शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
3
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
4
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
5
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
6
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
7
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
9
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
10
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
11
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
12
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
13
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
14
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
15
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
16
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
17
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
18
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
19
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
20
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
Daily Top 2Weekly Top 5

दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 22:10 IST

तात्काळ कार्यवाही करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश

धीरज परब, लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: दहिसर टोलनाका हटवून लांब महामार्गावर नेण्यास भाजपाने विरोध चालवला असताना सोमवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दहिसर टोलनाका येथे पाहणी करत विविध उपाययोजना सुचवत तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले. मुंबईकडे जाताना आणखी एक नवीन मार्गिका खुली करण्यासह टोलनाका मधील लोखंडी फ्रेम, बूथ, डिव्हायडर, खांब आदी तात्काळ काढून टाकण्यास तसेच टोल बूथ मागे पुढे करण्यास सांगितले असून त्यामुळे वाहतूक कोंडीतुन दिलासा मिळेल, असे सरनाईक म्हणाले.

दहिसर टोलनाका वरील वाहतूक कोंडी हि गंभीर समस्या बनली असून हि समस्या सोडवण्यासाठी मंत्री सरनाईक यांनी टोलनाकाच हटवून स्थलांतरित करण्याची मागणी केल्यावर तसे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने वरसावे किंवा खाडी पुलाच्या पलीकडे  महामार्गावर टोलनाका नेण्याचे पर्याय आले. परंतु मीरा भाईंदर भाजपा सह वनमंत्री गणेश नाईक यांनी देखील त्यास जाहीर विरोध दर्शवला आहे. त्यामुळे टोलनाका हटवण्याचा शिवसेना शिंदे गट आग्रह धरत असताना भाजपा कडून मात्र पर्यायी जागांवर टोलनाक्यास विरोध होत आहे. दहिसर टोलनाका मुदत २०२९ पर्यंत आहे त्यामुळे टोलनाकाच लवकर बंद करण्याची मागणी देखील होत आहे.

दरम्यान, सोमवारी मंत्री सरनाईक यांनी दहिसर टोलनाका येथील पाहणी केली. यावेळी मुंबई पोलीस व महापालिका, राज्य रस्ते विकास मंडळ, मीरा भाईंदर महापालिका व पोलीस, टोल ठेकेदार कंपनी आदींचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. मुंबई कडे जाणाऱ्या मार्गिकेवर टोलनाका लगत असलेला रस्ता डिव्हायडर काढून तो रस्ता वाहनांना खुला करा. तेथील रस्त्यात ठेवलेल्या क्रेन, बाकडे हटवून मोकळा करा असे आदेश सरनाईक यांनी दिले. या शिवाय वाणिज्य वाहनां साठी मोजके टोलबूथ ठेऊन बाकी सर्व बूथ काढणे, टोलनाकाचे जाहिरात फलक व फ्रेम, डिव्हायडर, लोखंडी खांब आदी सर्व काढून रस्ता मोकळा करा. 

मुंबईतून मीरा भाईंदर कडे येणाऱ्या मार्गावरील टोलनाका हा पुढे न्यावा असे मंत्री यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. त्यावेळी काही अधिकारी यांनी डिव्हायडर, होर्डिंग आदी काढतो, दोन आठवड्याची मुदत द्या सांगितले असता मंत्री सरनाईक संतप्त झाले. काढा हो, किती वर्ष अजून वाट बघणार असे खडसावले.  मंत्री सरनाईक यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्याशी व्हिडीओ कॉल वर चर्चा केली. याशिवाय पेणकरपाडा सिग्नल, पांडुरंगवाडी, मिरागाव भागातील महामार्गवर होणाऱ्या कोंडी बाबत अनेक सूचना देत कार्यवाही करण्यास मीरा भाईंदर महापालिका, वाहतूक पोलीस आदींना सांगितले आहे. टोलनाका हटवणार असे पुन्हा सांगतानाच तात्काळ नागरिकांना दिलासा देता यावा म्हणून ह्या उपाययोजना करत आहोत असे ते म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Pratap Sarnaik suggests measures to ease Dahisar toll plaza traffic.

Web Summary : Minister Sarnaik ordered immediate actions to reduce Dahisar toll plaza congestion, including opening lanes and removing obstructions. Despite opposition, he insists on relocating the toll to ease traffic for commuters.
टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईक