शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आंब्याचे उत्पादन घटतंय : आंबा महोत्सव पत्रकार परिषदेत आयोजकांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 12:23 IST

१ मे ते १० मे या कालावधीत ठाण्यात आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यात ५० स्टॉल्स असणार आहेत.

ठळक मुद्देआंब्याचे उत्पादन घटतंयवातावरणातील बदलामुळे ३५ टक्केच आंबा बाजारात दर सर्वसामान्यांना परवडेल - पत्रकार परिषदेत आयोजकांची माहिती

ठाणे: २०१६ साली एक लाख ८० हजार हेक्टरमध्ये ३ लाख २० हजार मेट्रीक टन उत्पादन येत होते. हे उत्पादन खाली येत २०१७ साली २ लाख ५६ हजार मेट्रीक टन आणि २०१८ साली १ लाख २८ हजार मेट्रीक टन आले. यंदा वातावरणातील बदलामुळे ३५ टक्केच आंबा बाजारात येईल अशी माहिती आंबा महोत्सवात देण्यात आली.              या महोत्सवाची माहिती देण्यासाठी रविवारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. आंबा कमी प्रमाणात आला तरी त्याचे दर सर्वसामान्यांना परवडेल असेच आहे अशी माहिती संस्कारचे पदाधिकारी विष्णू रानडे यांनी दिली. तसेच, बाहेरचे विक्रेते कर्नाटकचा आंबा आणि कोकणातील आंबा मिक्स करुन विकत असल्याचा आरोप कोकण विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र तावडे यांनी केला. महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ पुरस्कृत संस्कार व कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित आंबा महोत्सव १ मे ते १० मे या कालावधीत सकाळी १० ते रात्री १० यावेळेत न्यू इंग्लिश स्कूलचे पटांगण ेयेथे आयोजित केला आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सायं. ५ वा. उद्घाटन होणार आहे. महोत्सवाचे यंदाचे १४ वे वर्ष आहे. १५ वर्षांपुर्वी आंबा विक्री ही दलालांच्या हाती होती. त्यामुळे शेतकऱ्यांना नफा मिळत नव्हता. शेतकरी आणि ग्राहक यांचा मेळ घालून कोकणातील शेतकऱ्यांना या महोत्सवाच्या माध्यमातून व्यासपीठ मिळवून दिले. या महोत्सवातून गवतात पिकलेला आंबा ग्राहकांना मिळणार असल्याचे तावडे यांनी सांगितले. महोत्सवात यंदा ५० स्टॉल्स असून त्यातील ४० स्टॉल्स हे आंब्याचे आणि उवर्रित १० स्टॉल्स हे महिला बचत गटांसाठी देण्यात आले आहेत. या स्टॉल्सवर आंबापोळी ते पन्हे असे विविध प्रकारांची कोकणातील उत्पादनांची विक्री केली जाणार आहे. मुंबईत ३६० कोटी आंब्याची विक्री होते. त्यातील १०० कोटी रुपयांच्या आंब्याची निर्यात होते अशी माहिती रानडे यांनी दिली. गेल्यावर्षी या महोत्सवात जवळपास सव्वा दोन कोटींची खरेदी-विक्री झाली. यंदाच्या महोत्सवात ३ कोटीपर्यंत आंब्याची उलाढाल जाऊ शकते अशी आशा पत्रकार परिषदेत व्यक्त केली. यावेळी संस्कारचे संतोष साळुंखे देखील उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईMarketबाजार