शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

Lockdown News: गावी असलेल्या आप्तस्वकीयांकडून पैसे मागवून सुरू आहे उदरनिर्वाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 01:49 IST

लॉकडाउनचा परिणाम : कधी काळी त्यांनाच करायचे मदत

कुमार बडदे 

मुंब्रा : अन्नासाठी सुरु असलेल्या संघर्षामुळे कुटुंबीयांचे होत असलेले केविलवाणे चेहरे बघून कासावीस झालेल्या अनेक कुटुंबप्रमुखांनी मूळगावी असलेल्या त्यांच्या वृद्ध पालकांकडून तसेच आप्तस्वकीयांकडून पैसे मागवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवला आहे. आधी हिच मंडळी त्यांना नियमित पैसे पाठवयाची.

लॉकडाऊनच्या सुरुवातीला काही सामाजिक संस्थांनी तांदूळ, दाळ, तेल, मीठ अशा काही जीवनावश्यक वस्तुंचे वाटप केले. परंतु जसजसा लॉकडाऊनचा कालावधी वाढत गेला, तसतसा मदतीचा ओघही आटत गेला. एप्रिल महिन्यामध्ये पंधरा दिवस बहुतांश कुटुंबांना कम्युनिटी किचनच्या माध्यमातून जेवणाच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले. मात्र गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड स्वत:च क्वारंटाईन झाल्यानंतर काही दिवसांमध्ये अनेक ठिकाणी तीही मदत संपुष्टात आली. लॉकडाऊनच्या पहिल्या आणि दुसऱ्या सत्रात वाहतूक सेवा ठप्प होती. त्यामुळे मूळगावी जाणेही शक्य नव्हते. जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी खिशात पैसे नाही, सामाजिक संघटनांकडून मिळणारी मदतही बंद झाली, त्यामुळे कुटुंबातील सदस्यांची उपासमार बघून अनेकांनी मूळगावी असलेल्या आप्तस्वकीयांकडून बँकिंग सेवेच्या माध्यमातून पैसे मागवून उदरनिर्वाह सुरु केल्याची माहिती मूळगावी असलेल्या नातेवाईकांकडून आठ हजार रुपये मागवलेल्या लालबाबू कुमार गुप्ता या नाका कामगाराने ‘लोकमत’ला दिली.कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ४५ दिवसांपासून देशात लॉकडाउन सुरु आहे. त्यामुळे विविध क्षेत्रांतील कामकाज ठप्प झाले आहे. काही कामगारांनी जी काही तुटपुंजी रक्कम पदरमोड करुन जमा केली होती, ती लॉकडाउनच्या पहिल्या सत्रातच संपली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस