शहरं
Join us  
Trending Stories
1
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
2
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
3
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
4
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
5
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
6
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
7
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
8
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
9
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
10
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
11
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
12
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
13
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
14
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
15
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
16
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
17
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
18
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
19
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
20
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
Daily Top 2Weekly Top 5

२७ गावांचा मुद्दा : हरकती, सूचना मांडण्यासाठी गर्दी; ग्रामस्थांना आजही म्हणणे मांडण्याची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 00:07 IST

त्याचबरोबर यावेळी प्रत्येक ग्रामपंचायतीने ‘महापालिका नको’ या स्वरूपाचे केलेले ठराव आयुक्तांकडे सादर करण्यात आले.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याच्या विषयावर बुधवारी बेलापूर येथे कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांच्याकडे सुनावणी झाली. या सुनावणीला हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ गेल्याने सभागृहात एकच गर्दी झाली. दरम्यान, प्रत्येक गावानुसार २७ गावांच्या हरकती व सूचना ऐकून घेतल्या असल्या, तरी आणखीन कोणाला काही हरकती व सूचना नोंदवायच्या असल्यास त्यांना गुरुवारपर्यंत मुभा देण्यात आली आहे.

सर्वपक्षीय संघर्ष समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार, उपाध्यक्ष गुलाब वझे, पदाधिकारी चंद्रकांत पाटील, अर्जुन भोईर, वंडार पाटील, गजानन मांगरूळकर, वकील शिवराम गायकर आदी या सुनावणीप्रसंगी उपस्थित होते.

संघर्ष समितीने यावेळी भूमिका मांडली की, गावे महापालिकेत समाविष्ट नव्हती, तेव्हादेखील कचऱ्याची विल्हेवाट लावली जात होती. पाणीसमस्या नव्हती. ग्रामपंचायती चांगला कारभार पाहत होत्या. असे असतानाही गावे २०१५ मध्ये सरकारने महापालिकेत समाविष्ट केली. त्यानंतरही या गावांचा विकास झालेला नाही. गावांकडे उत्पन्नाचा स्रोत होता. २७ गावांमध्ये मेगासिटी प्रकल्प उभारले जात आहेत. त्यामुळे मुद्रांक शुल्कापोटी ग्रामपंचायतींना कोट्यवधी रुपयांचे अनुदान राज्य सरकारकडून वर्ग केले जात होते. गावे समाविष्ट करण्यापूर्वीच काटई गावाला मुद्रांक शुल्कापोटी ३० कोटी रुपये मिळणार होते. मात्र, गावे महापालिकेत समाविष्ट झाल्याने काटईला ३० कोटी मिळाले नाहीत. निळजे गावाला ६१ कोटीचे मुद्रांक शुल्कापोटी अनुदान मिळत होते. त्यामुळे सरकारने गावांची एकत्र स्वतंत्र नगरपालिका करावी. अन्यथा, ग्रामपंचायत होती, तीच करावी, अशी मागणी केली.

त्याचबरोबर यावेळी प्रत्येक ग्रामपंचायतीने ‘महापालिका नको’ या स्वरूपाचे केलेले ठराव आयुक्तांकडे सादर करण्यात आले. तसेच ७ सप्टेंबर २०१५ ला राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेला राज्य निवडणूक आयोगाने घेतलेली हरकतही कशा प्रकारे अयोग्य होती, हेदेखील नमूद केले. हरकती, सूचना नोंदविण्यासाठी जमलेली गर्दी पाहून विभागीय आयुक्तांनी प्रत्येक गावाच्या सरपंच, उपसरपंचाचे म्हणणे ऐकून घेतले. बुधवारी दिवसभरात २७ गावांच्या हरकती, सूचना ऐकून घेण्यात आल्या. नांदिवलीच्या सरपंचांनी मुद्दा मांडला की, आम्ही गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा ठराव केला होता. मात्र, विकास झालेला नसल्याचे लक्षात येताच आम्हाला महापालिका नको, असे आमचे म्हणणे आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका