शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

महावितरणच्या नाट्य स्पर्धेस सुरुवात; प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 21:23 IST

भांडूप नागरी परिमंडळाच्या 'ती रात्र' नाटकाने नाट्यस्पर्धेची सुरुवात

डोंबिवलीमहावितरणच्या फिल्डवर कार्यरत कर्मचारी व अधिकारी यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून या स्पर्धा आयोजित केल्या असून अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनानुसार या नाट्यस्पर्धा होत आहेत. कलेमुळे मानवी आयुष्य अर्थपूर्ण होत असते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्यातील कला जपावी तसेच सहभागी कर्मचाऱ्यांनी आपली सर्वोत्तम कला सादर करावी, असे मत महावितरणचे कार्यकरी संचालक (मानव संसाधन) चंद्रशेखर येरमे यांनी व्यक्त केले. आचार्य अत्रे नाट्य रंगमंदिर, कल्याण येथे आयोजित नाट्यस्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोकण प्रादेशिक कार्यालयाचे प्रादेशिक संचालक श्रीकांत जलतारे उपस्थित होते. 

यावेळी व्यासपीठावर मुख्य महाव्यवस्थापक (मानव संसाधन) संदेश हाके, कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता रफिक शेख, रत्नागिरी परिमंडलाच्या मुख्य अभियंता रंजना पगारे, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके, महाव्यवस्थापक (मानव संसाधन) राजेंद्र पांडे व आयोजन समितीचे प्रमुख तथा अधीक्षक अभियंता सुनील काकडे उपस्थित होते. तसेच महावितरण कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय व नाट्यरसिकांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना श्रीकांत जलतारे म्हणाले, “या नाट्य महोत्सवामुळे कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या दैनंदिन कामात अधिक सकारात्मक बदल होऊ शकतो. त्यामुळेच सर्वांनी या महोत्सवाचा आनंद घ्यावा.” 

नाट्यस्पर्धेची सुरुवात भांडूप नागरी परिमंडलाच्या 'ती रात्र' या नाटकाने झाली. याचे लेखन हेमंत एदलाबादकर यांनी तर दिग्दर्शन डॉ.संदीप वंजारी यांनी केले आहे. या नाटकाची मांडणी सायको-सस्पेन्स पद्धतीने करण्यात आली होती. एखादी घटना मानवी मनात कशी घर करून राहते व मानवी आयुष्यावर त्याचे कसे बरे-वाईट सुप्त परिणाम होत असतात याची सुंदर मांडणी या नाटकात करण्यात आली होती.  दुपारी ०२.०० वाजता नाशिक परिमंडलाचे 'झोपा आता गुपचूप' हे नाटक सादर झाले. या नाटकाचे लेखन अशोक पाटोळे यांनी व दिग्दर्शन रेणुका भिसे यांनी केले आहे. प्रत्येकाने स्वप्ने पहावीत पण कोणत्याही गोष्टीचा हव्यास करू नये, या आशयाची अंतर्मुख करणारी मांडणी या नाटकाद्वारे सादर करण्यात आली. सायंकाळी 'सोरगत' हे उषा परब लिखित कोकण परिमंडल रत्नागिरी यांचे नाटक सादर झाले. एका छोट्याशा खेड्यात लग्नासाठी मुलगी पाहायला आलेले लोक, म्हैस विकण्यासाठी गिऱ्हाईकाची वाट पाहणाऱ्याच्या घरात जातात. या गैरसमजातून होणारे विनोद मालवणी शैलीत खुमासदार पद्धतीने मांडले होते.

बुधवारी  प्रकाशगड या सांघिक कार्यालयाचे 'अशुद्ध बीजापोटी' हे नाटक सादर होणार आहे. या नाटकाचे लेखन केदार देसाई यांनी तर दिग्दर्शन विनोद गोसावी यांनी केले आहे. दुपारी ०२.३० वाजता कल्याण परिमंडलाचे 'तथास्तु' हे डॉ.संतोष बोकेफोडे लिखित व दिग्दर्शित नाटक सादर होईल. सायंकाळी ०५.३०वाजता स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सोहळा होणार आहे. नाट्यस्पर्धा सर्वांसाठी खुली असून रसिकांनी या स्पर्धेचा आनंद घ्यावा व महावितरणच्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता रफिक शेख यांनी केले आहे.

टॅग्स :thaneठाणेdombivaliडोंबिवलीmahavitaranमहावितरण