शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

उत्तन वासियांच्या मदतीला पुन्हा धावून आली लालपरी; एसटीनेच प्रवास करण्याचं आवाहन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 18:16 IST

कोरोनाच्या संक्रमण काळात पालिका व अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बससेवा चालवली जात होती

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या नाकर्तेपणा मुळे महापालिकेची परिवहन सेवा ठेकेदाराला कडून सतत बंदच असल्याने उत्तन वासियांचे प्रचंड हाल होत आहेत. अखेर येथील नागरिकांच्या मदतीला पुन्हा एसटी महामंडळाची लालपरी धावून आली आहे . आज रविवार पासून भाईंदर - उत्तन अशी बससेवा पुन्हा सुरु झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे . जुनं ते सोनं असे म्हणत उत्तन वासियांनी या पुढे पालिका बस ने नाही  तर एसटीने प्रवास करणार असा निर्धार बोलून दाखवला . 

कोरोनाच्या संक्रमण काळात पालिका व अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बससेवा चालवली जात होती . परंतु ठेकेदाराला पैसे दिले जात नसल्याने कर्मचाऱ्यांना पगार नाही म्हणून भाजपा प्रणित श्रमिक जनरल कामगार संघटनेने अचानक बंद केला होता. त्या नंतर नागरिकांसाठी सुरु झालेली उत्तन मार्गावरील बससेवा ८ सप्टेंबर रोजी भाजपा प्रणित संघटनेने पुन्हा बंद पाडली . या आधी देखील अचानक संप करून नागरिकांना वेठीस धरण्याचे प्रकार झाले . ठेकेदाराने बस सेवा दिली नाही तर राष्ट्रीय कामगार व श्रमजीवी या दुसऱ्या संघटनांचे कर्मचारी बस चालवण्यास तयार असताना पालिकेने नागरिकांच्या तोंडाला पाने पुसली . 

बस सेवा बंद पडल्याने मोरवा , डोंगरी , उत्तन , पाली , चौक भागातील नागरिकांचे सर्वात जास्त हाल होत होते . त्यांना नाईलाजाने ५० ते ६० रुपये एकावेळचे रिक्षाभाडे देऊन भाईंदरला यावे लागायचे . जायला सुद्धा तेवढेच भाडे वसूल केले जायचे . त्यामुळे येथील नागरिकांनी स्थानिक शिवसेना नगरसेवक तसेच आमदार प्रताप सरनाईक ह्यांना बस सेवा मिळवून देण्याची मागणी केली होती . 

आ .सरनाईक यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना फोन करून परिवहन ठेकेदार, भाजपा प्रणित संघटने मुळे नागरिकांचे चाललेले हाल सांगितले व एसटी बस सुरु करण्याची विनंती केली .  परिवहनमंत्री परब ह्यांनी भाईंदर - उत्तन मार्गावर एसटी बससेवा सुरु करण्याचे मान्य करत तसे आदेश अधिकाऱ्यांना दिले . त्या अनुषंगाने आज रविवार पासून उत्तन साठी एसटी बस सेवा सुरु झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 

एसटी बसचे येथील नागरिकांसह प्रवासी संघटनेने स्वागत केले आहे . पूर्वी या भागात एसटी बसचीच सेवा चालायची . परंतु पालिकेची बस आल्याने एसटी बंद केली गेली . मात्र पालिकेच्या बससेवेचा नेहमीचा आडमुठेपणा पाहता नागरिक संतप्त आहेत . त्यांनी तर एमबीएमटी चे फुलफॉर्मच  मेरे भरोसे मत ठेहरो असे करून टाकले आहे . या आधी देखील पालिका बस संपा मुळे बंद पाडली असता  विचारे ह्यांनी एसटी बस सुरु करून दिली होती . आता मात्र पालिकेच्या नव्हे तर एसटी बसनेच प्रवास करा , जुनं ते सोनं असे आवाहन प्रवासी व अन्य संघटना आदीं कडून नागरिकांना केले गेले आहे .

टॅग्स :state transportएसटीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस