शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांमुळे होऊ शकतात कमी अपघात, शिक्षणाधिकाऱ्यांचं स्पष्ट मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2021 14:47 IST

३२ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाच्या पार्श्वभूमीवर परिवहन आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी व्यक्त केले मत

ठळक मुद्देकोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ठाणे परिसरातील शाळा आणि विद्यालये सध्या बंदच आहेत. पण विविध शाळांमध्ये असणाऱ्या आरएसपी (विद्यार्थ्यांच्या वाहूतुकीसाठी शालेय स्तरावर नेमलेली समिती) मार्फत विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षा विषयी जागृती करण्यात येणार आहे

ठाणे : पालक आपल्या मुलांच्या शब्दाबाहेर जात नाहीत हा अनुभव लक्षात घेता सुरक्षित रस्ता प्रवासाच्या जनजागृतीसाठी शालेय विद्यार्थी प्रभावी माध्यम ठरू शकतात असा विश्वास ३२ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचे औचित्य साधून प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वभर शिंदे, जयंत पाटील आणि जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी व्यक्त केला.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ठाणे परिसरातील शाळा आणि विद्यालये सध्या बंदच आहेत. पण विविध शाळांमध्ये असणाऱ्या आरएसपी (विद्यार्थ्यांच्या वाहूतुकीसाठी शालेय स्तरावर नेमलेली समिती) मार्फत विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षा विषयी जागृती करण्यात येणार आहे. त्या करता प्रादेशिक परिवहन कार्यालयाने विद्यार्थ्यांकरता सचित्र परिपत्रक आणि वाहूतुकीच्या नियमांची पुस्तिका तयार केली आहे. सध्या विदयार्थ्यांचे ऑन लाईन वर्ग भरत आहेत. त्यावेळी रस्ता सुरक्षेविषयी विद्यार्थ्यांना माहिती देऊन त्यांचात जागृती केली जाणार आहे. यासंदर्भात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणाले, लहान वयातच विद्यार्थ्यांना सुरक्षित प्रवासाची जाणीव करुन दिल्यास भविष्यात त्याचे चांगले परिणाम पाहायला मिळतील. तर, वाहतुकीचे नियम माहीत असल्याने मुलंच आपल्या पालकांना सुरक्षततेची जाणीव करून देताना हेल्मेट घातलंय का?, सीट बेल्ट लावलाय का असे प्रश्न विचारतात त्याशिवाय गाडी सुरु करु देत नाहीत हे सकारात्मक दृष्य पहायला मिळतंय असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंतकुमार पाटील यांनी सांगितले.

ठाणे जिल्ह्यात एकूण १६ लाख ५८ हजार ६०९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे रस्ता सुरक्षा विषयी या विद्यार्थ्यांना माहिती दिल्याने लाखो पालकांना त्याची माहिती मिळणार आहे. त्यामुळे हे विद्यार्थी महत्वाचा दुवा आहेत असे शिक्षणाधिकारी शेषराव बडे म्हणाले.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसtraffic policeवाहतूक पोलीस