शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांत दिसतो समन्वयाचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 00:23 IST

कार्यालये पडली ओस; युतीच्या बैठका सुरू

उल्हासनगर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीचे संभाव्य उमेदवार बैठका घेत आहेत. याउलट, दुसरीकडे आघाडीचा उमेदवार जाहीर होऊनही या पक्षांची मध्यवर्ती कार्यालये ओस पडली असून आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये समन्वयही नसल्याचे चित्र दिसत आहे.उल्हासनगरात पाच लाखांपेक्षा जास्त मतदार असून उल्हासनगर, कल्याण पूर्व व अंबरनाथ अशा तीन विधानसभा क्षेत्रांत शहर विभागले आहे. शहरातून जास्तीतजास्त मतदान पडण्यासाठी विद्यमान खासदार व शिवसेनेचे संभाव्य उमेदवार श्रीकांत शिंदे यांनी गेल्या काही दिवसांपासून शहराकडे लक्ष केंद्रित केले आहे. बुधवारी रात्री उशिरापर्यंत ते शहरात तळ ठोकून होते. भिवंडी लोकसभा मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला असून तिथे शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाने बंड पुकारले आहे. त्याचा धागा पकडून शहर भाजपाने भिवंडीतील शिवसेनेचे बंड प्रथम मोडून काढा, नंतरच आम्ही प्रचाराला लागू, असे श्रीकांत शिंदे यांना सुनावले होते; मात्र शिंदे यांच्या भेटीगाठीने स्थानिक भाजपा नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचा राग निवळला असून शहर जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते शिंदे यांच्या प्रचाराला लागल्याचे चित्र आहे.शिवसेनेने मराठा सेक्शन व गोलमैदान परिसरात मध्यवर्ती निवडणूक कार्यालय थाटले असून कार्यालय शिवसैनिकांनी बहरून गेले. भाजपाच्या मध्यवर्ती कार्यालयात निवडणूक विशेष बैठका होत आहेत; मात्र दुसरीकडे राष्ट्रवादीचे खेमानी-कलानी महल येथील व काँग्रेसचे नेहरू चौकातील मध्यवर्ती कार्यालय ओस पडल्याचे चित्र आहे. काँगे्रसचे शहर जिल्हाध्यक्ष राधाचरण करोतिया यांनी आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार पूर्ण ताकदीनिशी करणार असल्याचे सांगितले असून शहरातून सर्वाधिक मतदान राष्ट्रवादीच्या बाबाजी पाटील यांना मिळण्याचे संकेत राष्ट्रवादीच्या शहर जिल्हाध्यक्ष आमदार ज्योती कलानी यांनी दिले आहेत.बुथ एजंटची वानवासेना-भाजपा युतीने प्रत्येक बुथ कार्यकर्त्याची बैठक यापूर्वीच घेतली आहे; मात्र त्यातुलनेत काँग्रेस-राष्ट्रवादीची तयारी कमी पडत असल्याची चर्चा आहे. आघाडीचीही तयारी सुरू असून कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार असल्याचे काँगे्रस शहर जिल्हाध्यक्ष राधाचरण करोतिया, पदाधिकारी किशोर धडके, कुलदीपसिंग माथारू, राष्ट्रवादीच्या शहर जिल्हाध्यक्षा ज्योती कलानी, पक्षाचे गटनेते भरत गंगोत्री यांनी सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस