शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
2
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
3
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
4
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
5
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
6
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
7
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
8
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान
9
तुम्ही घर विकण्याचा प्लॅन करताय? आता भरावा लागेल कमी टॅक्स! प्राप्तीकर विभागाने जाहीर केला फॉर्म्युला!
10
“शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवले जातायत, शक्तिपीठ महामार्ग लोकांच्या विकासासाठी”: नितेश राणे
11
मंडप सजला, वऱ्हाडी जमले, तेवढ्यात पडली धाड, बोहल्यावरून वर पसार, कारण ऐकून वधूला बसला धक्का 
12
गिअरवाली बाईक, ती ही इलेक्ट्रीक...! काय मॅटर हाय...; २५ पैशांचा खर्च फक्त...
13
अवघ्या १० दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंडशी लग्न, लिवरपूलचा स्टार फुटबॉलपटू जग सोडून गेला; स्पेनमध्ये अपघात...
14
बंदुकीचा धाक दाखवून उचलून नेलं, लग्नही केलं... पाकिस्तानात १५ वर्षीय हिंदू मुलीचे झाले हाल
15
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
16
केरळमध्ये अडकलेल्या F-35 लढाऊ विमानाची दुरुस्ती अशक्य, तुकडे करुन ब्रिटनला घेऊन जाणार
17
एक रिपोर्ट आणि अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स आपटले; करून देत होते मोठा फायदा, आता नुकसान
18
बीडचे पालकमंत्री अजित पवारांच्या पुढाकाराने CIIITचा मार्ग खुला; जागा-निधी देण्याचा निर्णय
19
आज थांबवले नाही तर १०० टक्के उद्या...; मराठी बोलण्यास नकार दिल्यावरुन मारहाण, मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद
20
'माऊस जगलर' वापरून एकाचवेळी ५ कंपन्यात नोकरी; वर्षात ७ कोटींची कमाई; कसा झाला भांडाफोड?

Maharashtra Election 2019: स्ट्राँग रूमवर सीसीटीव्ही, सीआयएसएफ जवानांची नजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 06:25 IST

Maharashtra Election 2019: उल्हासनगर मतदारसंघातील इव्हीएम मशीन प्रांत कार्यालयातील स्ट्राँग रूममध्ये ठेऊन सीसीटीव्ही कॅमेरे व सीआयएसएफ जवानांचे संरक्षण असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पांडुरंग मुकदम यांनी दिली.

उल्हासनगर : उल्हासनगर मतदारसंघातील इव्हीएम मशीन प्रांत कार्यालयातील स्ट्राँग रूममध्ये ठेऊन सीसीटीव्ही कॅमेरे व सीआयएसएफ जवानांचे संरक्षण असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पांडुरंग मुकदम यांनी दिली.

दरम्यान, सोमवारी मतादानाच्या दिवशी शेवटच्या तासात नागरिकांनी मतदानासाठी गर्दी केल्याने अनेक ठिकाणी सायंकाळी आठनंतरही मतदान सुरू होते. त्यामुळे मतदानाची टक्केवारी कधी नव्हे ४६.८९ टक्यांवर गेली. यापूर्वी ३८ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले नव्हते.

उल्हासनगर मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत २४ टक्के तर पाचपर्यंत ३८ टक्के मतदान झाल्याचे दाखविण्यात आले. मात्र पाचनंतर नागरिकांनी मतदानकेंद्रावर एकच गर्दी केली. मतदान केंद्राबाहेर रांगेत उभे असलेल्यांना सायंकाळी सहा वाजता आतमध्ये घेत केंद्राचे प्रवेशद्बार बंद केले.

इव्हीएम मशीन व इतर साहित्य प्रांत कार्यालयात पोहचविण्यासाठी कर्मचाऱ्यांना सोमवारी रात्री १२ वाजले. रात्री एकनंतर सर्व इव्हीएम मशीन स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आले. स्ट्राँग रूमच्या आतबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून रूमबाहेर सीआयएसएफ जवान, सीआरपीएफ जवानांचे कडे उभारण्यात आले. तर प्रवेशद्बारावर स्थानिक पोलिसांचे संरक्षण ठेवले आहे. मंगळावारी सकाळी केंद्रीय निवडणूक निरीक्षक पथकाने निवडणूक यंत्रणेचा आढावा घेतला.

मुकदम यांनी मंगळवारी दुपारी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. यामध्ये उमेदवार व त्या प्रतिनिधींनी विविध सूचना केल्या. अपक्ष उमेदवार मिलिंद कांबळे यांनी पत्र देऊन स्ट्राँग रूम बाहेर व शेजारील मोबाइल टॉवरवर जॅमर लावण्याची मागणी केली. राष्ट्रवादीच्या उमेदवार ज्योती कलानी यांनी सकाळीच मुख्य पदाधिकाऱ्यांची बैेठक घेऊन निवडणुकीतील माहिती घेतली. भाजपचे कुमार आयलानी यांनीही पदाधिकाºयांची बैठक घेऊन निवडणुकीबाबत माहिती घेतली. रिपाइंचे बंडखोर भगवान भालेराव यांनी सकाळी कार्यकर्त्यांची भेट घेतली.

महिला कर्मचाºयांचे हाल, गोंधळ कायम

शेवटच्या तासात नागरिकांनी मतदान करण्यासाठी एकच गर्दी केल्याने बहुतांश मतदानकेंद्रावर रात्री आठपर्र्यंत मतदान सुरू होते. इव्हीएम मशीनसह इतर साहित्य प्रांत कार्याल्यात आणून ती जमा करण्यासाठी रात्रीचे बारा वाजले. यामध्ये महिला कर्मचाºयांना थांबविल्याने त्यांचे हाल झाले. सुदैवाने त्याठिकाणी जेवणाची व्यवस्था केली होती.

महाराष्ट्रात कमी मतदानाची नोंद उल्हासनगरमध्ये होते की काय? अशी परिस्थिती पाचेपर्यंत होती. मतदान आठनंतर सुरू असल्याने टक्केवारीत गोंधळ झाला. अखेर ४६. ८९ टक्के मतदान झाल्याचे जाहीर करण्यात आले. वाढलेली मतदानाची टक्केवारी कुणाच्या पदरात पडणार अशी चर्चा सुरू झालीआहे.

टॅग्स :PoliceपोलिसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019