शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर लग्नसोहळे होणे म्हणजे वैचारिक दिवाळखोरी, राज ठाकरेंचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 17:33 IST

Mahrashtra Election 2019 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक गडकिल्ले लग्नसोहळ्यांसाठी भाड्याने देण्याच्या राज्य सरकारच्या विचारावर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी घणाघाती टीका केली आहे.

ठाणे - छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक गडकिल्ले लग्नसोहळ्यांसाठी भाड्याने देण्याच्या राज्य सरकारच्या विचारावर मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी घणाघाती टीका केली आहे. शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर लग्नसोहळे होणार, यासारखा दिवाळखोरी विचार कुठलाही नाही, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांची यंदाच्या विधानसभा निवडणुकीतील शेवटची प्रचारसभा आज ठाण्यात झाली. ठाणे शहरमधील मनसे उमेदवार अविनाश जाधव यांच्यासह पक्षाच्या इतर उमेदवारांना निवडून देण्याचा आवाहन करताना राज ठाकरे यांनी सत्ताधारी भाजपावर जोरदार टीका केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक गडकिल्ले लग्नसमारंभांसाठी भाड्याने देण्याचा विचार करत असलेल्या राज्य सरकारवर राज ठाकरे यांनी टीकेची तोफ डागली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक गडकिल्ल्यांवर लग्नसोहळे आयोजित होणे म्हणजे दिवाळखोरी विचार आहे. तोफ राज ठाकरे यांनी डागली. तसेच एवढे होऊनही महाराष्ट्र थंड आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. यावेळी राज ठाकरे यांनी कलम ३७० वरूनही भाजपावर निशाणा साधला. कलम ३७० चा महाराष्ट्रातील निवडणुकीशी काय संबंध? असा सवाल त्यांनी विचारला. ठाण्यातील भाड्याच्या घरात राहणारी माणसं हक्काच्या घरात कधी जाणार? खुल्या प्रवर्गातील मुलांना इंजिनियरिंग मेडिकलसाठी प्रवेश कधी मिळणार ते सांगा, असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Raj Thackerayराज ठाकरेthane-acठाणे शहरMNSमनसे