शहरं
Join us  
Trending Stories
1
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
2
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
3
“मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राहुल गांधींसोबत एकत्र यायला अडचण नाही”: प्रकाश आंबेडकर
4
नोकरीच्या संधी कमी होणार? देशातील उत्पादन वाढ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; 'या' कारणांचा थेट फटका
5
1 लाख 34 हजार रुपयांचा iphone 17 Pro Max बनवण्यासाठी किती खर्च येतो? आकडे ऐकून चक्रावून जाल...
6
दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो"
7
Dussehra 2025: दसऱ्याच्या मुहूर्तावर ११ लवंगांचा 'हा' विधी, दहन करेल तुमच्या आर्थिक अडचणी!
8
दिवाळीनंतर लगेच निवडणुकीचा धुराळा! राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर
9
“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ
10
समस्त बॉलिवूड हादरले! पैशांची तंगी होती, हा अभिनेता बनला ड्रग स्मगलर; ४० कोटींच्या ड्रगसह पकडले तेव्हा बिंग फुटले...
11
किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये
12
८ दिवसांच्या घसरणीला ब्रेक! RBI च्या घोषणेनंतर बाजारात जोरदार उसळी! टॉप गेनर्स-लूजर्स पाहा
13
भारतावर टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पवर काय वेळ आली, कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसे नाहीत; शटडाऊनची नामुष्की
14
जिंकलंस मित्रा! कॉन्स्टेबलने IPS बनून घेतला अपमानाचा बदला; बॅक टू बॅक क्रॅक केली UPSC
15
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
16
गुरुवारी दसरा २०२५: ‘अशी’ करा स्वामी सेवा, वर्षभर पुण्य लाभेल; देवी लक्ष्मी लाभच लाभ देईल!
17
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
18
ट्रम्पसमोर नेतन्याहूंनी फोनवर कुणाची माफी मागितली? इस्रायल-गाझा युद्ध थांबवण्यात महत्वाची भूमिका
19
मोठ्या पडद्यावर फ्लॉप पण बिझनेसमध्ये केली कमाल, चालवतोय १०००० कोटींची कंपनी; कमाईच्या बाबतीत अनेकांना टाकलं मागे
20
अब्जाधीशांच्या यादीत पहिल्यांदाच सामील झाला शाहरुख खान, पाहा किती झाली संपत्ती?

२७ गावांचा मुद्दा : हरकती, सूचना मांडण्यासाठी गर्दी; ग्रामस्थांना आजही म्हणणे मांडण्याची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 00:07 IST

त्याचबरोबर यावेळी प्रत्येक ग्रामपंचायतीने ‘महापालिका नको’ या स्वरूपाचे केलेले ठराव आयुक्तांकडे सादर करण्यात आले.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याच्या विषयावर बुधवारी बेलापूर येथे कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांच्याकडे सुनावणी झाली. या सुनावणीला हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ गेल्याने सभागृहात एकच गर्दी झाली. दरम्यान, प्रत्येक गावानुसार २७ गावांच्या हरकती व सूचना ऐकून घेतल्या असल्या, तरी आणखीन कोणाला काही हरकती व सूचना नोंदवायच्या असल्यास त्यांना गुरुवारपर्यंत मुभा देण्यात आली आहे.

सर्वपक्षीय संघर्ष समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार, उपाध्यक्ष गुलाब वझे, पदाधिकारी चंद्रकांत पाटील, अर्जुन भोईर, वंडार पाटील, गजानन मांगरूळकर, वकील शिवराम गायकर आदी या सुनावणीप्रसंगी उपस्थित होते.

संघर्ष समितीने यावेळी भूमिका मांडली की, गावे महापालिकेत समाविष्ट नव्हती, तेव्हादेखील कचऱ्याची विल्हेवाट लावली जात होती. पाणीसमस्या नव्हती. ग्रामपंचायती चांगला कारभार पाहत होत्या. असे असतानाही गावे २०१५ मध्ये सरकारने महापालिकेत समाविष्ट केली. त्यानंतरही या गावांचा विकास झालेला नाही. गावांकडे उत्पन्नाचा स्रोत होता. २७ गावांमध्ये मेगासिटी प्रकल्प उभारले जात आहेत. त्यामुळे मुद्रांक शुल्कापोटी ग्रामपंचायतींना कोट्यवधी रुपयांचे अनुदान राज्य सरकारकडून वर्ग केले जात होते. गावे समाविष्ट करण्यापूर्वीच काटई गावाला मुद्रांक शुल्कापोटी ३० कोटी रुपये मिळणार होते. मात्र, गावे महापालिकेत समाविष्ट झाल्याने काटईला ३० कोटी मिळाले नाहीत. निळजे गावाला ६१ कोटीचे मुद्रांक शुल्कापोटी अनुदान मिळत होते. त्यामुळे सरकारने गावांची एकत्र स्वतंत्र नगरपालिका करावी. अन्यथा, ग्रामपंचायत होती, तीच करावी, अशी मागणी केली.

त्याचबरोबर यावेळी प्रत्येक ग्रामपंचायतीने ‘महापालिका नको’ या स्वरूपाचे केलेले ठराव आयुक्तांकडे सादर करण्यात आले. तसेच ७ सप्टेंबर २०१५ ला राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेला राज्य निवडणूक आयोगाने घेतलेली हरकतही कशा प्रकारे अयोग्य होती, हेदेखील नमूद केले. हरकती, सूचना नोंदविण्यासाठी जमलेली गर्दी पाहून विभागीय आयुक्तांनी प्रत्येक गावाच्या सरपंच, उपसरपंचाचे म्हणणे ऐकून घेतले. बुधवारी दिवसभरात २७ गावांच्या हरकती, सूचना ऐकून घेण्यात आल्या. नांदिवलीच्या सरपंचांनी मुद्दा मांडला की, आम्ही गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा ठराव केला होता. मात्र, विकास झालेला नसल्याचे लक्षात येताच आम्हाला महापालिका नको, असे आमचे म्हणणे आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका