शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते, पाणी, साफसफाई आदी मूलभूत गरजेची वानवा; उल्हासनगरचा ७२ वा वर्धापन दिवस, मात्र समस्या जैसे थे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 16:56 IST

८ ऑगस्ट रोजी शहराचा ७२ व्या वर्धापन दिन साजरा होत आहे. अनेक मूलभूत समस्यांमुळे नागरिक झालेत त्रस्त.

ठळक मुद्दे८ ऑगस्ट रोजी शहराचा ७२ व्या वर्धापन दिन साजरा होत आहे.अनेक मूलभूत समस्यांमुळे नागरिक झालेत त्रस्त.

सदानंद नाईक उल्हासनगर : ८ ऑगस्ट रोजी शहराचा ७२ व्या वर्धापन दिन साजरा होत असतांना दुसरीकडे पाणी टंचाई, साफसफाई, रस्ते, आरोग्य आदी मूलभूत समस्याने नागरिक त्रस्त आहेत. शहरातील अनाधिकृत व धोकादायक इमारतींचा प्रश्न उभा ठाकला असून महापालिकेच्या बहुतांश विभागात सावळागोंधळ उडून आयुक्त डॉ राजा दयानिधी यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहे. फाळणीवेळी पाकिस्तान मधील सिंध प्रांतातून सिंधी समाजसह अन्य समाजाच्या नागरिकांनी भारतात येणे पसंत केले. विस्थापित झालेल्या पैकी ९५ हजारा पेक्षा जास्त नागरिकांना कल्याण शहारा जवळींल लष्करी छावणीतील बेरेक, खुली जागा आदी ठिकाणावर वसविण्यात आले. भारताचे पहिले गव्हर्नर सी राजगोपालचारी यांनी शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदी वरून विस्थापित वस्तीला उल्हासनगर नाव दिलं. मात्र अनेक सिंधी बांधवानी उल्हासनगर ऐवजी सिंधूनगर नाव देण्याची मागणी त्यावेळी केली होती. मात्र फाळणीच्या कटू आठवणी नको म्हणून उल्हासनगर नाव देण्यात आले. 

अतिशय काटक, उधोगप्रिय असलेल्या सिंधी बांधवानी शहराचे नाव राज्य, देश नव्हेतर जगावर छाप टाकली. सिंधी समाजाच्या नागरिकांनी बांधकाम व्यावसायिक, सिनेमा क्षेत्र, उधोग, हॉटेल, कपडे, फर्निचर आदी अनेक क्षेत्रात आपल्या नावाचा ठसा उमठविला. मात्र शहर विकास नावाला होऊन हजारो नागरिकांचा जीव धोकादायक व अनाधिकृत इमारातीमुळे टांगणीला लागला. देशात सिमेंट रस्त्याची सुरुवात शहरातून झाली असून शहरातील सिमेंट रस्ते डोळ्यासमोर ठेवून, इतर शहरे व देश सिमेंट रस्ते बांधत आहेत. तर शहरात खराब झालेल्या सिमेंट रस्त्यावर सिमेंट रस्ते बांधले जात आहे. एकूणच रस्त्याची दुरावस्था झाली असून अनेक ठिकाणी पाणी टंचाईचीही समस्या उभी ठाकली आहे. तर महापालिकेच्या बहुतांश विभागात सावळा गोंधळ उडाला असून महापालिका कारभारावर टीकेची झोड उठली आहे. एकूणच ७२ वर्षानंतरही शहर बकाल व समस्यांचा पाऊस पडत आहे.

महापालिका कारभारात हवी पारदर्शकता अवघे साडे १३ कि.मी. च्या क्षेत्रफळाच्या शहरात ९ लाखा पेक्षा जास्त लोकसंख्या दाटीवाटीने राहत आहे. देशातील सर्वाधिक घनता शहराची असून शहराची हद्द वाढविण्याची मागणी वारंवार शासनाकडे होत आहे. तसेच महापालिकेचा पारदर्शक नसल्याने, शहरात समस्यांचा पाऊस पडला. यावेळी शहर विकासाचे व विभागातील गोंधळाचे खापर पालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांच्यावर फोडण्यात येत आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरWaterपाणीbusinessव्यवसाय