शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Lockdown News: गावी जाऊ इच्छिणाऱ्यांनी गर्दी केल्याने गोंधळ; पोलिसांनी केली मध्यस्थी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 06:22 IST

वैद्यकीय तपासणीसाठी डोंबिवलीत झुंबड

डोंबिवली : गावाला जाण्यासाठी वैद्यकीय चाचणी करण्यासाठी केडीएमसीच्या ‘ग’, ‘फ’ प्रभाग क्षेत्र कार्यालयात बुधवारी नागरिकांनी गर्दी केल्याने फिजिकल डिस्टन्सचे तीनतेरा वाजल्याचे पाहायला मिळाले. अखेर, पोलिसांनी हटकल्यानंतर काही काळ तणाव निर्माण झाला होता.

केडीएमसीच्या कार्यालयांबाहेर पहाटेपासून नागरिकांनी रांग लावलेली होती. त्यात उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश व राजस्थानमध्ये जाणाºया नागरिकांची जास्त गर्दी होती. प्रभाग क्षेत्र कार्यालयात मात्र प्रवेशद्वारातून एकावेळी पाच ते सात जणांना प्रवेश दिला जात होता. त्यामुळे आत गर्दी नसली तरीही रस्त्यावर मात्र फतेह अली पथ, मेहता आणि फडके रोडवर नागरिकांची गर्दी झाली होती. पोलिसांनी त्यांना दुंडके घेत मोजमाप करून अंतर करून दिले होते. त्यानंतरही नागरिक ऐकत नव्हते. अखेरीस पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवत त्यांना वेगळे उभे राहण्याचे आवाहन केले. मात्र, महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांचे त्यात हाल झाले.स्थलांतरित कुटुंबाची अखेर पुणे येथे रवानगीलॉकडाउनपूर्वी टिटवाळ्यातील आपल्या नातेवाइकांकडे आल्यानंतर येथेच अडकून पडलेल्या एका कुटुंबाच्या कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर त्यांना शिधा आणि प्रवासखर्च देत त्यांच्या पुण्यातील मूळ गावी पाठविणाºया कल्याण गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि कर्मचाºयाचे कुटुंबांनी आभार मानले.

पुण्यातील ढेबेवाडी परिसरात राहणारे एक दाम्पत्य आपली पाचवर्षीय मुलगी, मेहुणी आणि सासूसह मोहने येथील आपल्या नातेवाइकांकडे राहायला आले होते. याच दरम्यान, लॉकडाउन जाहीर झाले. ज्या नातेवाइकांकडे हे कुटुंब राहायला आले होते, त्या नातेवाइकांचे घर लहान असल्याने त्यांच्याकडे इतके दिवस कसे राहायचे हा विचार करून या कुटुंबाने मोहने येथील निवारा केंद्रात आश्रय घेतला. या कुटुंबाला स्थानिक नगरसेवक आणि केडीएमसी प्रशासनातर्फे मागील महिनाभरापासून अन्नवाटप करण्यात येत होते.राज्यात आणि राज्याबाहेर अडकलेल्यांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी केंद्र शासनाने निर्देश जारी केले. त्यानंतर, कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद पंजे, पोलीस उपनिरीक्षक मारुती दिघे आदींनी या कुटुंबाची मोहने येथील निवारा केंद्रात भेट घेतली. या कुटुंबाची अडचण लक्षात घेत पोलीस अधिकाऱ्यांनी या कुटुंबीयांची केडीएमसीमार्फत वैद्यकीय तपासणी केली. तसेच, त्यांना लागणारे ना हरकत प्रमाणपत्र मिळवून देण्यास मदत केली.मोहने येथून त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी लागणाºया योग्य कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर पोलिसांनी या कुटुंबीयांना वाहनाची व्यवस्था करून दिली. तसेच, त्यांना आवश्यक शिधा व प्रवासासाठी मदत देऊन त्यांच्या गावी बुधवारी दुपारच्या सुमारास रवाना केले. त्यामुळे या कुटुंबियांनी पोलिसांचे आभार मानले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस