शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

काल हाडं माेडण्याची, तर आज पर्याय देण्याची भाषा; जितेंद्र आव्हाडांनी शिंदेंना दिले आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 06:35 IST

ठाणे पूर्वेकडील कोपरी येथे राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याच्या कार्यालयाच्या शुभारंभासाठी सोमवारी संध्याकाळी ते आले होते.

ठाणे :  लोकांना पर्याय हवा असतो. जनता समर्थ पर्यायाच्या शोधात असते. आम्ही समर्थ पर्याय देऊ इच्छितो, असे  आव्हान गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात जाऊन दिले.

ठाणे पूर्वेकडील कोपरी येथे राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याच्या कार्यालयाच्या शुभारंभासाठी सोमवारी संध्याकाळी ते आले होते. या कार्यक्रमात त्यांनी हे विधान केल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. कारण काही दिवसांपासून शिवसेनेने मिशन कळवा सुरू केल्याने राष्ट्रवादीसह आव्हाड अवस्थ झाले होते.

मधल्या काळात आघाडीतदेखील पुन्हा बिघाडी झाल्याचे चित्र होते. तरीही नमते घेऊन शिवसेनेनेवर आम्ही कोणीही टीका करणार नाही, असे आव्हाड यांनीच सांगितले होते. परंतु, त्यानंतर माजी महापौर नरेश म्हस्के यांनी प्रभाग रचनेवरून पुन्हा कळवा, मुंब्रा आणि दिव्याच्या मुद्यावरून अप्रत्यक्षपणे का होईना आव्हाडांना थेट टार्गेट केले. त्यामुळे  आघाडीत पुन्हा ठिणगी पडली. त्यातूनच  शनिवारी कळव्यात झालेल्या जलकुंभाच्या लोकार्पणाच्या दिवशीदेखील आव्हाड यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर टीका करताना हाडे मोडण्याची भाषा केली.

त्यानंतर आव्हाड यांनी आता थेट कोपरी पाचपाखाडी या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात जाऊन अप्रत्यक्षरित्या त्यांनाच आव्हान दिल्याचे बोलले जात आहे. कार्यालय हे जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी असते. लोकांच्या सुख-दु:खात सहभागी होऊन त्यांच्या कुटुंबातील सदस्य होण्याची संधी आपणाला जनसंपर्क कार्यालयातून मिळते, असे आव्हाड यांनी सांगितले.  यावेळी शहराध्यक्ष आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, प्रदेश चिटणीस सुहास देसाई उपस्थित होते.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना