शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
2
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
3
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
4
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
5
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
6
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
7
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
8
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
9
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
10
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
11
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
12
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
13
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
14
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
15
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
16
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
17
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
18
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
19
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
20
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले

Vidhan Sabha 2019: ठाणे मतदारसंघावरून आघाडीत बिब्बा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 00:18 IST

काँग्रेस नडली; राष्ट्रवादी अडली

ठाणे : एकीकडे राज्यात शिवसेना आणि भाजपची युती होण्याआधीच काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये आघाडी झाली आहे. परंतु, असे असतानाही ठाण्यात मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये ठाणे शहर विधानसभा मतदारसंघावरून कलगीतुरा रंगला आहे. काँग्रेसने या जागेवर दावा करून ती जागा मिळावी म्हणून श्रेष्ठींना साकडे घातले आहे. परंतु, लोकसभा निवडणुकीत मीरा-भाईंदरच्या बदल्यात ठाणे असे समीकरण ठरले असल्याने कोणत्याही परिस्थितीत ठाणे विधानसभा क्षेत्र सोडणार नसल्याचा दावा राष्ट्रवादीने केला. त्यामुळे हा मतदारसंघ कोणाच्या पदरात पडणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार असले, तरी यानिमित्ताने या दोन्ही पक्षांत तूर्तास ठिणगी पडली आहे.राज्यात आघाडीकडून वेगवान घडामोडी घडत आहेत. मात्र, ठाण्यात मात्र काँग्रेस आणि राष्टÑवादीमध्ये एका मतदारसंघावरून आघाडीत बिब्बा पडला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्टÑवादीमध्ये एक समझोता झाला होता. त्यानुसार, मीरा-भार्इंदर हा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याचा निर्धार केला होता. त्या बदल्यात ठाणे शहर विधानसभा क्षेत्रात राष्टÑवादी लढणार हे निश्चित झाले होते.आता ऐन विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ठाणे शहर विधानसभा क्षेत्रावर दावा केला आहे. पूर्वीपासून हा मतदारसंघ काँग्रेसकडे होता, त्यामुळे तो मिळावा यासाठी पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यानुसार, श्रेष्ठींकडेही त्यांनी तशी मागणी केली आहे.मागील विधानसभा निवडणुकीचा विचार केला, तर या मतदारसंघातून काँग्रेस आणि राष्टÑवादी हे वेगळे लढले होते. त्यानुसार, काँग्रेसला या मतदारसंघातून १५ हजारांच्या आसपास तर राष्टÑवादीला २४ हजारांच्या आसपास मते मिळाली होती. परंतु, त्यानंतर झालेल्या ठाणे महापालिका निवडणुकीत काँग्रेसला या मतदारसंघातून भोपळासुद्धा फोडता आलेला नाही. तर, राष्टÑवादीचे येथे चार नगरसेवक निवडून आले. यामुळेच आता राष्टÑवादीने आपला दावा आणखी मजबूत केला आहे.ठाणे शहर मतदारसंघ मिळावा, ही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. मात्र, लोकसभेत ठरले असल्याने कोणत्याही परिस्थितीत ठाणे शहर विधानसभा सोडणार नाही.- आनंद परांजपे, ठाणे शहराध्यक्ष, राष्टÑवादीहा मतदारसंघ राष्टÑवादीला हवा असल्याची मध्यंतरी चर्चा होती. त्या अनुषंगाने ही मागणी करण्यात आली असावी. मात्र, या मतदारसंघाबाबत अद्यापही दोन्ही पक्षांकडून कोणत्याही प्रकारची चर्चा सुरू झालेली नाही. चर्चा झाल्यानंतरच हा मतदारसंघ कोणाला मिळणार, हे निश्चित होणार आहे.- मनोज शिंदे,ठाणे शहराध्यक्ष, काँग्रेस

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस