शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

मेट्रो पाचची धाव उल्हासनगरपर्यंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2020 05:59 IST

डीएमआरसीकडून चाचपणी : काही दिवसांत सुरू होणार सर्वेक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो पाचच्या मंजूर मार्गात बदल करण्याच्या हालचाली एमएमआरडीएकडून सुरू असताना आता हा मार्ग उल्हासनगरपर्यंत विस्तारित करण्याचे प्रयत्न दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (डीएमआरसी) सुरू केले आहेत. या कामासाठी भौगोलिक सर्वेक्षण येत्या काही दिवसांत सुरू होईल.ठाणे-कल्याण-भिवंडी या २४.९ किमी लांबीच्या मेट्रो प्रकल्पाचे काम एमएमआरडीएने हाती घेतले आहे. ते आॅक्टोबर, २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या कामासाठी ८,४१६ कोटी रुपये खर्च केले जातील. २०१३ सालापर्यंत या मार्गावरून दररोज सुमारे तीन लाख प्रवासी प्रवास करतील. प्रकल्पाचा वित्तीय अंतर्गत परतावा दर मालमत्ता विकासासह (एफआयआयआर) ६.०२ टक्के इतका असेल. तर, आर्थिक अंतर्गत परतावा (ईआयआरआर) १७.०९ टक्के असेल, असे सांगितले जात आहे.या मार्गिकेच्या ठाणे-भिवंडी मार्गावरील कामास सुरुवात झाली आहे. मात्र, भिवंडी-कल्याण परिसरातील मार्ग बदलण्यासाठी अनेक निवेदने एमएमआरडीएकडे देण्यात आली आहेत. तसेच, या बदलांसाठी स्थानिक नेतेही आग्रही आहेत. त्यामुळे भिवंडी-कल्याण या टप्प्यातील मार्गिका अंतिम झाल्यानंतर त्या स्थापत्य कामाच्या निविदा काढल्या जाणार असल्याची माहिती एमएमआरडीएतील अधिकाऱ्यांनी दिली.एमएमआरडीएकडून मार्ग बदलांच्या हालचाली सुरू असताना या मार्गाच्या विस्ताराचे नियोजन डीएमआरसीकडून केले जात आहे. राजीव गांधी चौक ते टेमघर आणि दुर्गाडी चौक ते उल्हासनगर असा १५ किमी विस्तार करण्याचे नियोजन आहे. या सेवेमुळे नागरिकांना निश्चितच फायदा होईल असे सांगितले.

... त्यानंतरच ठरणार पुढील दिशामेट्रो पाचचा उल्हासनगरपर्यंत विस्तार करण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकांच्या प्रचार सभांमध्ये केली होती. डीएमआरसीने सर्वेक्षणाच्या कामासाठी निविदा काढून त्याला मूर्त रूप देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. भौगोलिक सर्वेक्षणात या मार्गिकेची सुसाध्यता स्पष्ट झाल्यानंतर त्याची व्यवहार्यता तपासणी होईल आणि त्यानंतर पुढील दिशा ठरवली जाणार आहे.

टॅग्स :Metroमेट्रो