शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019: ठाण्यातून आनंद परांजपे; तर कल्याणमधून बाबाजी पाटील?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 05:44 IST

राजन विचारे, डॉ. श्रीकांत शिंदे यांना देणार आव्हान

ठाणे : लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजताच ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेना-भाजपा युतीचे संभाव्य उमेदवार व विद्यमान खासदार राजन विचारे यांचा सामना करण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे उमेदवार या नात्याने आनंद परांजपे यांना संधी दिली जाणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा युतीचे संभाव्य उमेदवार व विद्यमान खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात राष्टÑवादीचे नगरसेवक बाबाजी पाटील यांचे नाव येथे अंतिम झाले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या दोघांच्या उमेदवारीची केवळ औपचारिक घोषणा शिल्लक आहे. त्यामुळे आता हळूहळू निवडणुकीतील लढतींचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे.शिवसेना व भाजपाची युती झाल्याने आणि पाकिस्तानवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर लोकशाही आघाडीत या दोन्ही मतदारसंघांतील उमेदवारांबाबत अनिश्चितता कायम होती. ठाणे लोकसभा मतदारसंघातून गणेश नाईक यांनी, तर कल्याण लोकसभा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड यांनी ही निवडणूक लढवावी, अशी पक्षश्रेष्ठींची प्रारंभी तीव्र इच्छा होती. नाईक यांच्यासाठी तर शेवटच्या क्षणापर्यंत श्रेष्ठी आग्रही होते. परंतु, या दोघांनी राज्याच्या राजकारणातून दूर जाण्यास नम्रपणे नकार दिल्याने अखेर ठाणे लोकसभा मतदारसंघातून आनंद परांजपे यांचे नाव अंतिम झाले आहे. तर, कल्याण लोकसभा मतदारसंघातून बाबाजी पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.याचसंदर्भात सोमवारी ठाण्यातील एका हॉटेलमध्ये गणेश नाईक, जितेंद्र आव्हाड, आनंद परांजपे, गटनेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील आणि नजीब मुल्ला यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत परांजपे आणि पाटील यांच्या नावांवर शिक्कामोर्तब होणार असल्याचे निश्चित झाले होते. परंतु, आव्हाड यांना मुंबईत कामानिमित्त जावे लागल्याने आणि नाईक गैरहजर राहिल्याने त्यावर शिक्कामोर्तब होऊ शकले नाही. मात्र, नवी मुंबईत आव्हाड आणि नाईक यांच्यात सायंकाळी बैठक झाली असून या दोन्ही नावांवर एकमत झाल्याची माहिती राष्टÑवादीच्या सूत्रांनी दिली. त्यामुळे आता केवळ औपचारिक घोषणाच शिल्लक आहे.दोघांनाही मतदारसंघ नवीनआनंद परांजपे यांनी यापूर्वी कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, आता ठाणे लोकसभा हा त्यांच्यासाठी नवा मतदारसंघ असणार आहे, तर बाबाजी पाटील ठाणे महापालिकेत नगरसेवक असून त्यांच्यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघ हा फारच नवीन आहे. परांजपे यांनी ठाणे शहरात सातत्याने केंद्र सरकारविरोधात केलेल्या आंदोलनांमुळे त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली असल्याचे समजते. दोन्ही उमेदवारांसमोर विद्यमान खासदारांचे आव्हान आहे. ते युतीच्या उमेदवाराला कशी टक्कर देतात, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९thaneठाणेkalyanकल्याण