शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

आंब्याचे उत्पादन घटतंय : आंबा महोत्सव पत्रकार परिषदेत आयोजकांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 12:23 IST

१ मे ते १० मे या कालावधीत ठाण्यात आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यात ५० स्टॉल्स असणार आहेत.

ठळक मुद्देआंब्याचे उत्पादन घटतंयवातावरणातील बदलामुळे ३५ टक्केच आंबा बाजारात दर सर्वसामान्यांना परवडेल - पत्रकार परिषदेत आयोजकांची माहिती

ठाणे: २०१६ साली एक लाख ८० हजार हेक्टरमध्ये ३ लाख २० हजार मेट्रीक टन उत्पादन येत होते. हे उत्पादन खाली येत २०१७ साली २ लाख ५६ हजार मेट्रीक टन आणि २०१८ साली १ लाख २८ हजार मेट्रीक टन आले. यंदा वातावरणातील बदलामुळे ३५ टक्केच आंबा बाजारात येईल अशी माहिती आंबा महोत्सवात देण्यात आली.              या महोत्सवाची माहिती देण्यासाठी रविवारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. आंबा कमी प्रमाणात आला तरी त्याचे दर सर्वसामान्यांना परवडेल असेच आहे अशी माहिती संस्कारचे पदाधिकारी विष्णू रानडे यांनी दिली. तसेच, बाहेरचे विक्रेते कर्नाटकचा आंबा आणि कोकणातील आंबा मिक्स करुन विकत असल्याचा आरोप कोकण विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र तावडे यांनी केला. महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ पुरस्कृत संस्कार व कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित आंबा महोत्सव १ मे ते १० मे या कालावधीत सकाळी १० ते रात्री १० यावेळेत न्यू इंग्लिश स्कूलचे पटांगण ेयेथे आयोजित केला आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सायं. ५ वा. उद्घाटन होणार आहे. महोत्सवाचे यंदाचे १४ वे वर्ष आहे. १५ वर्षांपुर्वी आंबा विक्री ही दलालांच्या हाती होती. त्यामुळे शेतकऱ्यांना नफा मिळत नव्हता. शेतकरी आणि ग्राहक यांचा मेळ घालून कोकणातील शेतकऱ्यांना या महोत्सवाच्या माध्यमातून व्यासपीठ मिळवून दिले. या महोत्सवातून गवतात पिकलेला आंबा ग्राहकांना मिळणार असल्याचे तावडे यांनी सांगितले. महोत्सवात यंदा ५० स्टॉल्स असून त्यातील ४० स्टॉल्स हे आंब्याचे आणि उवर्रित १० स्टॉल्स हे महिला बचत गटांसाठी देण्यात आले आहेत. या स्टॉल्सवर आंबापोळी ते पन्हे असे विविध प्रकारांची कोकणातील उत्पादनांची विक्री केली जाणार आहे. मुंबईत ३६० कोटी आंब्याची विक्री होते. त्यातील १०० कोटी रुपयांच्या आंब्याची निर्यात होते अशी माहिती रानडे यांनी दिली. गेल्यावर्षी या महोत्सवात जवळपास सव्वा दोन कोटींची खरेदी-विक्री झाली. यंदाच्या महोत्सवात ३ कोटीपर्यंत आंब्याची उलाढाल जाऊ शकते अशी आशा पत्रकार परिषदेत व्यक्त केली. यावेळी संस्कारचे संतोष साळुंखे देखील उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईMarketबाजार