शहरं
Join us  
Trending Stories
1
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
2
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
3
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
4
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
5
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
6
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
7
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
8
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
9
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
10
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
11
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
13
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
14
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
15
पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...
16
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
17
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात
18
सोन्याच्या दरात मोठी घसरण! फक्त ४ दिवसांत ७,००० रुपयांहून अधिक स्वस्त; काय आहे कारण?
19
RO-KO च्या चाहत्यांसाठी खुशखबर! पुढील वनडे कधी खेळणार? जाणून घ्या तारीख...
20
समर्थक जिंदाबादच्या घोषणा देत असताना स्टेज कोसळला; बाहुबली नेते अनंत सिंह पडले खाली

महाराष्ट्र निवडणूक निकाल : ठाण्यात महायुतीचाच बोलबाला; शिंदे, सरनाईकांनी राखला बालेकिल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 17:48 IST

Maharashtra Election Result 2019 : ठाण्यातील चारही मतदारसंघात विद्यमान आमदारांचा विजय झाला आहे. 

ठाणे - ठाण्याच्या निकालाकडे सर्वांच्याच नजरा लागल्या होत्या. ठाण्यातील चारही मतदारसंघात विद्यमान आमदारांचा विजय झाला आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदार संघावर पुन्हा एकदा शिवसेनेने आपल्या विजयाची मोहोर उमटवली आहे. शिंदे यांनी विजयाची हॅटट्रिक साधली आहे. ओवळा माजीवडा मतदार संघातून शिवसेनेचे प्रताप सरनाईक, कळवा-मुंब्रा येथून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड तर ठाणे शहरमधून भाजपाचे संजय केळकर विजयी झाले आहेत. 

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पहिल्या फेरीपासूनच मतांमध्ये आघाडी घेत आपला गड कायम राखला आहे. शिंदे यांनी 1 लाख 13 हजार 4 मते मिळवून विजयाची हॅटट्रिक साधली आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत अपेक्षेप्रमाणेच एकतर्फी निकाल लागल्यामुळे पुन्हा कोपरी पाचपाखाडी मतदारसंघावर भगवा फडकविला आहे. या मतदार संघात काँग्रेसचे संजय घाडीगावकर आणि मनसेचे महेश कदम यानी शिंदे यांना आव्हान दिले होते. हे त्यात घाडीगावकर यांनी प्रचारात क्लस्टरचा मुद्दा घेऊन शिंदे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो अपयशी ठरल्याचे या निकालावरुन स्पष्ट झाले आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेच्या दीपाली सय्यद यांचा पराभव केला आहे. ओवळा माजीवडा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार आणि विद्यमान आमदार प्रताप सरनाईक यांना 1,17, 289 मतदारांनी मतांच्या रुपात मतदान केले. त्यांनी काँग्रेसचे विक्रांत चव्हाण यांचा 83,772 मतांनी पराभव करत, विजयाची हॅटट्रिक साधली. सुरुवातीपासूनच सरनाईकांनी घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवत, त्यांनी आपला गड राखला. या विजेयाचे श्रेय त्यांनी मतदारसंघातील शिवसैनिकांना दिले.

सक्षम विरोधी पक्ष म्हणून संधी द्या, असं आवाहन करणाऱ्या मनसेला केवळ एका जागेवर यश मिळालं आहे. कल्याण ग्रामीणमध्ये मनसेच्या राजू पाटील यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला आहे. कल्याण ग्रामीण मतदारसंघात शिवसेना आणि मनसेमध्ये चुरशीचा संघर्ष पाहायला मिळाला. अखेर यामध्ये राजू पाटील यांनी बाजी मारली आणि मनसेला भोपळा फोडण्यात यश आलं. सकाळी मतमोजणीला सुरुवात होताच राजू पाटील यांनी आघाडी घेतली होती. शिवसेनेच्या रमेश म्हात्रेंनी त्यांना कडवी टक्कर दिली. अनेकदा राजू पाटील आणि रमेश म्हात्रे यांच्या मतांमध्ये अवघ्या काही शे मतांचा फरक दिसत होता. अखेर राजू पाटील यांनी बाजी मारली. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मनसेनं पहिल्या विजयाची नोंद केली. मनसेला कल्याण ग्रामीणमध्ये यश मिळेल, अशी शक्यता अनेकांनी व्यक्त केली होती.

भाजपा

मंदा म्हात्रे ( बेलापूर )

गणेश नाईक ( ऐरोली )

संजय केळकर ( ठाणे शहर )

गणपत गायकवाड़ ( कल्याण पूर्व )

महेश चौगुले ( भिवंडी पश्चिम )

किसन कथोरे ( मुरबाड )

रविंद्र चव्हाण ( डोंबिवली )

कुमार आयलानी ( उल्हासनगर )

शिवसेना

एकनाथ शिंदे (कोपरी पाचपाखडी )

प्रताप सरनाईक ( ओवला माजीवडा )

शांताराम मोरे ( भिवंडी ग्रामीण )

विश्वनाथ भोईर ( कल्याण पश्चिम )

बालाजी किनिकर ( अंबरनाथ )

राष्ट्रवादी

जितेंद्र आव्हाड ( कळवा-मुंब्रा )

दौलत दरोडा (शहापूर )

मनसे

प्रमोद पाटील ( कल्याण ग्रामीण )

समाजवादी

रहिस शेख ( भिवंडी पूर्व )

अपक्ष

गीता जैन ( मीरा भाईंदर )

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019thaneठाणेkopri-pachpakhadi-acकोपरी-पाचपाखाडीkalyan-rural-acकल्याण ग्रामीणmumbra-kalwa-acमुंब्रा कळवाbelapur-acबेलापूरBJPभाजपाShiv Senaशिवसेना