शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
4
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
5
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
6
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
7
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
8
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
9
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
10
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
11
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
12
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
13
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
14
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
15
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
16
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
17
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
18
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
19
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप
20
अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई, इस्लामिक स्टेटचे ४ दहशतवादी पकडले, श्रीलंकेचे कनेक्शन उघड

तलावांच्या संवर्धनासाठी 'चला तलावांशी हात मिळवूया'; जागतिक जलदिनानिमित्त मानवी साखळी तयार करणार

By प्रज्ञा म्हात्रे | Published: March 18, 2024 3:43 PM

मानवी साखळी तयार करून संध्याकाळी ५ ते ६ या वेळेत तलावांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. 

ठाणे : तलाव संवर्धन ही काळाची गरज आहे. तलावांचे शहर' म्हणून ओळख असलेल्या आपल्या ठाणे शहरात पूर्वी ६० तलाव होते आणि आता केवळ ४२ तलाव शिल्लक आहेत आणि ही या शहराची शोकांतिका आहे. तलाव संवर्धनाची माझा तलाव ही मोहीम जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी येत्या २२ मार्च रोजी म्हणजेच ' जागतिक जलदिना निमित्त' मासुंदा तलाव (तलावपाळी) येथे ठाण्यातील सर्व तलाव आपल्या भेटीला येणार आहेत. मानवी साखळी तयार करून संध्याकाळी ५ ते ६ या वेळेत तलावांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. 

पर्यावरण दक्षता मंडळ आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने 'माझा तलाव' या चळवळीची सुरुवात झाली. 'या तलावांचे संवर्धन करण्यासाठी माझा तलाव ही मोहीम सुरू झाली. ठाण्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांच्या हस्ते १५ ऑगस्ट रोजी माझा तलाव मोहिमेचा पहिला जाहीर कार्यक्रम संपन्न झाला. शाळेतील मुलांचा सहभाग या मोहिमेत अग्रस्थानी आहे. आत्तापर्यंत एकूण १५ शाळांनी त्यांच्या नजीकचे तलाव दत्तक घेतले असून निरीक्षणाद्वारे मुले तलावबाबत जागरुक होत आहेत.  २२ मार्च रोजी होणाऱ्या कार्यक्रमाच्या सुरवातीला जमलेल्या सर्व पर्यावरणप्रेमींना 'माझा तलाव' मोहिमेची माहिती देण्यात येईल. त्यानंतर शाळेतील मुलांनी तयार केलेले पोस्टर्स आणि ४२ तलावांचे फोटो यांच्यासमवेत तलावाभोवती मानवी साखळी तयार केली जाईल. 

मुले आणि पर्यावरण दक्षता मंडळाचे कार्यकर्ते तलावावर येणाऱ्या लोकांना मोहिमेची माहिती देतील. 'माझा तलाव' मोहिमेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्वांची नोंदणी सुद्धा त्याठिकाणी केली जाईल. आपल्या ठाणे शहरातील तलावांच्या संवर्धनासाठी या मोहिमेत एक जबाबदार ठाणेकर म्हणून सहभागी होण्याचे आणि जलदिन खऱ्या अर्थाने साजरा करण्याचे आवाहन पर्यावरण दक्षता मंडळ आपल्याला करत आहे. 

 

टॅग्स :thaneठाणेWaterपाणी