शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिली ९४५ कोटी देणगी?
2
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
3
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
4
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
5
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
6
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
7
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
8
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
9
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
10
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
11
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
12
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
13
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
15
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
16
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
17
मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा
18
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास
19
कोण आहे सतीश शाह यांची पत्नी? दोघांना नव्हते मूल; जोडीदाराच्या निधनाने बसला धक्का
20
Virat Kohli: 'रन मशीन' विराटची गगनभरारी! संगकाराला पछाडलं, आता फक्त सचिन तेंडुलकर पुढे

Lockdown News: मुंबईत परतण्याऐवजी गावी जाऊन शेती करण्याचा कामगारांचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 07:17 IST

अनेक वर्षे मुंबई तसेच आजूबाजूच्या उपनगरांमध्ये काम करणारे बाधकाम क्षेत्रातील बिगारी, प्लंबर, मिस्त्री तसेच इतर क्षेत्रातील कामगार लॉकडाउनच्या दुसऱ्या टप्प्यापासून गावी जाण्यासाठी आतूर झाले होते.

कुमार बडदे  

मुंब्रा : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे बेरोजगार झालेले शहरातील विविध क्षेत्रातील कामगार मूळगावी जाण्याच्या तयारीत आहेत मूळगावी गेल्यानंतर शेती किंवा शेतात काम करण्याचा किंवा शेतीपुरक व्यवसाय करण्याचा निर्धार गावी जाण्याच्या तयारीत असलेल्या अनेकांनी व्यक्त केला आहे. यामुळे शेतीला भविष्यात पुन्हा सुगीचे दिवस येऊ शकतात.

अनेक वर्षे मुंबई तसेच आजूबाजूच्या उपनगरांमध्ये काम करणारे बाधकाम क्षेत्रातील बिगारी, प्लंबर, मिस्त्री तसेच इतर क्षेत्रातील कामगार लॉकडाउनच्या दुसऱ्या टप्प्यापासून गावी जाण्यासाठी आतूर झाले होते. परंतु, सर्वच प्रकारची वाहतूक व्यवस्था ठप्प होती. यामुळे परतण्याची इच्छा असलेल्यांना त्याच्या मूळगावी जाता आले नाही. लॉकडाउनच्या तिसºया टप्प्यात मात्र कामगारांना त्यांच्या मूळगावी जाता यावे, यासाठी सध्या सरकारकडून अंमलबजावणी सुरू आहे. या अंतर्गत बिहारमध्ये गावी जाण्यासाठी मुंब्रा पोलीस ठाण्यासमोरील जैन मंदिराच्या मैदानामध्ये मोठ्या प्रमाणात कामगार जमले. मंदिरासमोर जमले कामगार : मुंब्य्रातील जैन मंदिरासमोर कामगारांचा मोठा समूह जमला. त्यांचे प्रमुख नारायण गुप्ता, एम. कुमार आणि त्यांच्या पथकातील इतर सदस्यांनी मूळगावी जाऊन शेतात काम करण्याचा आणि त्याद्वारे आपल्या कुटुंबांचे भरणपोषण करण्याचा निर्धार व्यक्त केला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMigrationस्थलांतरण