शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

उत्तन वासियांच्या मदतीला पुन्हा धावून आली लालपरी; एसटीनेच प्रवास करण्याचं आवाहन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 18:16 IST

कोरोनाच्या संक्रमण काळात पालिका व अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बससेवा चालवली जात होती

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या नाकर्तेपणा मुळे महापालिकेची परिवहन सेवा ठेकेदाराला कडून सतत बंदच असल्याने उत्तन वासियांचे प्रचंड हाल होत आहेत. अखेर येथील नागरिकांच्या मदतीला पुन्हा एसटी महामंडळाची लालपरी धावून आली आहे . आज रविवार पासून भाईंदर - उत्तन अशी बससेवा पुन्हा सुरु झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे . जुनं ते सोनं असे म्हणत उत्तन वासियांनी या पुढे पालिका बस ने नाही  तर एसटीने प्रवास करणार असा निर्धार बोलून दाखवला . 

कोरोनाच्या संक्रमण काळात पालिका व अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बससेवा चालवली जात होती . परंतु ठेकेदाराला पैसे दिले जात नसल्याने कर्मचाऱ्यांना पगार नाही म्हणून भाजपा प्रणित श्रमिक जनरल कामगार संघटनेने अचानक बंद केला होता. त्या नंतर नागरिकांसाठी सुरु झालेली उत्तन मार्गावरील बससेवा ८ सप्टेंबर रोजी भाजपा प्रणित संघटनेने पुन्हा बंद पाडली . या आधी देखील अचानक संप करून नागरिकांना वेठीस धरण्याचे प्रकार झाले . ठेकेदाराने बस सेवा दिली नाही तर राष्ट्रीय कामगार व श्रमजीवी या दुसऱ्या संघटनांचे कर्मचारी बस चालवण्यास तयार असताना पालिकेने नागरिकांच्या तोंडाला पाने पुसली . 

बस सेवा बंद पडल्याने मोरवा , डोंगरी , उत्तन , पाली , चौक भागातील नागरिकांचे सर्वात जास्त हाल होत होते . त्यांना नाईलाजाने ५० ते ६० रुपये एकावेळचे रिक्षाभाडे देऊन भाईंदरला यावे लागायचे . जायला सुद्धा तेवढेच भाडे वसूल केले जायचे . त्यामुळे येथील नागरिकांनी स्थानिक शिवसेना नगरसेवक तसेच आमदार प्रताप सरनाईक ह्यांना बस सेवा मिळवून देण्याची मागणी केली होती . 

आ .सरनाईक यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना फोन करून परिवहन ठेकेदार, भाजपा प्रणित संघटने मुळे नागरिकांचे चाललेले हाल सांगितले व एसटी बस सुरु करण्याची विनंती केली .  परिवहनमंत्री परब ह्यांनी भाईंदर - उत्तन मार्गावर एसटी बससेवा सुरु करण्याचे मान्य करत तसे आदेश अधिकाऱ्यांना दिले . त्या अनुषंगाने आज रविवार पासून उत्तन साठी एसटी बस सेवा सुरु झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 

एसटी बसचे येथील नागरिकांसह प्रवासी संघटनेने स्वागत केले आहे . पूर्वी या भागात एसटी बसचीच सेवा चालायची . परंतु पालिकेची बस आल्याने एसटी बंद केली गेली . मात्र पालिकेच्या बससेवेचा नेहमीचा आडमुठेपणा पाहता नागरिक संतप्त आहेत . त्यांनी तर एमबीएमटी चे फुलफॉर्मच  मेरे भरोसे मत ठेहरो असे करून टाकले आहे . या आधी देखील पालिका बस संपा मुळे बंद पाडली असता  विचारे ह्यांनी एसटी बस सुरु करून दिली होती . आता मात्र पालिकेच्या नव्हे तर एसटी बसनेच प्रवास करा , जुनं ते सोनं असे आवाहन प्रवासी व अन्य संघटना आदीं कडून नागरिकांना केले गेले आहे .

टॅग्स :state transportएसटीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस