शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
3
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
5
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
6
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
7
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
8
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
9
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
10
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
11
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
12
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
13
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
14
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
15
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
16
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
17
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
18
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?
19
Jaipur Accident: डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
20
बापरे! तब्बल ८८ कोटीला एक टॉयलेट सीट विकतोय 'हा' माणूस; अखेर इतकी महाग का आहे?

भिवंडीत भातशेतीचे नुकसान; तालुक्यातील शेतकरी चिंतातुर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 06:11 IST

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी कापणी केलेल्या भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

- नितीन पंडित 

भिवंडी : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी कापणी केलेल्या भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कृषी व महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. या पावसामुळे तालुक्यातील तीन हजार हेक्टर हळव्या भातपिकाचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

भिवंडीत हळवे व गरवे अशी एकूण १८ हजार हेक्टर भातशेती आहे. त्यापैकी तीन हजार हेक्टर भातशेतीमध्ये हळवे पीक घेण्यात आले असून ते पीक पूर्णत: तयार झाल्याने शेतकऱ्यांनी दिवाळीपूर्वी भातपिकाची कापणी करून ते घरात आणण्यासाठी लगबग सुरू केली आहे. बहुतांश भागात शेतकºयांनी पाच दिवसांपासून हळव्या भाताची कापणी केली. मात्र, पावसाची रिपरिप सुरू असल्यामुळे कापणी केलेल्या भाताची करपे शेतामधील पाण्यात तरंगू लागली आहेत. रिमझिम पडणारा पाऊस आणखी काही दिवस असाच सुरू राहिल्यास भाताच्या कणसांना मोड येऊन पिकाची नासाडी होणार आहे. त्यामुळे शेतकºयांवर खावटीचे संकट निर्माण होणार आहे. तर, वर्षभर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, यामध्ये शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. यावर्षी उत्तम पावसामुळे शेतात सोन्यासारखे भाताचे पीक आले होते. बळीराजा आनंदित होता. मात्र, परतीच्या पावसाने पाणी फिरवले आहे.

भिवंडी तालुक्यातील पडघा, अंबाडी, खानिवली, वडवली, अनगाव, कवाड, कुंदे, दिघाशी, नांदकर, बापगाव, मुठवळ, चिंबीपाडा, कुहे, धामणे, खारबाव, पाये, पायगाव, खार्र्डी, एकसाल, सागाव, जुनांदुर्खी, टेंभवली, पालिवली, गाणे, फिरिंगपाडा, बासे, मैदे, पाश्चापूर आदी गावांसह तालुक्यातील अन्य शेतकºयांनी तयार झालेल्या हळव्या भातपिकाची कापणी सुरू केली आहे. दोन दिवसांपासून वरुणराजाची बळीराजावर अवकृपा झाल्याने शेतात सर्वत्र पाणीचपाणी साचले आहे. त्यामुळे कापणी केलेल्या भाताची करपे पाण्यावर तरंगल्याने पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकºयांसमोर वर्षभराच्या खावटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. जर परतीचा पाऊस आणखी काही दिवस असाच पडत राहिला, तर २०१७ प्रमाणेच शेतकºयांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे बळीराजा आणखी कर्जबाजारी होण्याची शक्यता वाढली आहे. सरकारने शेतकºयांना मदत करावी, अशी मागणी होत आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीची लगबग असल्याने महसूल विभागाचे कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त आहेत. यामुळे शेतीचे पंचनामे सध्या तरी होणे शक्य नसल्याने शेतकºयांवर आणखी एक संकट ओढवले आहे.

दरम्यान, महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी विधानसभा निवडणुकीच्या कामात गुंतलेले आहेत. त्यामुळे निवडणूक प्रक्रि या संपताच सरकारी आदेशानुसार नुकसानग्रस्त भातशेतीचे पंचनामे करून शेतकºयांना अधिकाधिक आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी प्रतिक्रि या तहसीलदार शशिकांत गायकवाड यांनी दिली आहे.भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकºयाला हेक्टरी २५ हजारांची मदत उपलब्ध करून दिली पाहिजे, अशी मागणी खानिवली ग्रुप विविध शेतकरी कार्यकारी सेवा संस्थेचे अध्यक्ष किरण रामचंद्र वारघडे यांनी केली आहे .

शेती हेच उत्पन्नाचे साधन

मुरबाड : पावसामुळे मुरबाड तालुक्यासह म्हसा परिसरात अचानक झालेल्या पावसाने भातपिकाचे नुकसान झाले आहे.हलवार जातीचे पीक हे लवकर तयार होणारे आहे. मधल्या काळात पावसानेही विश्रांती घेतली होती. त्यामुळे तयार झालेले पीक कापण्यास शेतकºयांनी सुरुवात केली होती. आज कापलेले पीक उन्हात सुकल्यानंतर साधारणपणे दुसºया दिवशी घरात किंवा खळ्यात साठवले जाते. परंतु, शनिवारी दुपारी म्हसा पंचक्र ोशीत अचानक मुसळधार पाऊस झाल्याने कापलेले सर्व पीक भिजून गेल्याने कापलेल्या भाताचे नुकसान झाले. शेती हेच उत्पनाचे साधन असल्याने पावसाच्या या लहरीपणामुळे नुकसान होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी