शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

गेल्या २० दिवसात एसटीच्या मार्फतीने ठाणे पोलिसांनी केली ८४ हजार मजूरांची घरवापसी

By जितेंद्र कालेकर | Updated: June 1, 2020 23:52 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या संचारबंदीमुळे मुंबई तसेच ठाण्यातील परप्रांतीय मजूरांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. अशा मजूरांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी एसटी बसेसच्या मदतीने ठाणे पोलिसांनी गेल्या २० दिवसांमध्ये तब्बल तीन हजार ३५० बसेसमधून ८४ हजार ७३४ प्रवाशांची सुखरुप घरवापसी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देपरप्रांतीय मजूरांनी मानले राज्य शासन आणि पोलिसांचे आभारएसटीने दिली मोफत सेवा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: गेल्या २० दिवसांमध्ये ठाणे पोलिसांनी राज्य परिवहन सेवेच्या (एसटी) बसेसद्वारे तब्बल ८४ हजार ७३४ परप्रांतीय मजूरांची  महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत घरवापसाी केली. ठाणे पोलीस आणि एसटीने केलेल्या सहकार्याबद्दल या मजूरांनी आता आभार मानले आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या संचारबंदीमुळे मुंबई तसेच ठाण्यातील परप्रांतीय मजूरांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. गाठीशी असलेला सर्व पैसा संपल्यामुळे त्यांच्या जेवणाचेही हाल होत होते. त्यामुळेच अनेकांनी पायपीट करीत तर कधी मिळेल त्या वाहनाने अगदी जादा पैसे मोजून १५०० ते १८०० किलो मीटरचा प्रवास सुरु केला होता. यात मजूरांचे आणखीनच मोठया प्रमाणात हाल होत होते. शिवाय, सोशल डिस्टसिंगचाही फज्जा उडाला होता. याचीच खंबीर दखल घेत राज्य शासनाने एसटी तसेच काही ठिकाणी रेल्वेने या मजूंराची घरवापसी केली. रेल्वेलाही अनेक अडचणी असल्यामुळे ठाणे आणि भिवंडीतून मोठया प्रमाणात एसटीद्वारे या मजूरांना मध्यप्रदेशच्या सीमेपर्यंत सोडण्यात आले.१० मे रोजी ३५ बसेसद्वारे ८५२ तर मजूरांना सोडण्यात आले. त्यानंतर ११ मे रोजी ११२ बसेसमधून तीन हजार २२ मजूर, १२ मे रोजी ९४ बसमधून दोन हजार ७९१ मजूरांना सोडण्यात आले. यात सर्वाधिक ३४९ बसमधून आठ हजार ७०० प्रवाशांना २४ मे रोजी सोडण्यात आले. तर २१ मे रोजी २३४ बसेसद्वारा पाच हजार ९२१ प्रवाशांना महाराष्ट्राच्या सीमेवर सोडण्यात आले. १० ते २८ मे या २० दिवसांच्या कालावधीत तब्बल तीन हजार ३५० बसेसमधून ८४ हजार ७३४ प्रवाशांची सुखरुप घरवापसी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासाठी ठाण्यातील परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे, वागळे इस्टेटचे उपायुक्त अविनाश अंबुरे आणि विशेष शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्यासह एसटीच्या ठाणे विभागीय कार्यालयाने विशेष मेहनत घेतली.

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसLabourकामगार