शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

कोकण रेल्वेचा स्वच्छता दूत ! कुमठा स्थानक ठरतेय कोकण रेल्वेचे आकर्षण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2018 13:18 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशनपासून प्रेरणा घेऊन राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यातील एक व्यावसायिक स्वयंप्रेरणेने कोकण रेल्वे मार्गावरील कुमठा रेल्वे स्थानकात स्वच्छता दूताची भूमिका इमानेइतबारे निभावित आहे.

नारायण जाधव / कुमठा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशनपासून प्रेरणा घेऊन राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यातील एक व्यावसायिक स्वयंप्रेरणेने कोकण रेल्वे मार्गावरील कुमठा रेल्वे स्थानकात स्वच्छता दूताची भूमिका इमानेइतबारे निभावित आहे. श्रावणलाल अगरवाल असे या अवलियाचे नाव असून त्याच्या या मिशनचा कोकण रेल्वेस सार्थ अभिमान असल्याचा विश्वास कोकण रेल्वेचे कारवार विभागीय सहाय्यक महाव्यवस्थापक मोहम्मद असीफ सुलेमान व्यक्त केला.  

कोकण रेल्वे मार्गावरील कुमटा हे एक छोटे स्टेशन. दिवसभरात येजा करणाऱ्या 26 गाड्या या ठिकाणी थांबतात. यामुळे तीन तालुक्यांच्या दृष्टीने त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. सुरुवातीला हे स्थानक इतर स्थानकांसारखे गलिच्छ होते. एक दिवस कापड व्यावसायिक अगरवाल यांना हा गलिच्छपणा पाहवला नाही. त्यांनी स्वत:च हाती झाडू घेऊन स्वच्छतेस सुरुवात केली. नंतर हे स्थानकच दत्तक घेतले. आता आठवड्यातून दोनदा 20 कामगारांना घेऊन स्थानक स्वच्छ करतात. 

या कामगारांना जेवण आणि दिवसभरासाठी हजार रुपये मजुरी स्वताच्या खिशातून देतात. गेली तीन वर्षे त्यांची ही स्वच्छता अविरत सुरू आहे. यामुंळे ते खऱ्या अर्थाने स्वच्छता दूत ठरले आहेत. अगरवाल एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी कुमठा स्थानकात स्वखर्चाने सीसीटीव्ही बसवून सुरक्षिततेचा वसा ही जपला आहे. त्यांचे हे दातृत्व नक्कीच गौरवास्पद असल्याचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी गिरीश करंदीकर म्हणाले. 

देशातील धनिक नागरिकांनी स्वंयप्रेरणेने पुढे येऊन एकेक करून सर्व रेल्वे स्थानक दत्तक घेतले तर भारतीय रेल्वे जगात सर्वोत्तम होईल, असे अगरवाल सांगतात. तर अगरवाल याची स्वच्छतेप्रती असलेली निष्ठा आम्हालाही खूप काही करून शिकवून जाते असे मत कोकण रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्यिक व्यवस्थापक सुनील नारकर यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :konkanकोकणIndian Railwayभारतीय रेल्वे