शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

अंबरनाथमध्ये म्हाडा उभारणार राज्यातील सर्वात माेठी टाऊनशिप- जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 07:13 IST

चिखलोली धरणाजवळील जागेचे सर्वेक्षण

अंबरनाथ : ‘अंबरनाथ शहरात म्हाडाकडून राज्यातील सर्वांत मोठी टाऊनशिप उभारण्यात येणार आहे. यासाठी चिखलोली धरणाला लागून असलेल्या २०० एकर जागेचे गुरुवारी ‘म्हाडा’च्या अधिकाऱ्यांकडून सर्वेक्षण करण्यात आले,’ अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

मुंबई आणि उपनगर परिसराची लोकसंख्या सध्या झपाट्याने वाढत आहे. मात्र, हा वाढता भार मुंबईला पेलवणारा नाही. त्यात सध्या डोंबिवलीपुढे, म्हणजे फक्त अंबरनाथ आणि बदलापूरमध्येच मोकळ्या जागा शिल्लक आहेत. त्यामुळे या परिसरात म्हाडाकडून मेगा टाऊनशिप उभारण्यात येणार असल्याचे गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनी सांगितले. ही टाऊनशिप आजवर म्हाडाने उभारलेल्या टाऊनशिपपैकी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी टाऊनशिप असेल, असे आव्हाड म्हणाले.

अंबरनाथ शहरात आतापर्यंत ‘म्हाडा’चा एकही प्रकल्प उभारण्यात आलेला नाही. मात्र, या परिसरास जी कनेक्टिव्हिटी आहे, त्यामुळे या भागाला सध्या अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळेच चिखलोली धरणाच्या बाजूला असलेली २०० एकर जागा खरेदी करण्याचा ‘म्हाडा’चा विचार आहे. येथे मोठी टाऊनशिप उभारली जाणार असल्याचे आव्हाड म्हणाले. 

जपानच्या सरकारी कंपनीची मदत घेणार

या सर्वांत मोठ्या टाऊनशिपसाठी जपानच्या शासकीय कंपनीसोबत बोलणी सुरू असल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले. आपल्या कारकिर्दीत एखादा मोठा प्रकल्प व्हावा, अशी प्रत्येक मंत्र्याची इच्छा असते. त्यामुळे हा प्रकल्प झाला, तर एक वेगळा आनंद मिळणार असून, शरद पवार यांचा विकासाचा दृष्टिकोन येथे कामाला येईल, असे आव्हाड म्हणाले. अंबरनाथमध्ये ही टाऊनशिप झाली, तर ती शहराच्या विकासासाठी महत्त्वाची ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :ambernathअंबरनाथthaneठाणे