शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

उत्तन वासियांच्या मदतीला पुन्हा धावून आली लालपरी; एसटीनेच प्रवास करण्याचं आवाहन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 18:16 IST

कोरोनाच्या संक्रमण काळात पालिका व अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बससेवा चालवली जात होती

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या नाकर्तेपणा मुळे महापालिकेची परिवहन सेवा ठेकेदाराला कडून सतत बंदच असल्याने उत्तन वासियांचे प्रचंड हाल होत आहेत. अखेर येथील नागरिकांच्या मदतीला पुन्हा एसटी महामंडळाची लालपरी धावून आली आहे . आज रविवार पासून भाईंदर - उत्तन अशी बससेवा पुन्हा सुरु झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे . जुनं ते सोनं असे म्हणत उत्तन वासियांनी या पुढे पालिका बस ने नाही  तर एसटीने प्रवास करणार असा निर्धार बोलून दाखवला . 

कोरोनाच्या संक्रमण काळात पालिका व अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बससेवा चालवली जात होती . परंतु ठेकेदाराला पैसे दिले जात नसल्याने कर्मचाऱ्यांना पगार नाही म्हणून भाजपा प्रणित श्रमिक जनरल कामगार संघटनेने अचानक बंद केला होता. त्या नंतर नागरिकांसाठी सुरु झालेली उत्तन मार्गावरील बससेवा ८ सप्टेंबर रोजी भाजपा प्रणित संघटनेने पुन्हा बंद पाडली . या आधी देखील अचानक संप करून नागरिकांना वेठीस धरण्याचे प्रकार झाले . ठेकेदाराने बस सेवा दिली नाही तर राष्ट्रीय कामगार व श्रमजीवी या दुसऱ्या संघटनांचे कर्मचारी बस चालवण्यास तयार असताना पालिकेने नागरिकांच्या तोंडाला पाने पुसली . 

बस सेवा बंद पडल्याने मोरवा , डोंगरी , उत्तन , पाली , चौक भागातील नागरिकांचे सर्वात जास्त हाल होत होते . त्यांना नाईलाजाने ५० ते ६० रुपये एकावेळचे रिक्षाभाडे देऊन भाईंदरला यावे लागायचे . जायला सुद्धा तेवढेच भाडे वसूल केले जायचे . त्यामुळे येथील नागरिकांनी स्थानिक शिवसेना नगरसेवक तसेच आमदार प्रताप सरनाईक ह्यांना बस सेवा मिळवून देण्याची मागणी केली होती . 

आ .सरनाईक यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना फोन करून परिवहन ठेकेदार, भाजपा प्रणित संघटने मुळे नागरिकांचे चाललेले हाल सांगितले व एसटी बस सुरु करण्याची विनंती केली .  परिवहनमंत्री परब ह्यांनी भाईंदर - उत्तन मार्गावर एसटी बससेवा सुरु करण्याचे मान्य करत तसे आदेश अधिकाऱ्यांना दिले . त्या अनुषंगाने आज रविवार पासून उत्तन साठी एसटी बस सेवा सुरु झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 

एसटी बसचे येथील नागरिकांसह प्रवासी संघटनेने स्वागत केले आहे . पूर्वी या भागात एसटी बसचीच सेवा चालायची . परंतु पालिकेची बस आल्याने एसटी बंद केली गेली . मात्र पालिकेच्या बससेवेचा नेहमीचा आडमुठेपणा पाहता नागरिक संतप्त आहेत . त्यांनी तर एमबीएमटी चे फुलफॉर्मच  मेरे भरोसे मत ठेहरो असे करून टाकले आहे . या आधी देखील पालिका बस संपा मुळे बंद पाडली असता  विचारे ह्यांनी एसटी बस सुरु करून दिली होती . आता मात्र पालिकेच्या नव्हे तर एसटी बसनेच प्रवास करा , जुनं ते सोनं असे आवाहन प्रवासी व अन्य संघटना आदीं कडून नागरिकांना केले गेले आहे .

टॅग्स :state transportएसटीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस