शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

पोलीस आयुक्तालयाकडून मुख्याध्यापक आणि प्राचार्यांच्या बैठकीचे आयोजन

By धीरज परब | Updated: February 7, 2024 19:54 IST

सायबर क्राईम , तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट , अमली पदार्थ बाबत केले मार्गदर्शन 

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड -  सोशल मीडियावर पोस्ट - कमेंट करताना सामाजिक बांधिलकी जपत शिष्टाचार पाळा असे आवाहन मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त मधुकर पांडेय यांनी प्राचार्य व मुख्याध्यापकांना केले आहे . 

मीरा भाईंदर मधील दोन गटातील वादातून निर्माण झालेला तणाव , वाढते सायबर गुन्हे आदींच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयातील संवाद सभागृहात मीरा भाईंदर परिमंडळ १ मधील प्राचार्य व मुख्याध्यापक यांची बैठक घेण्यात आली . या बैठकीला पोलीस आयुक्त मधुकर पांडेय सह अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १ चे प्रकाश गायकवाड तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी व शहरातील १३० पेक्षा अधिक शाळा व महाविद्यालयातील प्राचार्य, मुख्याध्यापक उपस्थित होते.

यावेळी आयुक्तांनी मार्गदर्शन करताना सांगितले कि , सोशल मिडिया वर पोस्ट करताना शिष्टाचाराचे पालन करा. कोणाचीही भावना दुखावणार नाही , जाती - धर्मात तेढ होणार नाही , कायदा व सुव्यवस्था आपल्या पोस्ट मुळे बिघडणार नाही याबाबत खबरदारी घेवुन पोस्ट करा .  सायबर क्राईम बाबत माहीती देताना केवायसी अपडेट करताना, क्रेडीट कार्ड पॉइट अपडेट, विज बिल भरणा , ऑनलाईन शॉपींग संदर्भातील सायबर गुन्हे घडण्या बद्दल माहिती देण्यात आली .  फसव्या एसएमएस पासुन सावधान राहणे, टेलीग्राम, व्हॉटसप वर प्राप्त अनोळखी लिंक किंवा अॅप डाउनलोड करु नका . 

अंमली पदार्थाचे शरीरावर होणारे दुष्परिणाम सांगतानाच जर  महाविद्यालये व शाळांच्या परिसरात अंमली पदार्थ विक्री , सेवन आढळून आल्यास तात्काळ पोलिसांना कळवा . प्रत्येक पोलीस ठाणे निहाय एक पथक तयार करून ते पथक पोलीस ठाणे हद्दीतील शाळा, महाविद्यालय यांना भेट देईल . विद्यार्थी यांना सायबर क्राईम, अंमली पदार्थ, मोबाईल वापराबाबतचे दुष्परिणाम, सोशल मिडियावर जाती व धर्मा बाबत तेढ निर्माण होणाऱ्या पोस्ट प्रसारित न करणे , मुलींना गुड टच आणि बॅड टच बाबत माहिती देणे आदी कार्य हे पथक करणार आहे . 

बैठकीतील माहिती तुमच्या तुमच्या शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पण द्या असे आवाहन पोलीस आयुक्तांनी उपस्थित प्राचार्य आणि मुख्याध्यापक यांना केले . 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकPoliceपोलिस