शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

Vidhan Sabha 2019: ठाणे मतदारसंघावरून आघाडीत बिब्बा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 00:18 IST

काँग्रेस नडली; राष्ट्रवादी अडली

ठाणे : एकीकडे राज्यात शिवसेना आणि भाजपची युती होण्याआधीच काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये आघाडी झाली आहे. परंतु, असे असतानाही ठाण्यात मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये ठाणे शहर विधानसभा मतदारसंघावरून कलगीतुरा रंगला आहे. काँग्रेसने या जागेवर दावा करून ती जागा मिळावी म्हणून श्रेष्ठींना साकडे घातले आहे. परंतु, लोकसभा निवडणुकीत मीरा-भाईंदरच्या बदल्यात ठाणे असे समीकरण ठरले असल्याने कोणत्याही परिस्थितीत ठाणे विधानसभा क्षेत्र सोडणार नसल्याचा दावा राष्ट्रवादीने केला. त्यामुळे हा मतदारसंघ कोणाच्या पदरात पडणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार असले, तरी यानिमित्ताने या दोन्ही पक्षांत तूर्तास ठिणगी पडली आहे.राज्यात आघाडीकडून वेगवान घडामोडी घडत आहेत. मात्र, ठाण्यात मात्र काँग्रेस आणि राष्टÑवादीमध्ये एका मतदारसंघावरून आघाडीत बिब्बा पडला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्टÑवादीमध्ये एक समझोता झाला होता. त्यानुसार, मीरा-भार्इंदर हा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याचा निर्धार केला होता. त्या बदल्यात ठाणे शहर विधानसभा क्षेत्रात राष्टÑवादी लढणार हे निश्चित झाले होते.आता ऐन विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ठाणे शहर विधानसभा क्षेत्रावर दावा केला आहे. पूर्वीपासून हा मतदारसंघ काँग्रेसकडे होता, त्यामुळे तो मिळावा यासाठी पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यानुसार, श्रेष्ठींकडेही त्यांनी तशी मागणी केली आहे.मागील विधानसभा निवडणुकीचा विचार केला, तर या मतदारसंघातून काँग्रेस आणि राष्टÑवादी हे वेगळे लढले होते. त्यानुसार, काँग्रेसला या मतदारसंघातून १५ हजारांच्या आसपास तर राष्टÑवादीला २४ हजारांच्या आसपास मते मिळाली होती. परंतु, त्यानंतर झालेल्या ठाणे महापालिका निवडणुकीत काँग्रेसला या मतदारसंघातून भोपळासुद्धा फोडता आलेला नाही. तर, राष्टÑवादीचे येथे चार नगरसेवक निवडून आले. यामुळेच आता राष्टÑवादीने आपला दावा आणखी मजबूत केला आहे.ठाणे शहर मतदारसंघ मिळावा, ही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. मात्र, लोकसभेत ठरले असल्याने कोणत्याही परिस्थितीत ठाणे शहर विधानसभा सोडणार नाही.- आनंद परांजपे, ठाणे शहराध्यक्ष, राष्टÑवादीहा मतदारसंघ राष्टÑवादीला हवा असल्याची मध्यंतरी चर्चा होती. त्या अनुषंगाने ही मागणी करण्यात आली असावी. मात्र, या मतदारसंघाबाबत अद्यापही दोन्ही पक्षांकडून कोणत्याही प्रकारची चर्चा सुरू झालेली नाही. चर्चा झाल्यानंतरच हा मतदारसंघ कोणाला मिळणार, हे निश्चित होणार आहे.- मनोज शिंदे,ठाणे शहराध्यक्ष, काँग्रेस

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस