शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

'पळपुटेपणा केला नाही'; देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2021 18:40 IST

गोपनियतेचा भंग झाल्याने यापुढे त्रयस्थ यंत्रणोऐवजी म्हाडाच घेणार परीक्षा

ठाणे: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात म्हाडातर्फे घेण्यात येणाऱ्या विविध पदांवरील परीक्षेचा पेपर फूटीच्या आधीच तो रद्द केला आहे. परंतु, यापुढे असे गैरव्यवहार टाळण्यासाठी त्रयस्थ यंत्रणेऐवजी म्हाडातर्फेच विविध पदांवरील उमेदवारांच्या भरतीचे पेपर तयार करुन ते घेण्यात येतील. शिवाय, आताचे शुल्कही परत केले जाणार असून पुन्हा परीक्षेचे शुल्कही घेतले जाणार नाही, अशी महत्वपूर्ण घोषणा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी ठाण्यात केली.

ठाण्यातील आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ऐनवेळी परीक्षा रद्द करावी लागल्यामुळे परीक्षार्थीना जो मन:स्ताप झाला त्याबद्दल त्यांनी माफीही मागितली. शनिवारी म्हाडाचे अधिकारी आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील पेपरफुटीसाठी जे प्रयत्नशील होते, यामध्ये तिघे पकडले गेले. त्यातील दोघेजण हे आरोग्य विभागाच्या पेपर फूटीमध्येही सहभागी असल्याचा संशय असल्याचे ते म्हणाले. 

गृहनिर्माण विभागाच्या भरतीची परीक्षा घेण्याचे काम असलेल्या कंपनीच्या मालकालाही यात पकडले आहे. ज्यांनी मेहनत घेऊन परीक्षेची तयारी केली होती. त्यांना या कारवाईमुळे खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे. अशा प्रकारचा पेपर फोडण्याआधीच ही टोळी उद्ध्वस्त करणा:या पुणे पोलिसांचेही आव्हाड यांनी विशेष अभिनंदन केले. हे पेपर एकाच व्यक्तीला माहित होते, तीच व्यक्ती अशा पेपर फूटीसाठी योजना आखीत असेल तर विश्वास कोणावर ठेवायचा, असा संतापही त्यांनी व्यक्त केला. 

एकदा पेपर छपाईसाठी गेल्यानंतर तो तुमच्या हातात असता कामा नये, त्यामुळेच गोपनियतेचा भंग केल्याच्या कायद्याखाली ही कारवाई संबंधितांवर केल्याचे ते म्हणाले. यापुढे असे गैरप्रकार कसे रोखता येईल, यासाठीही विशेष लक्ष देण्यात येईल. आरोग्य किंवा गृहनिर्माण अशा सर्वच परीक्षांचे दलालही एकाच टोळीतील आहेत. ते कोणत्याही सरकारच्या वेळी कार्यरत असतात. 

ग्रामीण भागातील परीक्षार्थीनीही या संभाव्य पेपर फुटीच्या तक्रारी केल्यामुळेच आपणही परीक्षार्थी तसेच दलालांनाही असे गैरप्रकार करण्यापासून याआधीच सातत्याने आवाहन केले होते, असेही आव्हाड यावेळी म्हणाले. त्यामुळेच पेपर फूटीची कुणकुण लागताच हा पेपर विद्याथ्र्याच्या हितासाठी आपण रद्द केल्याचेही ते म्हणाले. असे गैरव्यवहार रोखण्यासाठी यापुढे म्हाडा पेपर तयार करुन या परीक्षा घेतील, असे ते म्हणाले.

पळपुटेपणा केला नाही- आव्हाड

पेपर फुटीच्या प्रकरणामुळे देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली. याच टीकेला उत्तर देतांना आव्हाड म्हणाले, सरकार आहे, म्हणूनच पेपर फूटीतील आरोपी पकडले गेले. विद्यार्थ्यांना सूचक इशाराही दिला. कुठेही पळपुटे केला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :mhadaम्हाडाJitendra Awhadजितेंद्र आव्हाडDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस