शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

युतीत समन्वयाचा अभाव, गोळीबाराची घटना का घडली?; माजी आमदारानं स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 14:00 IST

युतीत समन्वय नाही. प्रत्येक कार्यकर्त्यांची ही अडचण आहे असं माजी आमदाराने सांगितले.

कल्याण - उल्हासनगरमध्ये पोलीस ठाण्यात घडलेल्या गोळीबाराचे कुणीही समर्थन करणार नाही. परंतु या घटनेमागची पार्श्वभूमी वरिष्ठांनी समजून घेतली पाहिजे असं सांगत भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी या प्रकरणावर स्पष्टच मत व्यक्त केले. 

माजी आमदार नरेंद्र पवार म्हणाले की, जी घटना घडली ती नैराश्येतून घडली आहे. हे नैराश्य का आले हा चिंतनाचा विषय आहे. अनेकवेळा समन्वयाविषयी चर्चा झाली. युतीत समन्वय न दिसल्याने, न राहिल्याने अनेक अडचणी याठिकाणी बघायला मिळतात. त्याचाच एक भाग परवाच्या घटनेतून पाहायला मिळाला. ही घटना समर्थनीय नाही. कुणीही घटनेचे समर्थन करणार नाही. परंतु त्यामागची पार्श्वभूमी काय हे समजून घेणे गरजेचे आहे. भविष्यात भाजपा नेते, शिवसेना नेते या दोघांनी खालीपर्यंतच्या कार्यकर्त्यांमध्ये जो समन्वयाचा अभाव आहे तो दूर करणे गरजेचा आहे. ही कार्यकर्त्यांची भावना आहे. कुणालाही ही घटना पटलेली नाही. एकमेकांविषयी मन कलुषित होणे ही गोष्ट गंभीर आहे. त्यामुळे नेत्यांनी तातडीने या गोष्टीत लक्ष घालून हे वाद मिटवले पाहिजे. भविष्यात येणाऱ्या लोकसभा, विधानसभा आहेत त्यामुळे नेत्यांनी लक्ष घालावे अशी कार्यकर्त्यांची भावना आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच युतीत समन्वय नाही. प्रत्येक कार्यकर्त्यांची ही अडचण आहे. युतीत अडचण दिसतेय. त्यामुळे दोन्ही पक्षातील नेत्यांकडे आम्ही समन्वय घडवून आणावा अशी मागणी केलीय. भाजपा आणि शिवसेना नेत्यांनी लवकरात लवकर हा वाद मिटवावा. ही भावना कल्याण डोंबिवली महापालिकेतील प्रत्येक कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची भावना आहे. नेतृत्वावर आमचा विश्वास आहे आणि नेतृ्त्वाला आमच्यावर विश्वास आहे. कल्याण डोंबिवली क्षेत्रात विकास व्हावा आणि यातून मार्ग काढला जाईल अशी आम्हाला खात्री आहे असंही माजी आमदार नरेंद्र पवार म्हणाले. 

काय आहे वाद?

कल्याण पूर्व मतदारसंघाचे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यातच हा गोळीबार झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड यांच्यात आधीपासूनच वर्चस्वाचा वाद आहे. गणपत गायकवाड हे भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार असतानाही महेश गायकवाड यांनी उघडपणे शिवसेना बंडखोर उमेदवाराचा प्रचार केला होता. त्यात भाजपा आमदार गणपत गायकवाड सातत्याने कल्याण लोकसभेत भाजपाचा उमेदवार असेल असं विधान करत होते. त्यामुळे शिवसेना-भाजपामधील हा वाद सातत्याने उफाळून येत होता. त्यानंतर हा वाद अखेर गोळीबारापर्यंत पोहचला आहे. 

टॅग्स :Ganpat Gaikwadगणपत गायकवाडMahesh Gaikwadमहेश गायकवाडShiv SenaशिवसेनाBJPभाजपा