शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

ठाणे जिल्ह्यातील ४९ गांवामधील २५२ हेक्टरवरील भेंडी, काकडी, मिरचीचे नुकसान

By सुरेश लोखंडे | Updated: November 30, 2023 18:14 IST

भरपाईस अनुसरून शासनाकडेन सबंधीत शेतकऱ्यांची शिफारसही करण्यात आल्याचा दुजाेरा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी दीपक कुटे यांनी सांगितले.

ठाणे : समुद्रात कमी दाबाचा पट्टानिर्माण झाल्यामुळे जिल्ह्यात शनिवार, रविवार, साेमवार या तीन दिवसांच्या कालावधीत अवकाळी पाऊस पडला त्यामुळे ४९ गावांमधील २५१.८० हेक्टरवरील काकडी, मिरची , भेंडी भाजीपाल्याचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्या सर्वेक्षणातून निश्चित झाले आहे. त्यांच्या भरपाईस अनुसरून शासनाकडेन सबंधीत शेतकऱ्यांची शिफारसही करण्यात आल्याचा दुजाेरा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी दीपक कुटे यांनी सांगितले.

जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह ढगांच्या गडगडाटात शहरी व ग्रामीण भागात अवकाळी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्याच्या हाती आलेल्या पिकांचे व रब्बीच्या भाजीपाल्याचे नुकसान झाले. त्याची दखल घेऊन राज्य शासनाने तत्काळ नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश जारी केले. त्यानुसार जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड तालुक्यातील एक हजार ७२७ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांच्या या २५१.८० हेक्टर रब्बीचा भाजीपाला, मिरची, भेंडी, हरभरा, वाल आणि भाताच्या नुकसानीचा पंचनामा पूर्ण झाला आहे. त्यानुसार नुकसानीस पात्र असलेल्या या शेतकऱ्यांची शिफारस कृषी विभागाने विभागीय आयुक्तालयाकडे केली आहे.

या पावसादरमयान वीटभट्टीच्या नुकसानीसह घरांवरील पत्र उडाल्याच्या घटनाही यावेळी घटल्या आहेत. त्यांच्या नाेंदी महसूल विभागानेही केल्या आहेत. शेतीच्या नुकसानीमध्ये ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांमध्ये २५६ जणांचा समावेश आहे. त्यांच्या शेतातील ९१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये तूर, वाल,आंबा, मिरची,काकडी, भेंडी आदींचा समावेश आहे. या नुकसानीमध्ये शहापूर तालुक्यातील ३४ गावांमधील १९० शेतकऱ्यांचे ७२.२६ हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे झाले आहेत. तर मुरबाड तालुक्यातील ७५ शेतकऱ्याच्या १९ हेक्टरमधील पिकांचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले आहे

या अवकाळी पावसामुळे ३३ टक्केपेक्षा कमी नुकसान झालेल्या शेतकऱ्यामध्ये जिल्ह्याभरातील एक हजार ४६२ शेतकऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक मुरबाड तालुक्यातील एक हजार ४०२ शेतकऱ्याचा समावेश आहे. त्यांच्या १५३.४८ हेक्टरवरील रब्बीच्या पिकांचे नुकसान झाले आहे. याखालाेखाल शहापूर तालुक्यातील ६० शेतकऱ्यांच्या सात हेक्टरवरील शेतीचे नुकसा झाले आहे.

टॅग्स :thaneठाणेRainपाऊस