शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

Vidhan sabha 2019 : ठाणे शहर मतदारसंघात तिरंगी लढत; भाजपला मनसेसह राष्ट्रवादीचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 01:25 IST

ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात भाजपकडून पुन्हा एकदा संजय केळकर यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे.

ठाणे : ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात भाजपकडून पुन्हा एकदा संजय केळकर यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीकडून सुहास देसाई यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. तर, मनसेकडून अविनाश जाधव हे मैदानात उतरणार असल्याने येथे तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. या मतदारसंघात सध्या शिवसेना व भाजपचे वर्चस्व आहे. तो मिळावा, यासाठी शिवसेनेच्या स्थानिक पदाधिका-यांकडून हालचाली सुरू होत्या. मात्र, पक्षाने या मतदारसंघाची मागणीच केली नसल्याचे उघड झाले आहे. तर, स्थानिक पदाधिका-यांच्या विरोधानंतरही भाजप श्रेष्ठींनी आमदार संजय केळकर यांनाच उमेदवारी दिली आहे. या विधानसभा क्षेत्रात ब्राह्मण, गुजराथी आणि उच्चभ्रू मतदारांची संख्या जास्तीची आहे. त्यामुळे याचा फायदा हा मागील कित्येक वर्षे शिवसेना आणि भाजपच्याच उमेदवाराला झालेला दिसून आला आहे. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत येथून भाजपचे संजय केळकर यांनी शिवसेनेचे रवींद्र फाटक यांचा पराभव केला होता. केळकर यांना ७० हजार ८८४ मते मिळाली होती. तर, मनसेचे निलेश चव्हाण यांना अवघी आठ हजार ३३८ मते मिळाली होती. आता ते भाजपमध्ये डेरेदाखल झाले आहेत. परंतु, २००९ च्या तुलनेत २०१४ मध्ये मनसेच्या मतांमध्ये तब्बल २७ टक्क्यांची घट झाल्याचे दिसून आले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही मनसेने आपला उमेदवार उभा केला नसल्याने मनसेला या मतदारसंघातून किती मते मिळणार, याचा अंदाज अद्यापही पक्षाला बांधता आलेला नाही. दरम्यान, राष्टÑवादीने सुहास देसाई यांना संधी दिली असून राबोडीतील मतांचा फायदा त्यांना होणार असला, तरी शहरातील इतर पट्ट्यातून मते मिळविण्यासाठी त्यांना कसरत करावी लागणार आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019thane-acठाणे शहर