शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

ठाण्यात १.४० लाख नळजोडण्यांना मीटर; १३१ कोटींचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 00:08 IST

पाणीगळती आणि पाणीचोरी रोखण्यासाठी तसेच पाण्याच्या बिलांची योग्य प्रकारे वसुली व्हावी, या उद्देशाने प्रथम हायटेक स्वरूपाचे परदेशी तंत्रज्ञानाचे मीटर बसवण्याचे पालिकेने निश्चित केले होते

ठाणे : आधी हायटेक, नंतर स्मार्ट आणि त्यानंतर पुन्हा सेमी ऑटोमेटिक मीटर अशा पद्धतीने मागील १२ वर्षे पालिकेने नळजोडण्यांना मीटर बसवण्यासाठी विविध निविदा काढल्या होत्या. परंतु, अखेर स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आता हे मीटर बसवण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार, तब्बल एक लाख ४० हजार जोडण्यांवर ते बसवले जाणार असून आतापर्यंत पाच हजारांहून अधिक मीटर बसवले गेले आहेत. यासाठी १३१ कोटींचा खर्च केला जाणार आहे. स्मार्ट मीटरमुळे आता ठाणेकरांना खऱ्या अर्थाने पाण्याचे महत्त्व समजणार आहे. या उपाययोजनेमुळे पाणीगळती आणि चोरीस अंकुश बसणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे.

पाणीगळती आणि पाणीचोरी रोखण्यासाठी तसेच पाण्याच्या बिलांची योग्य प्रकारे वसुली व्हावी, या उद्देशाने प्रथम हायटेक स्वरूपाचे परदेशी तंत्रज्ञानाचे मीटर बसवण्याचे पालिकेने निश्चित केले होते. यासाठी ३५ कोटींचा निधी खर्च केला जाणार होता. परंतु, तत्कालीन आयुक्त आर.ए. राजीव या योजनेविषयी साशंक होते. नंतर, आलेले आयुक्त असीम गुप्ता यांनी ही योजनाच गुंडाळली होती. दरम्यान, पुन्हा एआरएमचे सेमी आॅटोमेटिक मीटर बसवण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला होता. त्यानुसार, या कामासाठीच्या निविदा मागील वर्षी मागवून पीपीपी तत्त्वावर हा निर्णय राबवण्याचे ठरले होते. परंतु, या योजनेच्या निविदेला वारंवार मुदतवाढ देऊनही प्रतिसाद मिळालेला नाही. अखेर, या कामासाठी आता स्मार्ट सिटीतून १३१ कोटींचा खर्च केला जाणार आहे. त्यानुसार, मागील काही दोन ते महिन्यांपासून शहरातील विविध भागांत अशा प्रकारे स्मार्ट मीटर बसवण्याच्या कामाला निविदा मागवून सुरुवात झाली आहे. त्यानुसार, आतापर्यंत पाच हजारांहून अधिक मीटर बसवले आहेत. या कामासाठी स्मार्ट सिटीअंतर्गत ९३ कोटींचा खर्च केला जात असून पुढील निगा आणि देखभालीसाठीचा पाच वर्षांचा खर्च हा पालिका करणार आहे. यासाठी खाजगी एजन्सीची नेमणूक केली आहे. मीटर लावल्यानंतर लिटरप्रमाणे कर आकारणी केली जाईल. त्यामुळे पाण्याचे बील महागण्याची शक्यता आहे. परंतू पाणी जपून वापरल्यास नागरिकांचा फायदाच होणार आहे.

असे आहेत स्मार्ट मीटरया स्मार्ट वॉटर मीटरमध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड करता येणार नाही. डिजिटल स्वरूपाचे हे मीटर असून ते अनब्रेकेबल आहेत. शिवाय, याचे रीडिंगसुद्धा घरोघरी न जाता एकच व्यक्ती एखाद्या भागात उभी राहिल्यास ब्ल्यूटूथच्या साहाय्याने त्याच्या हातात असलेल्या रीडिंग मशीनमध्ये त्या भागातील सुमारे १०० मीटरचे रीडिंग एकाच वेळेस घेऊ शकणार आहे.

ग्राहकांना होणार फायदाया मीटरमुळे ग्राहक जेवढे पाणी वापरणार आहेत, तेवढेच बिल त्यांना भरावे लागणार आहे. पूर्वी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून झोपडपट्टी भागासाठी १३० रुपये याप्रमाणे बिल आकारले जात होते. त्यानुसार, कुटुंबातील पाच व्यक्तींनुसार ४५० लीटर पाणी हे दरवर्षी वापरले जाते, असा अंदाज आहे. त्यानुसार, महिन्याचे बिल त्या कुटुंबासाठी मीटरप्रमाणे १०० ते ११० पर्यंत येऊ शकणार आहे. परंतु, जास्त पाणी वापरल्यास जास्तीचे बिल येणार आहे.

या दरानुसार येणार बिलपूर्वी इमारतींसाठी महिना १८० रुपये आणि बैठ्या चाळींसाठी १३० च्या आसपास पाणीआकार घेतला जात होता. परंतु, आता स्मार्ट मीटरचा दर हा पालिकेने निश्चित केला आहे. शून्य ते १५ हजार लीटरपर्यंत ७.५० रुपये, १५ हजार ते २० हजारपर्यंत १० रुपये, २० हजार ते २४ हजार पर्यंत १५ रुपये आणि २४ हजारांच्या पुढे २० रुपये असा दर हजार लीटरमागे आकारला जाणार आहे.