शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

कळवा, मुंब्य्रातून पाणी कपातीस सुरवात, महिन्यातून दोनदा शटडाऊन, शहरी भागालाही पुढील आठवड्यापासून पाणी कपात लागू होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 17:35 IST

उन्हाळा सुरु होण्यापूर्वीच ठाण्यावर देखील पाणी कपातीचे संकट कोसळले आहे. शुक्रवार पासून कळवा, मुंब्रा भागातून पाणी कपातीला सुरवात झाली आहे. तर पुढील आठवड्यात ठाणे शहराला पाणी कपातीचा सामना करावा लागणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्देपाणी कपातीची पहिली कुऱ्हाड कळवा, मुंब्य्रावरपुढील आठवड्यात ठाण्यातही सुरु होणार पाणी कपात

ठाणे - मागील वर्षी सरासरी पेक्षा यंदा देखील त्याच स्वरुपात पाऊस झाला असला तरी देखील उन्हाच्या झळा सोसाव्या लागण्या आधीच ठाण्यावर पाणी कपातीचे संकट ओढावण्यास सुरवात झाली आहे. त्यानुसार आता शुक्रवार पासून दर १५ दिवसांनी शहरातील कळवा आणि मुंब्रा भागातील पाणी पुरवठा २४ तास बंद ठेवण्यात येणार आहे. पाणी कपातीची पहिली कुºहाड एमआयडीसीने उगारल्यानंतर आता १० तारखेनंतर स्टेम देखील पाणी कपातीचा निर्णय घेणार आहे. त्यानुसार शहरी भागाला देखील पाणी कपातीच्या झळा सहन कराव्या लागणार असल्याचे दिसत आहे.              महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडील उपलब्ध पाणी साठयाच्या नियोजनाबाबत कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे विभाग यांनी कळविले असल्याने महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाकडून होणारा पाणी पुरवठा शुक्र वार ५ जानेवारी, पासून यापुढे दर १५ दिवसांनी म्हणजेच गुरुवारी रात्री १२ ते शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत बंद राहणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. या कालावधीत कळवा काही भाग, विटावा, मुंब्रा, दिवा, शिळ, कौसा, डायघर, देसाई, इंदिरानगर, रु पादेवीपाडा, वागळे फायर ब्रिगेड, बाळकुम पाडा क्र .१ (एम. आय. डी. सी. कडून होणारा पाणी पुरवठा) आदी ठिकाणचा पाणी पुरवठा २४ तास पुर्ण बंद राहणार आहे. या शटडाऊनमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा योग्य तो वापर करुन पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने या प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.दरम्यान, कळवा, मुंब्य्राला पाणी कपातीचा पहिला फटका बसल्यानंतर पुढील आठवड्यापासून ठाणे शहराला देखील पाणी कपातीचा सामना करावा लागणार असल्याचे पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे. शहराला पाणी पुरवठा करणाºया स्टेमने देखील १० जानेवारी नंतर पाणी कपात लागू करण्याचे निश्चित केल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे स्टेमकडून होणारा ११० एमएलडी पाणी पुरवठा हा १५ दिवसातून एकदा बंद राहणार आहे.                 कळवा, मुंब्रा वगळता ठाणे शहराला आजच्या घडीला ३७० एमएलडी पाणी पुरवठा होत आहे. यातील २५० एमएलडी पाणी पुरवठा हा ठाणे महापालिका स्वत:च्या पाणी पुरवठा योजनेतून करीत आहे. त्यामुळे स्टेमने जरी पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला असला तरी शहरातील भागांना ३७० पैकी केवळ ११० एमएलडी पाणी कमी होणार आहे. परंतु महापालिका स्वत:च्या पाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा करणार असल्याने त्याचा फारसा परिणाम ठाणेकरांना जाणवणार नसल्याचे पाणी पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाWaterपाणी