शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
2
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
3
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
4
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
5
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
6
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
7
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
8
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
9
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
10
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
11
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
12
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
13
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
14
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
15
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
16
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
17
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
18
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
19
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
20
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले

बॅरेज धरणात मानखुर्दच्या तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 05:56 IST

ठाणे जिल्ह्यातील बहुतांश भागात रविवारी पहाटेपासून पाऊस सुरू असून, बदलापूर येथील बॅरेज धरणात

ठाणे/बदलापूर : ठाणे जिल्ह्यातील बहुतांश भागात रविवारी पहाटेपासून पाऊस सुरू असून, बदलापूर येथील बॅरेज धरणात धबधब्यांवरील पाण्याचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटकांनी हजेरी लावली होती. या पर्यटकांपैकी मानखुर्द येथील गोपाळ दास (२०) या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. रविवारी सकाळी हा प्रकार घडला असून, त्याचा मृतदेह अग्निशमन विभागाने बाहेर काढला.शुक्र वारी बॅरेज धरणात मासेमारी करण्यासाठी गेलेले बदलापूर येथील चार तरुण बॅरेज धरणातील पाण्याच्या मधोमध चौथऱ्यावर अडकले होते. त्यांची सुखरुप सुटका केल्यावर रविवारीही असाच एक प्रकार घडला.बॅरेज धरणाच्या खालच्या ओढ्यावर पोहण्यासाठी उतरलेला गोपाळ या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच बदलापूर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बोटीच्या मदतीने या तरुणाचा मृतदेह बाहेर काढला. हा तरुण मानखुर्द येथील रहिवासी असून, तो आपल्या मित्रांसोबत येथे पिकनिकसाठी आला होता. पर्यटकांनी काळजी घ्यावी असे आवाहन अग्निशमन दलाचे प्रमुख आर. बी. पाटील यांनी केले आहे.दरम्यान, ठाणे जिल्ह्यात बहुतांश भागात झालेल्या पावसाने झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावे आणि नवी मुंबईतील १४ गावे यांच्या वेशीवर असलेल्या घेसर मधील रेल्वे भुयारी मार्गात पावसाचे पाणी साचल्याने हा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. शनिवारपासून हा मार्ग बंद झाला असून, रविवारीदेखील हीच परिस्थिती होती.रायगडमध्ये पावसाचा जोर कायमअलिबाग : रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर रविवारही कायम होता. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील सुकेळी खिंड, पनवेलजवळील कर्नाळा खिंडीत वाहतूक मंदावली होती. महाडजवळ सुरू असलेल्या चौपदरीकरणाचे काम पावसामुळे बंद आहे.मात्र रस्त्यासाठी करण्यात आलेल्या खोदकामामुळे मातीचा भराव रस्त्यावर येत असल्याने दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चालकांच्या सुरक्षेसाठी काही धोकादायक वळणावर बॅरिकेड्स लावण्यात आले असले तरी अपघाताची भीती चालकांकडून व्यक्त होत आहे.अलिबाग तालुक्यातील महाजने व बेलोशी गावांना जोडणाºयापुलाचा भाग रविवारी ढासळला. त्यामुळे या मार्गावरील एसटी वअन्य अवजड वाहनांची वाहतूकबंद करण्यात आली आहे. तर मुरूडमधील मणेरे गावात मुसळधार पावसामुळे वीज खांब कोसळल्याने गाव गेल्या काही दिवसांपासून अंधारात आहे.पालघर जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूचपालघर : शुक्रवारी रात्रीपासून जिल्ह्यामध्ये वरुणराजाने सुरू केलेली रिपरिप रविवारीही कायम होती. कधी जोर धरणारा तर कधी उसंत घेणाºया पावसाने शेतीसाठी पूरक वातावरण तयार केल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये नांगरणीला तर काही ठिकाणी पेरणीला सुरुवात झाली आहे. वसईच्या भुईगाव डोंगरीलगतच्या आंबेडकर नगर स्थित मुख्य रस्त्यावर असलेले वडाचे झाड मध्यरात्री पडल्याने सकाळी वाहतूककोंडी झाली होती. तर विक्रमगड व वाड्यामध्ये पावसाचा जोर कायम असल्याने सुट्टीचा दिवस असूनही लोकांनी बाहेर पडणे टाळले. पालघर, बोईसर, वसई, विरार व नालासोपाºयात पाऊस सुरू असल्याने अनेक ठिकाणी पाणी भरले होते. शनिवारीसुद्धा हिच स्थिती होती.पावसाने कर्नाळा खिंडीत कोंडीमुंबई-गोवा महामार्गाच्या रु ंदीकरणाचे काम चालू आहे. यातच रविवारी सकाळपासूनच पावसाचा जोर वाढल्याने कर्नाळा खिंडीत वाहतूककोंडी झाली होती. दोन्ही बाजूने वाहतूक धिमी झाल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागली.मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचा एक भाग म्हणून कर्नाळा अभयारण्याजवळ टप्प्याटप्प्याने दोन उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी एक मार्गिकेवर खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे वाहतुकीचा ताण एकाच मार्गिकेवर पडल्याने हा रस्ता काही प्रमाणात खचला आहे. यातच दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे.रविवारचा सुट्टीचा दिवस असल्याने या मार्गावर छोट्या खासगी वाहनांसह अवजड वाहनांची मोठी वर्दळ होती. सकाळपासून कर्नाळा खिंडीत वाहतूककोंडी झाली होती. दरम्यान, वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टीने सकाळपासून कर्नाळा खिंडीत रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम सुरू होते. सखल भागात खडी व डांबराचा भराव टाकून रस्त्यांची डागडुजी करण्यात आली. त्यामुळे वाहनधारकांना काहीसा दिलासा मिळाल्याचे दिसून आले.नवी मुंबईत ३९.६५ मि.मी. पाऊसरविवारी राज्याच्या अनेक भागांसह नवी मुंबईतही दिवसभर पावसाने हजेरी लावली. यादरम्यान संध्याकाळपर्यंत शहरात ३९.६५ मि.मी. पावसाची नोंद महापालिकेच्या आपत्कालीन विभागाकडे झाली आहे.त्यापैकी सर्वाधिक ४५ मि.मी. पाऊस ऐरोली विभागात पडला आहे. मोरबे धरण परिसरातदेखील अद्यापपर्यंत एकूण ४५३.६० मि.मी. पाऊस कोसळल्याने धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ होऊन ती ७६ मीटर झाली आहे.परंतु धरण भरून वाहण्यासाठी अद्याप १२ मीटर पाण्याची आवश्यकता असल्याने पुढील महिनाभर मोरबे परिसरात मुसळधार पाऊस कोसळल्यास पुढील उन्हाळ्यापर्यंतचा नवी मुंबईकरांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.