शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

कळवा, मुंब्य्रातून पाणी कपातीस सुरवात, महिन्यातून दोनदा शटडाऊन, शहरी भागालाही पुढील आठवड्यापासून पाणी कपात लागू होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 17:35 IST

उन्हाळा सुरु होण्यापूर्वीच ठाण्यावर देखील पाणी कपातीचे संकट कोसळले आहे. शुक्रवार पासून कळवा, मुंब्रा भागातून पाणी कपातीला सुरवात झाली आहे. तर पुढील आठवड्यात ठाणे शहराला पाणी कपातीचा सामना करावा लागणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्देपाणी कपातीची पहिली कुऱ्हाड कळवा, मुंब्य्रावरपुढील आठवड्यात ठाण्यातही सुरु होणार पाणी कपात

ठाणे - मागील वर्षी सरासरी पेक्षा यंदा देखील त्याच स्वरुपात पाऊस झाला असला तरी देखील उन्हाच्या झळा सोसाव्या लागण्या आधीच ठाण्यावर पाणी कपातीचे संकट ओढावण्यास सुरवात झाली आहे. त्यानुसार आता शुक्रवार पासून दर १५ दिवसांनी शहरातील कळवा आणि मुंब्रा भागातील पाणी पुरवठा २४ तास बंद ठेवण्यात येणार आहे. पाणी कपातीची पहिली कुºहाड एमआयडीसीने उगारल्यानंतर आता १० तारखेनंतर स्टेम देखील पाणी कपातीचा निर्णय घेणार आहे. त्यानुसार शहरी भागाला देखील पाणी कपातीच्या झळा सहन कराव्या लागणार असल्याचे दिसत आहे.              महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडील उपलब्ध पाणी साठयाच्या नियोजनाबाबत कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे विभाग यांनी कळविले असल्याने महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाकडून होणारा पाणी पुरवठा शुक्र वार ५ जानेवारी, पासून यापुढे दर १५ दिवसांनी म्हणजेच गुरुवारी रात्री १२ ते शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत बंद राहणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. या कालावधीत कळवा काही भाग, विटावा, मुंब्रा, दिवा, शिळ, कौसा, डायघर, देसाई, इंदिरानगर, रु पादेवीपाडा, वागळे फायर ब्रिगेड, बाळकुम पाडा क्र .१ (एम. आय. डी. सी. कडून होणारा पाणी पुरवठा) आदी ठिकाणचा पाणी पुरवठा २४ तास पुर्ण बंद राहणार आहे. या शटडाऊनमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा योग्य तो वापर करुन पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने या प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.दरम्यान, कळवा, मुंब्य्राला पाणी कपातीचा पहिला फटका बसल्यानंतर पुढील आठवड्यापासून ठाणे शहराला देखील पाणी कपातीचा सामना करावा लागणार असल्याचे पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे. शहराला पाणी पुरवठा करणाºया स्टेमने देखील १० जानेवारी नंतर पाणी कपात लागू करण्याचे निश्चित केल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे स्टेमकडून होणारा ११० एमएलडी पाणी पुरवठा हा १५ दिवसातून एकदा बंद राहणार आहे.                 कळवा, मुंब्रा वगळता ठाणे शहराला आजच्या घडीला ३७० एमएलडी पाणी पुरवठा होत आहे. यातील २५० एमएलडी पाणी पुरवठा हा ठाणे महापालिका स्वत:च्या पाणी पुरवठा योजनेतून करीत आहे. त्यामुळे स्टेमने जरी पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला असला तरी शहरातील भागांना ३७० पैकी केवळ ११० एमएलडी पाणी कमी होणार आहे. परंतु महापालिका स्वत:च्या पाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा करणार असल्याने त्याचा फारसा परिणाम ठाणेकरांना जाणवणार नसल्याचे पाणी पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाWaterपाणी