शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

ठाणे जिल्ह्यातील ४९ गांवामधील २५२ हेक्टरवरील भेंडी, काकडी, मिरचीचे नुकसान

By सुरेश लोखंडे | Updated: November 30, 2023 18:14 IST

भरपाईस अनुसरून शासनाकडेन सबंधीत शेतकऱ्यांची शिफारसही करण्यात आल्याचा दुजाेरा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी दीपक कुटे यांनी सांगितले.

ठाणे : समुद्रात कमी दाबाचा पट्टानिर्माण झाल्यामुळे जिल्ह्यात शनिवार, रविवार, साेमवार या तीन दिवसांच्या कालावधीत अवकाळी पाऊस पडला त्यामुळे ४९ गावांमधील २५१.८० हेक्टरवरील काकडी, मिरची , भेंडी भाजीपाल्याचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्या सर्वेक्षणातून निश्चित झाले आहे. त्यांच्या भरपाईस अनुसरून शासनाकडेन सबंधीत शेतकऱ्यांची शिफारसही करण्यात आल्याचा दुजाेरा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी दीपक कुटे यांनी सांगितले.

जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह ढगांच्या गडगडाटात शहरी व ग्रामीण भागात अवकाळी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्याच्या हाती आलेल्या पिकांचे व रब्बीच्या भाजीपाल्याचे नुकसान झाले. त्याची दखल घेऊन राज्य शासनाने तत्काळ नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश जारी केले. त्यानुसार जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड तालुक्यातील एक हजार ७२७ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांच्या या २५१.८० हेक्टर रब्बीचा भाजीपाला, मिरची, भेंडी, हरभरा, वाल आणि भाताच्या नुकसानीचा पंचनामा पूर्ण झाला आहे. त्यानुसार नुकसानीस पात्र असलेल्या या शेतकऱ्यांची शिफारस कृषी विभागाने विभागीय आयुक्तालयाकडे केली आहे.

या पावसादरमयान वीटभट्टीच्या नुकसानीसह घरांवरील पत्र उडाल्याच्या घटनाही यावेळी घटल्या आहेत. त्यांच्या नाेंदी महसूल विभागानेही केल्या आहेत. शेतीच्या नुकसानीमध्ये ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांमध्ये २५६ जणांचा समावेश आहे. त्यांच्या शेतातील ९१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये तूर, वाल,आंबा, मिरची,काकडी, भेंडी आदींचा समावेश आहे. या नुकसानीमध्ये शहापूर तालुक्यातील ३४ गावांमधील १९० शेतकऱ्यांचे ७२.२६ हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे झाले आहेत. तर मुरबाड तालुक्यातील ७५ शेतकऱ्याच्या १९ हेक्टरमधील पिकांचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले आहे

या अवकाळी पावसामुळे ३३ टक्केपेक्षा कमी नुकसान झालेल्या शेतकऱ्यामध्ये जिल्ह्याभरातील एक हजार ४६२ शेतकऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक मुरबाड तालुक्यातील एक हजार ४०२ शेतकऱ्याचा समावेश आहे. त्यांच्या १५३.४८ हेक्टरवरील रब्बीच्या पिकांचे नुकसान झाले आहे. याखालाेखाल शहापूर तालुक्यातील ६० शेतकऱ्यांच्या सात हेक्टरवरील शेतीचे नुकसा झाले आहे.

टॅग्स :thaneठाणेRainपाऊस