शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

आरटीई प्रवेशासाठी ९५५ पालकांची शाळेकडे पाठ

By admin | Published: April 21, 2017 12:01 AM

उच्च दर्जाचे शिक्षण देणाऱ्या जिल्ह्यातील ८०८ शाळांमध्ये २५ टक्के आरक्षणात १६ हजार ४५५ विद्यार्थ्यांना नर्सरीपासून ते

सुरेश लोखंडे ,  ठाणेउच्च दर्जाचे शिक्षण देणाऱ्या जिल्ह्यातील ८०८ शाळांमध्ये २५ टक्के आरक्षणात १६ हजार ४५५ विद्यार्थ्यांना नर्सरीपासून ते पहिलीपर्यंत मोफत प्रवेश दिला जात आहे. आतापर्यंत सुमारे चार हजार १८३ बालकांचे प्रवेश झाले. मात्र, सुमारे ९५५ विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी संबंधित पालक या शाळांकडे फिरकलेच नसल्याचे निदर्शनास आले आहे.उच्चभ्रू कुटुंबातील मुले शिक्षण घेत असलेल्या सीबीएसई, एसएससी आदी बोर्डांच्या खाजगी शाळांमध्ये मागासवर्गीय, दुर्बल व वंचित घटकांतील मुलांना शिक्षण हक्काखाली (आरटीई) आठवीपर्यंतचे शिक्षण मोफत दिले जात आहे. या गरिबांच्या मुलांनादेखील या उच्चभ्रू कुटुंबातील मुलांसोबत शिकता यावे, म्हणून त्यांच्या शाळांमध्ये २५ टक्के आरक्षणातून गरिबांच्या मुलांना प्रवेश देणे सक्तीचे केले आहे. आतापर्यंतच्या तिसऱ्या फेरीअखेर जिल्ह्यातील चार हजार १८३ बालकांचे प्रवेश झाले आहेत. परंतु, संबंधित विद्यार्थ्यांचे सुमारे ९५५ पालक दिलेल्या शाळांत गेलेच नसल्याचे दिसले. पालकांच्या उदासीनतेमुळे किंवा त्यांच्या अज्ञानामुळे दिलेल्या शाळेत पालक न गेल्यामुळे ९५५ विद्यार्थी या प्रवेशावाचून वंचित आहेत. सध्या तिसऱ्या फेरीचे प्रवेश शाळांमध्ये घेतले जात आहेत. २८ एप्रिलपर्यंत संबंधित पालकांना दिलेल्या शाळांमध्ये जाऊन पाल्याचा प्रवेश घेता येणार आहे. या तिसऱ्या फेरीत एक हजार ९२६ बालकांचे प्रवेश होणार आहेत. आतापर्यंत ७३४ प्रवेश झाले असून २२ बालकांचे प्रवेश विविध कारणांखाली नाकारले आहेत. उर्वरित २९७ बालकांनी दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतल्यामुळे ते या फेरीत मिळालेल्या शाळांमध्ये प्रवेश घेऊ शकले नाहीत. तर, ८८१ बालकांचे वडील शाळेत प्रवेशासाठी गेलेच नाही. यामुळे त्यांचे अद्याप प्रवेश झाले नाही. या पालकांना आताही शाळेत जाऊन पाल्याचे प्रवेश घेता येतील. या प्रवेशाच्या पहिल्या टप्प्यात तीन हजार ४५० प्रवेश झाले आहेत. तर, या दुसऱ्या टप्प्यात ६१३ शाळांमध्ये एक हजार ९२६ मुलांचे प्रवेश निश्चित झाले होते. त्यापैकी आतापर्यंत ३२४ प्रवेश झाले. चार विद्यार्थ्यांचे प्रवेश वेगवेगळ्या कारणांखाली नाकारण्यात आले असता ७१ पालक शाळेत जाऊन प्रवेश घेऊ शकले नाहीत.