शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमुळे व्यापारी व कामगारांची होणार उपासमार, उल्हासनगरात व्यापाऱ्यात असंतोष 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 15:03 IST

महापालिका कर्मचारी व पोलिसांनी सोमवारी रात्री ८ नंतर अत्यावश्यक सेवा सोडून सर्व दुकाने बंद राहणार असल्याची घोषणा केल्यानंतर व्यापारी व पोलीस आमने-सामने आले होते.

- सदानंद नाईक उल्हासनगर - आठवड्यातील ५ दिवस कडक निर्बंध तर शनिवार-रविवार कडक लॉकडाऊन असे गाजर दाखवून, ३० एप्रिल पर्यंत लॉकडाऊन केल्याचा आरोप व्यापारी संघटनेनी केला. सरकारने व्यापाऱ्यांची फसवणूक केली असून दुकाने बंदमुळे हजारो कामगाराचा रोजगार गेला असून भाजपानेही विरोध करीत निदर्शने केली.  (Lockdown will lead to starvation of traders and workers, dissatisfaction among traders in Ulhasnagar)

देशात औधोगिक शहर म्हणून उल्हासनगरचे नावलौकिक असून शहरात निर्माण होणाऱ्या जीन्स पॅन्टला देशात मागणी आहे. तर जपानी व गजानन मार्केट कपड्यासाठी प्रसिद्ध असून फर्निचर, बॅग, इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकल वस्तूला मोठी मागणी आहे. अश्या औधोगिक शहरातील दुकाने बंद राहिल्यास दुकानदारासह दुकाना मध्ये काम करणाऱ्या हजारो कामगारांवर उपासमारीची वेळ राज्य शासनाने घेतलेल्या लॉकडाऊन निर्णयामुळे येणार असल्याचा आरोप युटीए व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुमित चक्रवर्ती, कार्याध्यक्ष दीपक छतलानी, भाजप व्यापारी मंडळचे अध्यक्ष नरेश दुर्गानी, व्यापारी संघटनेचे परमानंद गिरेजा आदींनी केली. तसेच भाजपचे शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, आमदार कुमार आयलानी, नगरसेवक प्रदीप रामचंदानी, मनोज लासी, प्रकाश माखिजा आदींनी शासनाच्या निर्णयाचा विरोध केला आहे.

 महापालिका कर्मचारी व पोलिसांनी सोमवारी रात्री ८ नंतर अत्यावश्यक सेवा सोडून सर्व दुकाने बंद राहणार असल्याची घोषणा केल्यानंतर व्यापारी व पोलीस आमने-सामने आले होते. अखेर पोलीस प्रशासन व महापालिका अधिकाऱ्यांनी व्यापारी नेत्या सोबत चर्चा करून शासनाचा निर्णय अंतिम असल्याचे सांगून सहकार्य करण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आठवड्यातील ५ दिवस कडक निर्बंध तर शनिवार-रविवारी असे दोन दिवस कडक लॉकडाऊन करणार, असे व्यापाऱ्यांनी गृहीत धरले होते. प्रत्यक्षात ३० एप्रिल पर्यंत कडक लोकडाऊन जारी केला असून व्यापारी व दुकानात काम करणाऱ्या हजारो कामगारांवर उपासमारीची वेळ येणार असल्याची टीका व्यापारी संघटने कडून केली. आठवड्यातून ५ दिवस लॉकडाऊन काळात दुकानांना उघडण्यास मुभा देण्याची मागणी होत आहे. असे न झाल्यास शहरातील दुकानदार देशोधडीला लागण्याची शक्यता सुमित चक्रवर्ती यांनी व्यक्त केली आहे. 

व्यापारी संघटना मुख्यमंत्री यांना साकडेउल्हासनगर औघोगिक शहर असून लॉकडाऊन मुळे ही ओळख मिटण्याची शक्यता आहे. आठवड्यातून काही दिवस दुकाने सुरू ठेवण्याला मान्यता देण्यासाठी व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री यांची भेट घेऊन साकडे घालणार असल्याची प्रतिक्रिया व्यापारी संघटनेने दिलीं. दरम्यान भाजपचे आमदार कुमार आयलानी यांच्यासह शिष्टमंडळाने विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस यांना भेटून शहरातील समस्या बाबत माहिती दिली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसulhasnagarउल्हासनगर