंतवून तुम्हाला किती परतावा मिळेल? कोणत्या बँकेत किती रिटर्न, पाहा
7
ईडीने धनकुबेराच्या घरीच छापा मारला; रोकड सोडा, दागिनेच एवढ्या कोटींचे सापडले की... घबाड पाहून अधिकारीही अवाक्
8
दूधात मिसळलं नळाचं पाणी, तेच ठरलं विष; ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू, १० वर्षांनी झालेला मुलगा
9
नवे वर्ष २०२६: आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी या वर्षात करा 'हे' ५ उपाय!
10
मुंबईकरांना वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य सेवा मोफत; ‘आप’ने दिली गॅरंटी, जाहीरनामा केला प्रसिद्ध
11
"भाजपच्या सांगण्यावरुनच कृपाशंकर यांनी..."; उत्तर भारतीय महापौर करण्याच्या विधानावरुन संजय राऊत आक्रमक
12
Success Story: कपडे धुवून कोट्यधीश बनली 'ही' व्यक्ती, एकेकाळी रिक्षाचं भाडं देण्यासही नव्हते पैसे, कसा होता आजवरचा प्रवास
13
शिंदेसेनेच्या २, उद्धवसेना, काँग्रेसच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा अर्ज रद्द, ७१९ उमेदवार रिंगणात
14
विमानाचं तिकीट आता खिशाला परवडणार? विमान इंधनाच्या किमतीत मोठी कपात; पाहा काय आहेत नवीन दर?
15
तो काळ परत येणार नाही...! PCO चा बुथ ते 3G डोंगलचा वेग; स्मार्टफोन आणि ५जीच्या स्पीडने तुम्ही विसरलात का...?
16
प्रवाशांनो… २४ ट्रेनची वेळ बदलली, ६२ ट्रेनचा वेग वाढला; पुणे, मुंबईतील अनेक ट्रेनचा समावेश!
17
अर्ज छाननीचाही ‘रात्रीस खेळ चाले’; मुंबईत १६७ अर्ज बाद, भाईंदरमध्ये ६०० अर्ज वैध
18
'धुरंधर'च्या यशानंतरही रणवीर सिंह गायब? आता दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, 'पाजी खूप...'
19
बंडखोरी, नाराजी शमविण्यासाठी ठाकरे बंधूंचे नेते आता मैदानात
20
LPG Price Hike: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 22:10 IST

तात्काळ कार्यवाही करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश

धीरज परब, लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: दहिसर टोलनाका हटवून लांब महामार्गावर नेण्यास भाजपाने विरोध चालवला असताना सोमवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दहिसर टोलनाका येथे पाहणी करत विविध उपाययोजना सुचवत तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले. मुंबईकडे जाताना आणखी एक नवीन मार्गिका खुली करण्यासह टोलनाका मधील लोखंडी फ्रेम, बूथ, डिव्हायडर, खांब आदी तात्काळ काढून टाकण्यास तसेच टोल बूथ मागे पुढे करण्यास सांगितले असून त्यामुळे वाहतूक कोंडीतुन दिलासा मिळेल, असे सरनाईक म्हणाले.

दहिसर टोलनाका वरील वाहतूक कोंडी हि गंभीर समस्या बनली असून हि समस्या सोडवण्यासाठी मंत्री सरनाईक यांनी टोलनाकाच हटवून स्थलांतरित करण्याची मागणी केल्यावर तसे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने वरसावे किंवा खाडी पुलाच्या पलीकडे  महामार्गावर टोलनाका नेण्याचे पर्याय आले. परंतु मीरा भाईंदर भाजपा सह वनमंत्री गणेश नाईक यांनी देखील त्यास जाहीर विरोध दर्शवला आहे. त्यामुळे टोलनाका हटवण्याचा शिवसेना शिंदे गट आग्रह धरत असताना भाजपा कडून मात्र पर्यायी जागांवर टोलनाक्यास विरोध होत आहे. दहिसर टोलनाका मुदत २०२९ पर्यंत आहे त्यामुळे टोलनाकाच लवकर बंद करण्याची मागणी देखील होत आहे.

दरम्यान, सोमवारी मंत्री सरनाईक यांनी दहिसर टोलनाका येथील पाहणी केली. यावेळी मुंबई पोलीस व महापालिका, राज्य रस्ते विकास मंडळ, मीरा भाईंदर महापालिका व पोलीस, टोल ठेकेदार कंपनी आदींचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. मुंबई कडे जाणाऱ्या मार्गिकेवर टोलनाका लगत असलेला रस्ता डिव्हायडर काढून तो रस्ता वाहनांना खुला करा. तेथील रस्त्यात ठेवलेल्या क्रेन, बाकडे हटवून मोकळा करा असे आदेश सरनाईक यांनी दिले. या शिवाय वाणिज्य वाहनां साठी मोजके टोलबूथ ठेऊन बाकी सर्व बूथ काढणे, टोलनाकाचे जाहिरात फलक व फ्रेम, डिव्हायडर, लोखंडी खांब आदी सर्व काढून रस्ता मोकळा करा. 

मुंबईतून मीरा भाईंदर कडे येणाऱ्या मार्गावरील टोलनाका हा पुढे न्यावा असे मंत्री यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. त्यावेळी काही अधिकारी यांनी डिव्हायडर, होर्डिंग आदी काढतो, दोन आठवड्याची मुदत द्या सांगितले असता मंत्री सरनाईक संतप्त झाले. काढा हो, किती वर्ष अजून वाट बघणार असे खडसावले.  मंत्री सरनाईक यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्याशी व्हिडीओ कॉल वर चर्चा केली. याशिवाय पेणकरपाडा सिग्नल, पांडुरंगवाडी, मिरागाव भागातील महामार्गवर होणाऱ्या कोंडी बाबत अनेक सूचना देत कार्यवाही करण्यास मीरा भाईंदर महापालिका, वाहतूक पोलीस आदींना सांगितले आहे. टोलनाका हटवणार असे पुन्हा सांगतानाच तात्काळ नागरिकांना दिलासा देता यावा म्हणून ह्या उपाययोजना करत आहोत असे ते म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Pratap Sarnaik suggests measures to ease Dahisar toll plaza traffic.

Web Summary : Minister Sarnaik ordered immediate actions to reduce Dahisar toll plaza congestion, including opening lanes and removing obstructions. Despite opposition, he insists on relocating the toll to ease traffic for commuters.
टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईक