शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या पुनर्विचाराचे मेधा पाटकर यांनी केले स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 23:49 IST

विस्थापितांच्या पुनर्वसनाकडे वेधले लक्ष : मोदीवादी अर्थव्यवस्थेला केला विरोध

डोंबिवली : अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाकरिता आदिवासींची ८० टक्के जमीन संपादित केली जाणार असून राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने या प्रकल्पाचा पुनर्विचार करण्याच्या केलेल्या घोषणेचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व पर्यावरणवादी चळवळीच्या अध्वर्यू मेधा पाटकर यांनी रविवारी स्वागत केले.

आगरी युथ फोरमने आयोजित केलेल्या आगरी महोत्सवानिमित्त आयोजित परिसंवादात सहभाग घेण्याकरिता पाटकर उपस्थित राहिल्या होत्या. त्यावेळी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये त्यांनी वरील मत व्यक्त केले. आगरी युथ फोरमचे गुलाब वझे हे यावेळी उपस्थित होते.पाटकर म्हणाल्या की, बुलेट ट्रेनची गरज आहे का, हाच मुळात प्रश्न आहे. या प्रकल्पाकरिता ज्या आदिवासींची जमीन संपादित केली जाणार आहे, त्यांचे पुनर्वसन कसे केले जाणार, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सरकारचा या प्र्रकल्पाच्या फेरविचाराचा निर्णय दिलासादायक आहे.

सध्या देशात सुरू असलेल्या गांधी विरुद्ध सावरकर वादाबद्दल विचारले असता पाटकर म्हणाल्या की, गांधी विरुद्ध सावरकर, गांधी विरुद्ध भगतसिंग, गांधी विरुद्ध आंबेडकर या विषयांवरील वादांपेक्षा देशाच्या हिताकरिता गांधीवादी अर्थव्यवस्था हवी की मोदीवादी अर्थव्यवस्था हवी, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. सर्वच राजकीय पक्षांनी शोषितांच्या, प्रकल्पबाधितांच्या प्रश्नांवर त्यांच्या बाजूने उभे राहणे गरजेचे आहे. हैदराबाद येथील बलात्काराच्या घटनेकडे लक्ष वेधले असता त्या म्हणाल्या की, स्त्री ही अबला नाही. मात्र, अशा अत्याचारांच्या प्रकरणांत तिचा प्रतिकार हिंस्र असू शकत नाही. स्त्रीने हिंसक प्रतिकार करायचे ठरवले तर पुरुषप्रधान व्यवस्थाच काय समाजच शिल्लक राहणार नाही. जन्मदात्या आईला लक्ष्य करण्यापर्यंत काहींची मजल गेली आहे. अशा हिंसेला हिंसेने नव्हे तर अहिंसात्मक, सत्याग्रही पद्धतीनेच उत्तर द्यायला हवे, असे सांगत हैदराबाद एन्काऊंटरचा निषेध केला.