शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मंत्री अधिकाऱ्यांच्या घरी जातात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 00:31 IST

जितेंद्र आव्हाड : मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांना लगावला टोला

कल्याण : आघाडी सरकारच्या काळात एखादे काम असल्यास आमचे मंत्री अधिकाऱ्याला कार्यालयात बोलावून घेत होते. विद्यमान सरकारमधील मंत्री मात्र स्वत:च अधिकाऱ्यांच्या घरी जातात. हा चुकीचा पायंडा पाडला जात असल्याचा टोला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता लगावला.

कल्याण लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवणारे उमेदवार बाबाजी पाटील यांच्या प्रचारार्थ एका हॉटेलमध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस आणि घटक पक्षांचा मेळावा शनिवारी सायंकाळी आयोजित केला होता. या मेळाव्यास माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्यासह आमदार जगन्नाथ शिंदे आणि मान्यवर उपस्थित होते. केवळ आघाडी सरकारने केलेल्या विकासकामांचे उद्घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्याचा आरोप त्यांनी केला.

महायुतीच्या जाहीरनाम्यात मुंब्रा रेल्वेस्थानकाचा विकास केल्याचा उल्लेख आहे. वास्तविक, हा विकास कोणी केला, हे सगळ्यांना माहीत आहे. नशीब, त्यांनी कळवा रेल्वेस्थानकाचाही विकास केल्याचा उल्लेख जाहीरनाम्यात केला नाही, असेही ते म्हणाले.आव्हाड यांच्या भाषणाचा धागा पकडून माजी पालकमंत्री गणेश नाईक यांनी माझ्या कारकिर्दीत अधिकारीवर्गाला धाक होता. माझा दरारा होता. यांचा दरारा कुठे गेला, असा सवाल पालकमंत्री शिंदे यांचे नाव न घेता केला.

टॅग्स :thane-pcठाणेJitendra Awhadजितेंद्र आव्हाड