शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

अंबरनाथ-बदलापूरच्या नागरिकांचा विश्वास जीवन प्राधिकरणाने गमावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 10:53 PM

पाणीपुरवठ्याचे काम करणारी आणि वितरणावर लक्ष ठेवणारी यंत्रणा म्हणून जीवन प्राधिकरण काम करत असले तरी अंबरनाथमध्ये ही यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरली आहे.

- पंकज पाटील, अंबरनाथउल्हास नदीच्या तीरावर वसलेल्या अंबरनाथ तालुक्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. केवळ उल्हास नदी नव्हे तर बारवी धरणातूनही पाणी उपलब्ध होईल, अशी यंत्रणा असतानाही अंबरनाथ आणि बदलापूरला पाणीसमस्येला सामोरे जावे लागत आहे. पाण्याचे योग्य नियोजन करून नागरिकांच्या तक्रारी कमी करण्याची जबाबदारी ज्या जीवन प्राधिकरणावर आहे, तेच प्राधिकरण आता शहरासाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज व्यक्त होत आहे. कारण महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने शहरवासीयांची विश्वासार्हता गमावली आहे. त्यामुळे जीवन प्राधिकरण हटाव शहर बचाव, अशी मोहीम हाती घेतली आहे.गेल्या काही वर्षांत जीवन प्राधिकरणाविषयी नाराजीचा सूर उमटत आहे. अंबरनाथ आणि बदलापूरसाठी सरकारने नगरोत्थान योजनेतूनच सर्वात आधी भरीव निधीची तरतूद केली. या निधीतून शहरातील पाण्याची वितरण व्यवस्था सुधारण्याचा प्रस्ताव होता. अर्थात त्या अनुषंगाने कामेही झाली. अनेक ठिकाणी जलकुंभ उभारले तर काही ठिकाणी जलवाहिन्या टाकण्यात आल्या. मात्र एवढे केल्यावर वितरण व्यवस्था सुधारेल इतकी माफक अपेक्षा केली जात होती. मात्र शहरातील वितरण व्यवस्थेत असलेल्या चुका तशाच ठेवत प्राधिकरणाने नव्या आणि जुन्या वाहिन्या एकत्रित सुरू ठेवल्या आहेत. त्यामुळे शहरातील पाणीगळतीचे प्रमाण किंचितही कमी झालेले नाही. राज्यातील सक्षम यंत्रणा म्हणून जीवन प्राधिकरणाकडे पाहिले जाते. पाणीपुरवठ्याचे काम करणारी आणि वितरणावर लक्ष ठेवणारी यंत्रणा म्हणून जीवन प्राधिकरण काम करत असले तरी अंबरनाथमध्ये ही यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरली आहे. बदलापूरमध्ये पाणीपुरवठा योजनेचे काम करत असताना केलेल्या चुकीचा भुर्दंड आजही या भागातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यानंतर आलेल्या अमृत योजनेच्या निधीचाही योग्य विनियोग अद्याप केलेला नाही. बदलापूरमधील यंत्रणा अपयशी ठरत असतानाच त्याची पुनरावृत्ती अंबरनाथमध्येही झाली. अंबरनाथमध्ये नगरोत्थान योजनेतील काही कामे अपुरी ठेवण्यात आली. जलवाहिन्या टाकण्याचे कामही पूर्ण झालेले नाही.अंबरनाथमध्येही जुन्या वाहिन्या तशाच ठेवत नव्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या. अनेक नागरिकांना दोनदोन ठिकाणी कनेक्शन घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पाण्याची गळती रोखण्याऐवजी पाण्याची गळती वाढविण्याचे काम प्राधिकरणाने केले आहे. १० वर्षांपूर्वी अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील पाणी वितरण व्यवस्थेत पाणीगळतीचे प्रमाण हे १७ टक्के होते. आज ही गळती दुप्पट झाली असून ती ३२ ते ३७ टक्क्यांच्या घरात गेली आहे. शहराला आवश्यक असलेला पाणीसाठा उचलण्यात येत असतानाही शहराला पाणीसमस्येला सामोरे जावे लागत आहे. पाणीगळती रोखण्यात आलेले अपयशच हेच मूळ समस्येचे कारण झाले आहे. कोट्यवधींचा निधी खर्च करूनही पाणीगळती रोखता आलेली नाही, तसेच वितरण व्यवस्थेत सुधारणाही करता आलेली नाही. सरकारचे सर्व अनुदान हे पालिकेकडे वर्ग होणार असतानाही पालिकेने पाणीपुरवठ्याचे काम करण्यासाठी प्राधिकरणाला निधी वर्ग केला. मात्र जबाबदार संस्थाच या कामात अपयशी ठरली आहे.ज्या चिखलोली धरणाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव मंजूर आहे, त्या चिखलोली धरणातील पाणी पिण्यायोग्य राहिलेले नाही. आजूबाजूच्या रासायनिक कंपन्यांमुळे धरणातील पाणी हे दूषित झाले आहे. त्याकडेही दुर्लक्ष करण्यात येत आहे. ज्या धरणातून १२ महिने पाणीपुरवठा होत होता. आज त्या धरणातील दूषित पाणी पिण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. ही यंत्रणाही प्राधिकरणाकडे असून ती यंत्रणा सक्षमपणे चालविण्यात अपयश आले आहे.नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागणारनागरिकांना आवश्यक असलेले पाणी देण्यात प्राधिकरण कमी पडत असेल तर त्या प्राधिकरणाला विरोध करणे गरजेचे आहे, असा सूर उमटू लागला आहे. जीवन प्राधिकरण हटाव, शहर बचाव, ही मोहीम राबविण्याची वेळ आता नागरिकांवर आली आहे. प्राधिकरणाच्या चुकीचा भुर्दंड नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून सहन करत आहेत. त्यामुळे नागरिकांचा संताप सहन करण्याची वेळ आता प्राधिकरणावर आली आहे.

टॅग्स :Waterपाणी