शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

Maharashtra Election 2019: स्ट्राँग रूमवर सीसीटीव्ही, सीआयएसएफ जवानांची नजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 06:25 IST

Maharashtra Election 2019: उल्हासनगर मतदारसंघातील इव्हीएम मशीन प्रांत कार्यालयातील स्ट्राँग रूममध्ये ठेऊन सीसीटीव्ही कॅमेरे व सीआयएसएफ जवानांचे संरक्षण असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पांडुरंग मुकदम यांनी दिली.

उल्हासनगर : उल्हासनगर मतदारसंघातील इव्हीएम मशीन प्रांत कार्यालयातील स्ट्राँग रूममध्ये ठेऊन सीसीटीव्ही कॅमेरे व सीआयएसएफ जवानांचे संरक्षण असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पांडुरंग मुकदम यांनी दिली.

दरम्यान, सोमवारी मतादानाच्या दिवशी शेवटच्या तासात नागरिकांनी मतदानासाठी गर्दी केल्याने अनेक ठिकाणी सायंकाळी आठनंतरही मतदान सुरू होते. त्यामुळे मतदानाची टक्केवारी कधी नव्हे ४६.८९ टक्यांवर गेली. यापूर्वी ३८ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले नव्हते.

उल्हासनगर मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत २४ टक्के तर पाचपर्यंत ३८ टक्के मतदान झाल्याचे दाखविण्यात आले. मात्र पाचनंतर नागरिकांनी मतदानकेंद्रावर एकच गर्दी केली. मतदान केंद्राबाहेर रांगेत उभे असलेल्यांना सायंकाळी सहा वाजता आतमध्ये घेत केंद्राचे प्रवेशद्बार बंद केले.

इव्हीएम मशीन व इतर साहित्य प्रांत कार्यालयात पोहचविण्यासाठी कर्मचाऱ्यांना सोमवारी रात्री १२ वाजले. रात्री एकनंतर सर्व इव्हीएम मशीन स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आले. स्ट्राँग रूमच्या आतबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून रूमबाहेर सीआयएसएफ जवान, सीआरपीएफ जवानांचे कडे उभारण्यात आले. तर प्रवेशद्बारावर स्थानिक पोलिसांचे संरक्षण ठेवले आहे. मंगळावारी सकाळी केंद्रीय निवडणूक निरीक्षक पथकाने निवडणूक यंत्रणेचा आढावा घेतला.

मुकदम यांनी मंगळवारी दुपारी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. यामध्ये उमेदवार व त्या प्रतिनिधींनी विविध सूचना केल्या. अपक्ष उमेदवार मिलिंद कांबळे यांनी पत्र देऊन स्ट्राँग रूम बाहेर व शेजारील मोबाइल टॉवरवर जॅमर लावण्याची मागणी केली. राष्ट्रवादीच्या उमेदवार ज्योती कलानी यांनी सकाळीच मुख्य पदाधिकाऱ्यांची बैेठक घेऊन निवडणुकीतील माहिती घेतली. भाजपचे कुमार आयलानी यांनीही पदाधिकाºयांची बैठक घेऊन निवडणुकीबाबत माहिती घेतली. रिपाइंचे बंडखोर भगवान भालेराव यांनी सकाळी कार्यकर्त्यांची भेट घेतली.

महिला कर्मचाºयांचे हाल, गोंधळ कायम

शेवटच्या तासात नागरिकांनी मतदान करण्यासाठी एकच गर्दी केल्याने बहुतांश मतदानकेंद्रावर रात्री आठपर्र्यंत मतदान सुरू होते. इव्हीएम मशीनसह इतर साहित्य प्रांत कार्याल्यात आणून ती जमा करण्यासाठी रात्रीचे बारा वाजले. यामध्ये महिला कर्मचाºयांना थांबविल्याने त्यांचे हाल झाले. सुदैवाने त्याठिकाणी जेवणाची व्यवस्था केली होती.

महाराष्ट्रात कमी मतदानाची नोंद उल्हासनगरमध्ये होते की काय? अशी परिस्थिती पाचेपर्यंत होती. मतदान आठनंतर सुरू असल्याने टक्केवारीत गोंधळ झाला. अखेर ४६. ८९ टक्के मतदान झाल्याचे जाहीर करण्यात आले. वाढलेली मतदानाची टक्केवारी कुणाच्या पदरात पडणार अशी चर्चा सुरू झालीआहे.

टॅग्स :PoliceपोलिसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019