शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

Vidhan Sabha 2019: ठाणे मतदारसंघावरून आघाडीत बिब्बा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 00:18 IST

काँग्रेस नडली; राष्ट्रवादी अडली

ठाणे : एकीकडे राज्यात शिवसेना आणि भाजपची युती होण्याआधीच काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये आघाडी झाली आहे. परंतु, असे असतानाही ठाण्यात मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये ठाणे शहर विधानसभा मतदारसंघावरून कलगीतुरा रंगला आहे. काँग्रेसने या जागेवर दावा करून ती जागा मिळावी म्हणून श्रेष्ठींना साकडे घातले आहे. परंतु, लोकसभा निवडणुकीत मीरा-भाईंदरच्या बदल्यात ठाणे असे समीकरण ठरले असल्याने कोणत्याही परिस्थितीत ठाणे विधानसभा क्षेत्र सोडणार नसल्याचा दावा राष्ट्रवादीने केला. त्यामुळे हा मतदारसंघ कोणाच्या पदरात पडणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार असले, तरी यानिमित्ताने या दोन्ही पक्षांत तूर्तास ठिणगी पडली आहे.राज्यात आघाडीकडून वेगवान घडामोडी घडत आहेत. मात्र, ठाण्यात मात्र काँग्रेस आणि राष्टÑवादीमध्ये एका मतदारसंघावरून आघाडीत बिब्बा पडला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्टÑवादीमध्ये एक समझोता झाला होता. त्यानुसार, मीरा-भार्इंदर हा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याचा निर्धार केला होता. त्या बदल्यात ठाणे शहर विधानसभा क्षेत्रात राष्टÑवादी लढणार हे निश्चित झाले होते.आता ऐन विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ठाणे शहर विधानसभा क्षेत्रावर दावा केला आहे. पूर्वीपासून हा मतदारसंघ काँग्रेसकडे होता, त्यामुळे तो मिळावा यासाठी पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यानुसार, श्रेष्ठींकडेही त्यांनी तशी मागणी केली आहे.मागील विधानसभा निवडणुकीचा विचार केला, तर या मतदारसंघातून काँग्रेस आणि राष्टÑवादी हे वेगळे लढले होते. त्यानुसार, काँग्रेसला या मतदारसंघातून १५ हजारांच्या आसपास तर राष्टÑवादीला २४ हजारांच्या आसपास मते मिळाली होती. परंतु, त्यानंतर झालेल्या ठाणे महापालिका निवडणुकीत काँग्रेसला या मतदारसंघातून भोपळासुद्धा फोडता आलेला नाही. तर, राष्टÑवादीचे येथे चार नगरसेवक निवडून आले. यामुळेच आता राष्टÑवादीने आपला दावा आणखी मजबूत केला आहे.ठाणे शहर मतदारसंघ मिळावा, ही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. मात्र, लोकसभेत ठरले असल्याने कोणत्याही परिस्थितीत ठाणे शहर विधानसभा सोडणार नाही.- आनंद परांजपे, ठाणे शहराध्यक्ष, राष्टÑवादीहा मतदारसंघ राष्टÑवादीला हवा असल्याची मध्यंतरी चर्चा होती. त्या अनुषंगाने ही मागणी करण्यात आली असावी. मात्र, या मतदारसंघाबाबत अद्यापही दोन्ही पक्षांकडून कोणत्याही प्रकारची चर्चा सुरू झालेली नाही. चर्चा झाल्यानंतरच हा मतदारसंघ कोणाला मिळणार, हे निश्चित होणार आहे.- मनोज शिंदे,ठाणे शहराध्यक्ष, काँग्रेस

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस