शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोसारखी लोकल ठाण्यापर्यंतच धावणार?

By admin | Updated: December 9, 2015 00:40 IST

वाढत्या गर्दीमुळे होत असलेले लोकल अपघात रोखण्यासाठी मध्य रेल्वेने येत्या फेब्रुवारीपासून मुंबई ते ठाणे दरम्यान मेट्रोसारखी कमी प्रवासी बसू शकतील व अधिक प्रवासी उभे राहतील

अनिकेत घमंडी,  डोंबिवलीवाढत्या गर्दीमुळे होत असलेले लोकल अपघात रोखण्यासाठी मध्य रेल्वेने येत्या फेब्रुवारीपासून मुंबई ते ठाणे दरम्यान मेट्रोसारखी कमी प्रवासी बसू शकतील व अधिक प्रवासी उभे राहतील, अशी आसन व्यवस्था असलेली लोकल सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ठाणे जिल्ह्यातील सुमारे २० लाख लोकल प्रवासी या सुविधेपासून वंचित राहणार आहेत. फेब्रुवारीत मेट्रोच्या धर्तीवरील लोकलच्या आठ फेऱ्या सुरु होतील. अशाच लोकल हार्बर आणि ट्रान्स हार्बरवरही धावणार आहेत. हार्बर रेल्वेवर मध्य रेल्वे इतक्याच नव्या आठ फेऱ्या होतील. तर ट्रान्स हार्बरवर नव्या लोकलच्या २० फेऱ्या सुरु होणार आहेत. पुढच्या दोन महिन्यात मुंबई शहर, ठाणे आणि नवी मुंबईतील लोकल प्रवाशांना या नव्या लोकलची सेवा मिळेल, असं रेल्वेचं म्हणणं आहे.गर्दीमुळे लोकलमधून पडून या वर्षात मुंबईत नोव्हेंबरपर्यंत एकूण ६९७ प्रवाशांचा मृत्यू झाला. यापैकी ४५३ जणांचा मृत्यू मध्य रेल्वेवर झाला आहे. अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर लोकलमधील अपघात रोखण्यासाठी आणि गर्दीला तोंड देण्यासाठी नवी आसन व्यवस्था असलेल्या लोकल गाड्या सुरू कराव्यात ज्यामध्ये डब्यांमध्ये उभे राहण्यासाठी जास्तीत जास्त जागा असेल, अशा सूचना तज्ज्ञांनी यापूर्वीच केल्या होत्या. पण ती लालफितीच्या कारभारात अडकल्याने विलंब झाला. शिवाय येणारी योजना प्रायोगिक तत्त्वावर असेल आणि तीही केवळ ठाणे स्थानकापर्यंत धावणाऱ्या गाड्यांमध्ये राबवली जाणार आहे.दाटीवाटीने प्रवास करतात. यापैकी १०४ जण बसलेले असतात तर बाकीचे उभ्याने प्रवास करतात. पण नव्या मेट्रो सारख्या लोकलच्या डब्यामध्ये बसण्यासाठी फक्त ६६ सीट असतील आणि उर्वरीत अध्यार्हून अधिक जागा प्रवाशांना उभं राहण्यासाठी मिळेल. सर्व परवानग्यानंतर या लोकल दाखल होती, त्यानंतरच फास्ट लोकलचे थांबे वाढवण्याचा रेल्वेचा विचार आहे. सध्या ठाण्याच्या पुढील कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली व कल्याण स्थानकावर बहुसंख्य प्रवासी सकाळी गाडीत प्रवेश करताना झगडतात. त्यातील काही पडतात. ठाण्यापर्यंत जाण्याकरिता ठाणे लोकलचा पर्याय असताना त्यापुढे गर्दीच्या गाडीतून जाणाऱ्या व तेथून येणाऱ्या प्रवाशांकरिता निदान आतमध्ये सुरक्षितपणे उभे राहण्याची सुुविधा हवी, असे प्रवाशांना वाटते. सीएसटी ते कल्याण दरम्यान फास्ट लोकल सध्या भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, भांडूप, मुलुंड, ठाणे आणि डोंबिवली या रेल्वे स्थानकांवर थांबतात. परंतु आगामी काळात सर्व फास्ट लोकल यापुढे विक्रोळी आणि परळ स्थानकांवरही थांबवण्याचा रेल्वेचा विचार आहे. यामुळे आगामी काळात समस्यांवर तातडीने तोडगा काढता यावा असे रेल्वेचे प्रयत्न आहेत.