शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

राजकीय प्रसिद्धीसाठी महापौर मॅरेथॉनचा खटाटोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 02:03 IST

- धीरज परब, मीरा-भाईंदर जानेवारीमध्ये महापौर चषकाच्या नावाखाली तब्बल एक कोटीपेक्षा जास्त रुपये महापालिकेच्या तिजोरीतून खर्च केले गेले. त्यातून ...

- धीरज परब, मीरा-भाईंदरजानेवारीमध्ये महापौर चषकाच्या नावाखाली तब्बल एक कोटीपेक्षा जास्त रुपये महापालिकेच्या तिजोरीतून खर्च केले गेले. त्यातून खेळ आणि होतकरू खेळाडूंचे किती कल्याण झाले, हे सांगता येत नसले तरी त्या नावाखाली लोकप्रतिनिधींनी आपली राजकीय प्रसिद्धी मात्र पुरेपूर करून घेतली. अगदी मैदान व स्पर्धेची ठिकाणे महापौरांच्या छायाचित्रांच्या फलकांनी फुलून गेली होती. आता महापालिकेच्या माध्यमातून महापौर मॅरेथॉनची टूम सत्ताधाऱ्यांनी काढली आहे. यासाठी ६५ लाखांच्या खर्चाची तयारी चालवली आहे. जाहिरातबाजी स्पर्धेसाठी आहे की महापौरांसाठी, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.पालिकेच्या खर्चातून आपली राजकीय चमकोगिरी करून घेण्याची लागणच सध्या सत्ताधाऱ्यांना झाली असून महापालिका प्रशासन केवळ जी हुजुरी करत आहे. बाकी साहित्य आदी खरेदी व खर्चामध्ये कोणकोण हात धुऊन घेतात, हा मुद्दा पुन्हा वेगळाच. शहरातील होतकरू खेळाडूंसाठी खरंच कळकळ असती आणि खेळाबद्दल प्रेम असते तर अशी उधळपट्टी करण्यापेक्षा चांगल्या प्रशिक्षणासह आवश्यक खेळाचे साहित्य, मैदान, तरणतलाव आदींची सोय करून दिली असती. महापालिकासेवेत मान्यवर खेळाडूंना सन्मानाने रुजू करून घेत त्यांचा अनुभव, प्रशिक्षणाचा फायदा शहरातील होतकरूंना करून दिला असता. पण, यासाठी प्रामाणिकपणा आणि मनातून तळमळ असावी लागते.जानेवारीत महापौर चषकाचे आयोजन सत्ताधारी भाजपने महापालिकेच्या माध्यमातून केले होते. त्याआधी डिसेंबर महिन्यात मुख्यमंत्री चषक झाला. मुख्यमंत्री चषकासाठी महापालिकेच्या ताब्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान महिनाभर अडकवून ठेवले. मंडप आणि जाहिरात फलकांचे तब्बल आठ लाखांच्या घरातील शुल्क अजूनही भाजपने महापालिकेत भरलेले नाही. मॅरेथॉनसाठी केवळ २३ लाखांची तरतूद शिल्लक आहे. ही स्पर्धा १८ आॅगस्टला होणार असली, तरी गेल्या महिन्यापासूनच वाद आणि टीकेच्या भोवºयात सापडली आहे.विकासकामांसाठी महापालिकेच्या तिजोरीत पैसा नाही, असे प्रशासन सांगते. एकीकडे विकासकामांना पैसा नाही, कर्जाचा वाढता डोंगर, नागरिकांवर करवाढीचा बोजा, त्यात कार्यक्रमांच्या आड मात्र राजकीय प्रसिद्धीसाठी नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी करायची, हे नागरिकांनी कुठपर्यंत सहन करायचे? मॅरेथॉन स्पर्धेसाठीही शहरभर जाहिरात फलक लावले आहेत. आणखी फलक लावले जाणार आहेत. त्यासाठी काही लाखांचा खर्च होणार आहे. या सर्व फलकांवर महापौरांची छायाचित्रे असून अगदी नमुना अर्जही सुटलेला नाही.खानपानापासून विविध व्यवस्थेच्या आड पालिकेच्या तिजोरीची लयलूट केली जाणार आहे. नियोजन, साहित्यपुरवठा आदींचे कंत्राट एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला दिले आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शाळा- महाविद्यालयांमधून शुल्क भरण्यास सक्ती केली जात आहे. २३ लाखांची तरतूद शिल्लक असल्याचे सांगितले जात असल्याने उर्वरित ४२ लाख कुठून आणणार, हा मोठा प्रश्न आहे. सत्ताधाºयांनी देणगीदारांमार्फत पैसा उभारण्याचे दावे केले असले, तरी तेवढे पैसे उभारले जातील, याची खात्री मात्र सत्ताधारी आणि प्रशासन दोन्ही द्यायला तयार नाहीत.विकासकामांसाठी पैसा नाही, अशी ओरड करत दुसºया बाजूला मॅरेथॉन स्पर्धा भरवून करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी करण्याचे काम येथील लोकप्रतिनिधी करत आहेत. त्याला प्रशासनाचीही साथ असल्याने कुणीही ब्र काढायला तयार नाही. अर्थात, मीरा-भार्इंदर पालिकेत हे काही नवीन नाही. यासाठी नागरिकांनी रस्त्यावर उतरून सत्ताधाºयांना याचा जाब विचारणे गरजेचे झाले आहे.आधी चांगल्या सुविधा पुरवाप्रशासनाने आधी शहरातील मैदाने सुधारावीत. भाड्याने दिलेल्या क्रीडासंकुलात विद्यार्थी, खेळाडू, ज्येष्ठ नागरिक तसेच होतकरूंना नि:शुल्क वा नाममात्र शुल्कात प्रोत्साहन द्यावे. महापालिकेमार्फतच दर्जेदार सुविधा, साहित्यासह प्रशिक्षकांमार्फत प्रशिक्षण द्यावे. आज शहरातील अनेक लहानमोठी मुले चांगली सुविधा, प्रशिक्षण नाही म्हणून अन्य शहरांत लोकलचा जीवघेणा प्रवास करत आपला खेळ जोपासत आहेत. 

टॅग्स :Marathonमॅरेथॉनthaneठाणे