शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

Lockdown News: गावी जाऊ इच्छिणाऱ्यांनी गर्दी केल्याने गोंधळ; पोलिसांनी केली मध्यस्थी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 06:22 IST

वैद्यकीय तपासणीसाठी डोंबिवलीत झुंबड

डोंबिवली : गावाला जाण्यासाठी वैद्यकीय चाचणी करण्यासाठी केडीएमसीच्या ‘ग’, ‘फ’ प्रभाग क्षेत्र कार्यालयात बुधवारी नागरिकांनी गर्दी केल्याने फिजिकल डिस्टन्सचे तीनतेरा वाजल्याचे पाहायला मिळाले. अखेर, पोलिसांनी हटकल्यानंतर काही काळ तणाव निर्माण झाला होता.

केडीएमसीच्या कार्यालयांबाहेर पहाटेपासून नागरिकांनी रांग लावलेली होती. त्यात उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश व राजस्थानमध्ये जाणाºया नागरिकांची जास्त गर्दी होती. प्रभाग क्षेत्र कार्यालयात मात्र प्रवेशद्वारातून एकावेळी पाच ते सात जणांना प्रवेश दिला जात होता. त्यामुळे आत गर्दी नसली तरीही रस्त्यावर मात्र फतेह अली पथ, मेहता आणि फडके रोडवर नागरिकांची गर्दी झाली होती. पोलिसांनी त्यांना दुंडके घेत मोजमाप करून अंतर करून दिले होते. त्यानंतरही नागरिक ऐकत नव्हते. अखेरीस पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवत त्यांना वेगळे उभे राहण्याचे आवाहन केले. मात्र, महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांचे त्यात हाल झाले.स्थलांतरित कुटुंबाची अखेर पुणे येथे रवानगीलॉकडाउनपूर्वी टिटवाळ्यातील आपल्या नातेवाइकांकडे आल्यानंतर येथेच अडकून पडलेल्या एका कुटुंबाच्या कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर त्यांना शिधा आणि प्रवासखर्च देत त्यांच्या पुण्यातील मूळ गावी पाठविणाºया कल्याण गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि कर्मचाºयाचे कुटुंबांनी आभार मानले.

पुण्यातील ढेबेवाडी परिसरात राहणारे एक दाम्पत्य आपली पाचवर्षीय मुलगी, मेहुणी आणि सासूसह मोहने येथील आपल्या नातेवाइकांकडे राहायला आले होते. याच दरम्यान, लॉकडाउन जाहीर झाले. ज्या नातेवाइकांकडे हे कुटुंब राहायला आले होते, त्या नातेवाइकांचे घर लहान असल्याने त्यांच्याकडे इतके दिवस कसे राहायचे हा विचार करून या कुटुंबाने मोहने येथील निवारा केंद्रात आश्रय घेतला. या कुटुंबाला स्थानिक नगरसेवक आणि केडीएमसी प्रशासनातर्फे मागील महिनाभरापासून अन्नवाटप करण्यात येत होते.राज्यात आणि राज्याबाहेर अडकलेल्यांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी केंद्र शासनाने निर्देश जारी केले. त्यानंतर, कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद पंजे, पोलीस उपनिरीक्षक मारुती दिघे आदींनी या कुटुंबाची मोहने येथील निवारा केंद्रात भेट घेतली. या कुटुंबाची अडचण लक्षात घेत पोलीस अधिकाऱ्यांनी या कुटुंबीयांची केडीएमसीमार्फत वैद्यकीय तपासणी केली. तसेच, त्यांना लागणारे ना हरकत प्रमाणपत्र मिळवून देण्यास मदत केली.मोहने येथून त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी लागणाºया योग्य कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर पोलिसांनी या कुटुंबीयांना वाहनाची व्यवस्था करून दिली. तसेच, त्यांना आवश्यक शिधा व प्रवासासाठी मदत देऊन त्यांच्या गावी बुधवारी दुपारच्या सुमारास रवाना केले. त्यामुळे या कुटुंबियांनी पोलिसांचे आभार मानले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस