शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

लाँग वीकेण्ड : पिकनिकच्या मूडवर आले ‘वरसावे विघ्न’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 11:25 IST

मुंबईतून इतर राज्यांत जाण्यासाठी ठाणे जिल्ह्याशिवाय पर्याय नाही. शेजारील गुजरात राज्यात जाणारी बहुसंख्य अवजड वाहने ठाणे शहरातूनच जात असल्याने व त्यापैकीच एक रसायनाने भरलेला टँकर गुरुवारी दुपारी वरसावे पुलाजवळ उलटल्याने सलग सुट्यांमुळे फिरायला निघालेल्या हजारो वाहनचालकांना सात ते आठ तासांच्या जीवघेण्या वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. कधी अपघातामुळे तर कधी दुरुस्तीच्या कामामुळे वरसावे पुलावरून होणारी वाहतूक बंद होते किंवा वळवलेली असल्याने प्रवाशांचे हाल होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.

ठाणे : मुंबईतून इतर राज्यांत जाण्यासाठी ठाणे जिल्ह्याशिवाय पर्याय नाही. शेजारील गुजरात राज्यात जाणारी बहुसंख्य अवजड वाहने ठाणे शहरातूनच जात असल्याने व त्यापैकीच एक रसायनाने भरलेला टँकर गुरुवारी दुपारी वरसावे पुलाजवळ उलटल्याने सलग सुट्यांमुळे फिरायला निघालेल्या हजारो वाहनचालकांना सात ते आठ तासांच्या जीवघेण्या वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. कधी अपघातामुळे तर कधी दुरुस्तीच्या कामामुळे वरसावे पुलावरून होणारी वाहतूक बंद होते किंवा वळवलेली असल्याने प्रवाशांचे हाल होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.शुक्रवारपासून तीन दिवस सलग सुटी व त्यातच गुलाबी थंडीत झालेली वाढ अशा दुग्धशर्करा योगामुळे मुंबई, ठाण्यातील अनेक कुटुंबांनी बाहेरगावी जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, टँकर उलटल्याने त्यांच्या पिकनिकमध्ये वाहतूककोंडीचे विघ्न आले. वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्याने आणि तासन्तास कोंडीत अडकल्याने कुठून ही अवदसा आठवली, अशी अनेकांची अवस्था झाली. वीकेण्डला वरसावे पूल परिसरात वाहतूककोंडी ही नित्याची बाब होऊन बसली आहे. मात्र, शहरातील मोठ्या प्रमाणात अवजड वाहने येजा करीत असतात. त्यामध्ये ज्वलनशील पदार्थ असलेले टँकर, भले मोठे कंटेनर यांचा समावेश आहे. प्रामुख्याने ही अवजड वाहने गुजरातकडे जाण्यासाठी ठाण्यातील घोडबंदर रोड, मुंबई-नाशिक महामार्गावरून जातात. गुरुवारी गुजरातकडे जाणारा टँकर वरसावे पुलाजवळ उलटल्याने घोडबंदर रोडवर वाहतूककोंडी झाली. शहरातून गुजरातकडे तातडीने जाण्यासाठी भिवंडीमार्गे वाहतूक वळवण्यात आली. भिवंडीतील रस्ते अरुंद असून कमालीचे खराब आहेत. त्यामुळे भिवंडीतून गुजरातच्या दिशेने जाताना प्रवाशांना अक्षरश: होडीत बसून प्रवास केल्याचा अनुभव आला. याचा फटका मुंब्रा रोडवरील वाहतुकीला बसला. शहरातील वाहतुकीवर याचा परिणाम झाला नसल्याचा दावा वाहतूक विभागाने केला.टँकर, कंटेनर असे अवजड वाहन उलटल्यावर वाहतूक पोलिसांना तत्परतेने त्याची माहिती देण्याऐवजी चालक तेथून थेट पळ काढतो. समजा, आजूबाजूने जाणा-या एखाद्या वाहनचालकाने तातडीने तक्रार द्यायचे ठरवल्यास अशा घटनांची सूचना देण्याकरिता शासनाने जाहीर केलेले हेल्पलाइन नंबर नादुरुस्त असतात. त्यामुळे फोन नं. १०० अथवा १०१ वर कॉल करण्याखेरीज पर्याय नसतो. हे नंबर नेहमीच बिझी असल्याने तेथे वारंवार फोन करण्याशिवाय गत्यंतर नसते. गुरुवारीही याच अनुभवातून अपघाताचे प्रत्यक्षदर्शी गेल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. टँकर अथवा कंटेनर उलटल्यावर तो उचलण्यासाठी ठाणे शहर वा ग्रामीण पोलिसांंकडे मोठ्या क्रेन उपलब्ध नसल्याने खाजगी मालकाकडून या क्रेन मिळवण्याकरिता खटपट करावी लागते. ती जर अगोदरच एखाद्या साइटवर कामात व्यस्त असेल, तर क्रेनसाठी बरीच यातायात करावी लागते. वाहतूक पोलिसांवर अक्षरश: क्रेनमालकांची हांजी-हांजी करण्याची वेळ ओढवते. क्रेनचा खर्च करण्यास उलटलेल्या टँकर-कंटेनरचा मालक तयार होत नाही. गुरुवारी याच समस्यांचे अग्निदिव्य पार पाडायला लागल्याचे वाहतूक पोलीस सूत्रांनी सांगितले. त्यातच, रसायनाचा टँकर उलटल्यावर त्यातून बाहेर पडणाºया वायू अथवा रसायनांमुळे मोठा अनर्थ घडण्याची शक्यता असते. त्यामुळे ज्या भागात ही घटना घडली आहे, तेथील वाहतूक काही अंतरावर तासन्तास थांबवावी लागते. अनेक वाहनचालक घाईत असल्याने ते पोलिसांसोबत हुज्जत घालतात, वाद करतात. हेच चित्र गुरुवारी दिसले. वायुगळती थांबल्याचे स्पष्ट झाल्यानंतर हळूहळू वाहतूक पूर्वपदावर आली. पण, त्यासाठी सात ते आठ तास लागले.उलटलेला टँकर- कंटेनर हलवण्यास ठाण्यासारख्या शहरात यंत्रणा नाही, ही मूळ शोकांतिका आहे. त्यामुळे वरसावे पूल व आजूबाजूच्या परिसरातील वाहतूककोंडीत भर पडली. त्यातच लाँग वीकेण्ड असल्याने शहरातून बाहेर जाणाºया वाहनांची संख्या नेहमीपेक्षा जास्त असल्याने व्यवस्था साफ कोलमडली.गतवर्षी जुलैमध्ये सात तास कोंडी -ठाण्यातून वसईच्या दिशेने जाणारा एलपीजीचा टँकर ६ जुलै २०१७ रोजी दुपारी १ च्या सुमारास घोडबंदर रोडवरील काजूपाड्याजवळ असाच उलटला. या टँकरमधून अतिज्वलनशील वायूची गळती सुरू झाल्याने अत्यंत वर्दळीच्या अहमदाबाद-मुंबई महार्गावरील घोडबंदर रोडवरील दोन्ही बाजूंची वाहतूक थांबवण्यात आली होती. मदतकार्यासाठी भारत गॅसच्या तज्ज्ञ पथकास ठाण्यात बोलावण्यात आले होते. हा टँकर हलवण्यासाठी सात तास लागल्याने प्रवासी हैराण झाले होते.वीकेण्डला दुरुस्तीचा बसला होता फटकाकळवा-विटावा पुलाच्या दुरुस्तीचे काम २२ डिसेंबर २०१७ रोजी हाती घेतले होते. त्यामुळे या दिवसांत सर्वत्र वाहतूककोंडी दिसत होती. याचदरम्यान, वीकेण्डमुळे ठाणेकरांना कोंडीला सामोरे जावे लागले होते.

 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी