शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

रस्ते, पाणी, साफसफाई आदी मूलभूत गरजेची वानवा; उल्हासनगरचा ७२ वा वर्धापन दिवस, मात्र समस्या जैसे थे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 16:56 IST

८ ऑगस्ट रोजी शहराचा ७२ व्या वर्धापन दिन साजरा होत आहे. अनेक मूलभूत समस्यांमुळे नागरिक झालेत त्रस्त.

ठळक मुद्दे८ ऑगस्ट रोजी शहराचा ७२ व्या वर्धापन दिन साजरा होत आहे.अनेक मूलभूत समस्यांमुळे नागरिक झालेत त्रस्त.

सदानंद नाईक उल्हासनगर : ८ ऑगस्ट रोजी शहराचा ७२ व्या वर्धापन दिन साजरा होत असतांना दुसरीकडे पाणी टंचाई, साफसफाई, रस्ते, आरोग्य आदी मूलभूत समस्याने नागरिक त्रस्त आहेत. शहरातील अनाधिकृत व धोकादायक इमारतींचा प्रश्न उभा ठाकला असून महापालिकेच्या बहुतांश विभागात सावळागोंधळ उडून आयुक्त डॉ राजा दयानिधी यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहे. फाळणीवेळी पाकिस्तान मधील सिंध प्रांतातून सिंधी समाजसह अन्य समाजाच्या नागरिकांनी भारतात येणे पसंत केले. विस्थापित झालेल्या पैकी ९५ हजारा पेक्षा जास्त नागरिकांना कल्याण शहारा जवळींल लष्करी छावणीतील बेरेक, खुली जागा आदी ठिकाणावर वसविण्यात आले. भारताचे पहिले गव्हर्नर सी राजगोपालचारी यांनी शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदी वरून विस्थापित वस्तीला उल्हासनगर नाव दिलं. मात्र अनेक सिंधी बांधवानी उल्हासनगर ऐवजी सिंधूनगर नाव देण्याची मागणी त्यावेळी केली होती. मात्र फाळणीच्या कटू आठवणी नको म्हणून उल्हासनगर नाव देण्यात आले. 

अतिशय काटक, उधोगप्रिय असलेल्या सिंधी बांधवानी शहराचे नाव राज्य, देश नव्हेतर जगावर छाप टाकली. सिंधी समाजाच्या नागरिकांनी बांधकाम व्यावसायिक, सिनेमा क्षेत्र, उधोग, हॉटेल, कपडे, फर्निचर आदी अनेक क्षेत्रात आपल्या नावाचा ठसा उमठविला. मात्र शहर विकास नावाला होऊन हजारो नागरिकांचा जीव धोकादायक व अनाधिकृत इमारातीमुळे टांगणीला लागला. देशात सिमेंट रस्त्याची सुरुवात शहरातून झाली असून शहरातील सिमेंट रस्ते डोळ्यासमोर ठेवून, इतर शहरे व देश सिमेंट रस्ते बांधत आहेत. तर शहरात खराब झालेल्या सिमेंट रस्त्यावर सिमेंट रस्ते बांधले जात आहे. एकूणच रस्त्याची दुरावस्था झाली असून अनेक ठिकाणी पाणी टंचाईचीही समस्या उभी ठाकली आहे. तर महापालिकेच्या बहुतांश विभागात सावळा गोंधळ उडाला असून महापालिका कारभारावर टीकेची झोड उठली आहे. एकूणच ७२ वर्षानंतरही शहर बकाल व समस्यांचा पाऊस पडत आहे.

महापालिका कारभारात हवी पारदर्शकता अवघे साडे १३ कि.मी. च्या क्षेत्रफळाच्या शहरात ९ लाखा पेक्षा जास्त लोकसंख्या दाटीवाटीने राहत आहे. देशातील सर्वाधिक घनता शहराची असून शहराची हद्द वाढविण्याची मागणी वारंवार शासनाकडे होत आहे. तसेच महापालिकेचा पारदर्शक नसल्याने, शहरात समस्यांचा पाऊस पडला. यावेळी शहर विकासाचे व विभागातील गोंधळाचे खापर पालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांच्यावर फोडण्यात येत आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरWaterपाणीbusinessव्यवसाय