शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

शुक्रवारचा शटडाऊन पुढे ढकलल्याने मीरा भाईंदरकरांना दिलासा

By धीरज परब | Updated: May 30, 2024 20:59 IST

सलग दोन शटडाऊन मुळे पाणी टंचाईने धास्तावलेल्या मीरा भाईंदरकरांना दिलासा मिळाला आहे.

मीरारोड : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मार्फत उद्या शुक्रवार ३१ मे रोजी घेण्यात येणारा २४ तासांचा  शटडाऊन स्थगित करून तो ५ जून घेण्यात येणार आहे . त्यामुळे सलग दोन शटडाऊन मुळे पाणी टंचाईने धास्तावलेल्या मीरा भाईंदरकरांना दिलासा मिळाला आहे. 

मीरा भाईंदर शहराला स्टेम प्राधिकरण व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (प्राधिकरणाकडून पाणी पुरवठा करण्यात येतो. परंतु आधीच अपुरे पाणी त्यात मीरा भाईंदर हे पाणी पुरवठा धरण पासून शेवटच्या टोकाला असल्याने नागरिकांना नेहमीच पाणी टंचाई सोसावी लागते.

लोकसभा निवडणुकीचे मतदान संपताच शटडाऊन जाहीर करण्यात आला होता . परंतु नंतर तो पुढे ढकलण्यात आला .  पावसाळ्यापुर्वी दैनंदिन देखभाल व दुरुस्तीची कामे करून घेणेकरीता  स्टेम प्राधिकरणा मार्फत होणारा पाणी पुरवठा  बुधवार २९ मे रोजी सकाळी  ९ ते गुरुवार ३० मे रोजी सकाळी ९ वाजेपर्यत २४ तासां करीता बंद करण्यात आला . 

त्या पाठोपाठ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या  बारवी येथे मान्सुन पुर्व देखभाल दुरुस्तीची कामे करणेकरीता गुरुवार ३० मे रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते शुक्रवारी ३१ मे रोजी रात्री १२ वाजेपर्यत एकूण २४ तासांकरीता पाणी पुरवठा बंद राहणार होता . सलग दोन शटडाऊन मुळे शहरात पाणी टंचाई बिकट झाली असती.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरwater shortageपाणीकपातmira roadमीरा रोड