शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत भातशेतीचे नुकसान; तालुक्यातील शेतकरी चिंतातुर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 06:11 IST

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी कापणी केलेल्या भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

- नितीन पंडित 

भिवंडी : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी कापणी केलेल्या भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कृषी व महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. या पावसामुळे तालुक्यातील तीन हजार हेक्टर हळव्या भातपिकाचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

भिवंडीत हळवे व गरवे अशी एकूण १८ हजार हेक्टर भातशेती आहे. त्यापैकी तीन हजार हेक्टर भातशेतीमध्ये हळवे पीक घेण्यात आले असून ते पीक पूर्णत: तयार झाल्याने शेतकऱ्यांनी दिवाळीपूर्वी भातपिकाची कापणी करून ते घरात आणण्यासाठी लगबग सुरू केली आहे. बहुतांश भागात शेतकºयांनी पाच दिवसांपासून हळव्या भाताची कापणी केली. मात्र, पावसाची रिपरिप सुरू असल्यामुळे कापणी केलेल्या भाताची करपे शेतामधील पाण्यात तरंगू लागली आहेत. रिमझिम पडणारा पाऊस आणखी काही दिवस असाच सुरू राहिल्यास भाताच्या कणसांना मोड येऊन पिकाची नासाडी होणार आहे. त्यामुळे शेतकºयांवर खावटीचे संकट निर्माण होणार आहे. तर, वर्षभर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, यामध्ये शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. यावर्षी उत्तम पावसामुळे शेतात सोन्यासारखे भाताचे पीक आले होते. बळीराजा आनंदित होता. मात्र, परतीच्या पावसाने पाणी फिरवले आहे.

भिवंडी तालुक्यातील पडघा, अंबाडी, खानिवली, वडवली, अनगाव, कवाड, कुंदे, दिघाशी, नांदकर, बापगाव, मुठवळ, चिंबीपाडा, कुहे, धामणे, खारबाव, पाये, पायगाव, खार्र्डी, एकसाल, सागाव, जुनांदुर्खी, टेंभवली, पालिवली, गाणे, फिरिंगपाडा, बासे, मैदे, पाश्चापूर आदी गावांसह तालुक्यातील अन्य शेतकºयांनी तयार झालेल्या हळव्या भातपिकाची कापणी सुरू केली आहे. दोन दिवसांपासून वरुणराजाची बळीराजावर अवकृपा झाल्याने शेतात सर्वत्र पाणीचपाणी साचले आहे. त्यामुळे कापणी केलेल्या भाताची करपे पाण्यावर तरंगल्याने पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकºयांसमोर वर्षभराच्या खावटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. जर परतीचा पाऊस आणखी काही दिवस असाच पडत राहिला, तर २०१७ प्रमाणेच शेतकºयांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे बळीराजा आणखी कर्जबाजारी होण्याची शक्यता वाढली आहे. सरकारने शेतकºयांना मदत करावी, अशी मागणी होत आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीची लगबग असल्याने महसूल विभागाचे कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त आहेत. यामुळे शेतीचे पंचनामे सध्या तरी होणे शक्य नसल्याने शेतकºयांवर आणखी एक संकट ओढवले आहे.

दरम्यान, महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी विधानसभा निवडणुकीच्या कामात गुंतलेले आहेत. त्यामुळे निवडणूक प्रक्रि या संपताच सरकारी आदेशानुसार नुकसानग्रस्त भातशेतीचे पंचनामे करून शेतकºयांना अधिकाधिक आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी प्रतिक्रि या तहसीलदार शशिकांत गायकवाड यांनी दिली आहे.भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकºयाला हेक्टरी २५ हजारांची मदत उपलब्ध करून दिली पाहिजे, अशी मागणी खानिवली ग्रुप विविध शेतकरी कार्यकारी सेवा संस्थेचे अध्यक्ष किरण रामचंद्र वारघडे यांनी केली आहे .

शेती हेच उत्पन्नाचे साधन

मुरबाड : पावसामुळे मुरबाड तालुक्यासह म्हसा परिसरात अचानक झालेल्या पावसाने भातपिकाचे नुकसान झाले आहे.हलवार जातीचे पीक हे लवकर तयार होणारे आहे. मधल्या काळात पावसानेही विश्रांती घेतली होती. त्यामुळे तयार झालेले पीक कापण्यास शेतकºयांनी सुरुवात केली होती. आज कापलेले पीक उन्हात सुकल्यानंतर साधारणपणे दुसºया दिवशी घरात किंवा खळ्यात साठवले जाते. परंतु, शनिवारी दुपारी म्हसा पंचक्र ोशीत अचानक मुसळधार पाऊस झाल्याने कापलेले सर्व पीक भिजून गेल्याने कापलेल्या भाताचे नुकसान झाले. शेती हेच उत्पनाचे साधन असल्याने पावसाच्या या लहरीपणामुळे नुकसान होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी