शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

ठाण्यात चारित्र्याच्या संशयाला कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

By जितेंद्र कालेकर | Updated: February 28, 2019 19:28 IST

चारित्र्यावरील संशयाच्या कारणावरुन पतीबरोबर नेहमीच भांडणे होत असल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या मनिषा उर्फ प्रियंका गुजर (२७) या विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी ठाण्यात घडली.

ठळक मुद्दे शेजाऱ्यांना संशय आल्यानंतर उघड झाला प्रकार नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पतीबरोबर नेहमीच व्हायचा वाद

ठाणे: पतीसोबत होणाऱ्या नेहमीच्या भांडणाला कंटाळून मनिषा उर्फ प्रियंका संदेश गुजर (२७, रा. पिंगळे चाळ, नितीन कंपनी, गणेशवाडी, ठाणे )या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी १२ वा. च्या सुमारास घडली. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मनिषा आणि संदेश यांच्या लग्नाला आठ वर्षे झाली होती. त्यांना एक सात वर्षांची मुलगीही आहे. तिच्या चारित्र्यावर तो नेहमीच संशय घेत असे. यातूनच दोघांमध्ये नेहमीच खटके उडत होते. एक दोन वेळा हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंतही गेले होते. नातेवाईक, शेजारी तसेच पोलीस यांनीही त्यांची याआधी समजूत घातली होती. मात्र, संशयाच्या भूताने पछाडल्यामुळे तो नेहमीच तिला मोबाईल मागत असे. मोबाईलचा पासवर्डही मागायचा. तिने मोबाईल न दिल्यामुळेही त्यांचा वाद विकोपाला जात होता, अशी माहिती पोलीस चौकशीमध्ये पुढे आली आहे. २८ फेब्रुवारी नेहमीप्रमाणे तो सकाळी कामाला गेला होता. तर मुलगी शाळेत गेली होती. सकाळपासून घराचा दरवाजा न उघडल्यामुळे शेजारच्यांना संशय आल्याने त्यांनी दरवाजा वाजविला. त्यांच्यापैकीच एकाने खिडकीतून आत पाहिले तर तिने गळफास घेतल्याचे आढळले. याबाबतची माहिती नौपाडा पोलिसांना देण्यात आली. तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. महिला पोलीस उपनिरीक्षक मोहिनी कपिले याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीSuicideआत्महत्या