शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

उपमहापौर भगवान भालेराव यांच्या जीवाला धोका?; म्हणून ठेवले खाजगी सरंक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 20:04 IST

Ulhasnagar News : या प्रतिक्रियेमुळे शहर राजकारणात एकच खळबळ उडाली असून येणाऱ्या महापालिका निवडणुकीत सत्तेची चावी रिपाइंकडे राहणार असल्याचे संकेत दिले. 

ठळक मुद्देमहापालिका स्थायी समिती सभापती पद मला नाहीतर शिवसेनेला नाही. या हट्टातून भालेराव यांनी शिवसेना मित्र पक्षातून बाहेर पडून भाजपकडे गेले.

सदानंद नाईक 

उल्हासनगर : शहरातील रिपाइंच्या वाढत्या प्रभावामुळे राजकीय हितचिंतकाकडून जीवाला धोका निर्माण झाल्याने, खाजगी बंदूकधारी सरंक्षण ठेवल्याची प्रतिक्रिया रिपाइंचे जिल्हाध्यक्ष व उपमहापौर भगवान भालेराव यांनी दिली. या प्रतिक्रियेमुळे शहर राजकारणात एकच खळबळ उडाली असून येणाऱ्या महापालिका निवडणुकीत सत्तेची चाबी रिपाइंकडे राहणार असल्याचे संकेत दिले. 

राज्यात व देशात रिपाइं आठवले गटाची आघाडी भाजप सोबत असताना, उल्हासनगरात रिपाइं भाजपऐवजी शिवसेने सोबत गेली. याला पक्षाचे शहरजिल्हाध्यक्ष भगवान भालेराव हे कारणीभूत आहेत. पक्षाचे सर्वेसर्वा रामदास आठवले यांनी शहाराध्यक्ष भगवान भालेराव यांच्या निर्णयाला आक्षेप घेतला नाही. दरम्यान महापौर निवडणूक वेळी सत्ताधारी भाजप मधील ओमी टीम समर्थक नगरसेवकांना शिवसेना गोटात आणण्याची किमया भगवान भालेराव यांच्यासह अन्य जणांनी पार पाडल्याने, शिवसेनेला महापौर तर भगवान भालेराव यांना उपमहापौर पद मिळाले. तसेच भाजपातील बंडखोर स्थायी समिती सदस्य विजय पाटील यांना शिवसेना, रिपाइं, राष्ट्रवादी पक्षाने पाठिंबा दिल्याने, ते स्थायी समिती सभापती निवडून आले. त्यानंतर स्थायी समिती सभापती पदावरून शिवसेना व भगवान भालेराव यांच्यात वाद निर्माण झाला.

 महापालिका स्थायी समिती सभापती पद मला नाहीतर शिवसेनेला नाही. या हट्टातून भालेराव यांनी शिवसेना मित्र पक्षातून बाहेर पडून भाजपकडे गेले. तसेच स्थायी समिती पदी भाजपचे टोनी सिरवानी यांना स्थायी समिती सभापती पदी निवडून आणले. शिवसेना युती पासून रिपाईने काडीमोड घेतल्यानेच, काही हितचिंतकाकडून माझ्या जिवाला धोका निर्माण झाल्याची माहिती उपमहापौर भालेराव यांनी पत्रकारांना दिली. दरम्यान पोलीस आयुक्तांना पोलीस संरक्षणाची मागणी केली. मात्र ती न मिळाल्याने, अखेर स्वतःच्या खर्चातून दोन खाजगी बंदूकधारी सरंक्षणासाठी ठेवल्याची माहिती त्यांनी दिली. गेल्या पाच वर्षात रिपाइंची ताकद वाढली असून येणाऱ्या महापालिका निवडणुकीत पालिका सत्तेची चाबी रिपाइंकडे असण्या इतपत नगरसेवक निवडून येणार असल्याची माहिती भालेराव यांनी दिली. यातूनच आपल्या जीविताला धोका निर्माण झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. एकूणच महापालिका निवडणुकी पूर्वीच एकमेका विरोधात चिखलफेक सुरू झाली आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरShiv SenaशिवसेनाBJPभाजपाRamdas Athawaleरामदास आठवलेPoliceपोलिस