शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

नेत्यांनी गावाचा सोडून स्वत:चाच केला विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 12:14 AM

निवडणूक आली की वाटली जाते आश्वासनांची खैरात : मूलभूत मुद्यांवर गावागावात सुरू झाली चर्चा

ग्रामपंचायतींच्या निवडणुका १५ जानेवारी रोजी होत आहेत. निवडणुका आल्या की, आश्वासनांची खैरात वाटली जाते. प्रत्यक्षात आजही बहुतांश गावांमध्ये सुविधांचा अभाव असल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करुनही अनेक गावांमध्ये मूलभूत समस्या कायमच आहेत. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातून नेत्यांनी गावांचा नव्हे तर स्वत:चाच कायापालट केल्याचे चित्र अनेक ग्रामपंचायतींमध्ये आहे. आता ग्रामपंचायत निवडणुकांमुळे हे सर्वच मुद्दे गावागावात चर्चेला आले आहेत. याच पार्श्वभूमिवर ‌भिवंडी, मुरबाड आणि शहापूर तालुक्यातील समस्यांचा घेतलेला हा आढावा.... 

भिवंडी तालुक्यात घनकचरा व्यवस्थापनाची समस्यादीपक देशमुखवज्रेश्वरी : ग्रामपंचायतींना समस्या सोडविण्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणात निधी देते. मात्र वेगवेगळ्या योजनांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याने आजही भिवंडी तालुक्यातील कित्येक ग्रामपंचायतींमध्ये सुविधांचा अभाव आहे. फक्त निवडणुका आल्यानंतर स्थानिक नेते जाहीरनामा प्रसिद्ध करून गावातील समस्या सोडवण्याची आश्वासने देतात. परंतु त्यानंतर त्यांना विसर पडतो, असे चित्र भिवंडीतील काही गावांमध्ये पाहायला मिळत आहे.भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सर्वात लक्षवेधी निवडणुका होतात. कारण येथील काही ग्रामपंचायती या एवढ्या श्रीमंत आहेत की, त्यांचे वार्षिक उत्पन्न एका नगरपालिकेच्या बजेटपेक्षाही जास्त आहे. ठाणे, मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या तालुक्यात सरकारने गोदाम पट्टा जाहीर केल्यानंतर येथील जागांचे भाव गगनाला भिडले. येथील हजारो एकर जागांवर मोठमोठे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्यांची गोदामे उभी राहिली. यामुळे ग्रामपंचायतींना कोट्यवधींचा महसूल मिळतो. तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका यावेळी होत आहेत. त्यापैकी तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. 

काल्हेर, कशेळी, दापोडा, वडपा, दिवे-अंजूर, वळ, माणकोली, सरवली ग्रामपंचायतींचे उत्पन्न कोट्यवधींच्या घरात आहे. येथील बहुतांश नागरी समस्या मार्गी लागल्या आहेत. परंतु काही ग्रामपंचायतीच्या हद्दीत अजूनही घनकचरा व्यवस्थापन, भूमिगत गटारे आणि पुरेसा पाणीपुरवठा या सुविधांची वानवा आहे. या ठिकाणी नागरिकरण झपाट्याने झाले. परिणामी, दाटीवाटीने घरे, इमारती झाल्या. त्यामुळे या ठिकाणी मोकळ्या जागांचा प्रश्न निर्माण होऊन, कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली. 

श्रीमंत ग्रामपंचायतीही सुविधांच्या बाबतीत गरीबचभिवंडी, पूर्व भागातील शेलार, वडपा, पडघा, झिडके या ग्रामपंचायतीही श्रीमंत आहेत, परंतु या ठिकाणीही कित्येक मूलभूत सुविधा उपलब्ध झालेल्या नाही. शेलार, झिडके येथे कचऱ्याची आणि सांडपाणी वाहून नेण्यासाठी गटारे या सर्वात मोठ्या सुविधांची गरज आहे, तर पडघासारखी मोठी बाजारपेठ असलेल्या ठिकाणी तेथील मुख्य रस्ता आणि मार्केटयार्ड या सुविधा आजही लोकप्रतिनिधींनी सोडविलेल्या नाहीत. इतर ग्रामपंचायतींमध्ये आरोग्य, पाणी, स्मशानभूमीची दुरवस्था, घरकुले अशा प्रकारच्या सोयी झालेल्या नाहीत.

शहापूर तालुक्यात घरकुलांचा मुद्दा कळीचा 

निवडणुकीमुळे स्थानिक मुद्यांना आले महत्त्व

जनार्दन भेरेलोकमत न्यूज नेटवर्क भातसानगर : सध्या ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या निवडणुकीमुळे बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये स्थानिक मुद्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. त्याचप्रमाणे शहापूर तालुक्यात घरकुलांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शहापूर तालुक्यात मागील वर्षी घरकुले मंजूर न झाल्याने कोणत्याही लाभार्थ्याला देता आली नाही. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतींमध्ये हा कळीचा मुद्दा बनला आहे. भावसे गावातील रस्ते, पाण्याचा प्रश्न आजही कायम आहे. यासाठी प्रशासकीय बाबी अडचणीच्या ठरत आहेत, हेही तितकेच खरे आहे.

अल्याणी गावातील अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. गावात सर्वच शेतकरी भाजीपाल्याचे पीक घेत असल्याने, त्यांच्यापर्यंत सरकारी योजनांची माहिती पोहोचत नाही. त्यांना या सरकारी योजनांचा फायदा घेता येत नाही, ही मोठी अडचण आहे. या विविध योजनांची माहिती ग्रामपंचायत स्तरावर देणे आवश्यक आहे. चेरपोली ग्रामपंचायत ही शहापूरमध्ये असल्याने, तिचा थेट संबंध तालुक्याच्या महत्वाच्या बाजारपेठेशी येतो. मात्र, येथे शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. येथील अनेक टोलेजंग इमारतींना पुरेसे पाणीही मिळत नाही, ही त्यांची ओरड आहे. पाणीयोजना मंजूर केली असल्याने तो मिटेल, असा विश्वास दिला जात आहे. यामध्ये चिंचपाडा व बामणे हे परिसरातील गावपाडे यांचा समावेश होतो. ही योजना पूर्ण झाल्यास या गावांमधील पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. त्यामुळे ही योजना पूर्ण होणे, या गावांसाठी आणि तेथील ग्रामस्थांच्या सुविधेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. 

समस्यांची भरमार दहिवली ग्रामपंचायतीचा विचार केल्यास येथील गावात रस्ते, पाण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून भेडसावत आहे. डोळखांब ही तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असल्याने येथे मूलभूत सुविधा असणे गरजेचे आहे. तरीही उपलब्ध निधीच्या मानाने ते शक्य होत नाही, अशी ओरड अनेकवेळा केली जाते. येथे रस्त्यांवर अतिक्रमण झाले असून, ते हटविण्यासाठी निधीची गरज नसतानाही यात प्रशासनाला अपयश आले आहे.

 

टॅग्स :thaneठाणे