शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

कोंडीवर मेट्रो हा आहे पर्याय - अश्विनी भिडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 3:33 AM

नरेंद्र बल्लाळ व्याख्यानमाला, ठाणे, मीरा-भार्इंदर, वसई ही शहरे वेगाने वाढणार

ठाणे : पुढच्या पिढीसाठी भविष्याचा वेध घ्यावा लागेल. प्रदूषणाची समस्या आणि रस्त्यावरची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मेट्रोचे जाळे उभे करणे आवश्यक आहे. यामुळे रस्त्यावरची वाहतूक कोंडी १०० टक्के सुटेलच असे नाही, वाहनेदेखील कमी होणार नाहीत, पण वाहतुकीसाठी पर्याय म्हणून मेट्रोकडे पाहावे लागेल, असे मत मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी व्यक्त केले.

अर्थ फाउंडेशनतर्फे आयोजित श्रीरंग विद्यालयाच्या पटांगणात सुरू असलेल्या नरेंद्र बल्लाळ स्मृती व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प शनिवारी भिडे यांनी गुंफले. यावेळी आमदार संजय केळकर, अर्थ फाउंडेशनच्या अ‍ॅड. माधवी नाईक, ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ उपस्थित होते. त्या म्हणाल्या की, महानगरातील अक्राळविक्राळ समस्या सोडविण्यासाठी खूप मोठे प्रकल्प हाती घ्यावे लागतात. त्यासाठी सरकारचा व्यापक दृष्टिकोन असतो. भविष्यातील मोठ्या समस्या सोडविताना उद्भवणाऱ्या छोट्या समस्या नागरिकांना सहन कराव्या लागतात आणि तिथून नागरिकांचा विरोध होतो. मुंबईनंतर मेट्रो प्रकल्प ठाण्यात होणार आहे. २०३१मध्ये मुंबईची लोकसंख्या कमी होईल आणि दुसरीकडे उर्वरित शहरांची लोकसंख्या ही अधिकाधिक वाढत जाईल.ठाणे, मीरा-भार्इंदर, वसई, विरार ही शहरे वेगाने वाढणार आहेत. वाढलेल्या शहरांवर सोयीसुविधांचे रोपण करणे कठीण असते. मग सरकारला विविध प्रकल्प हाती घ्यावे लागतात, पण त्याचबरोबर नागरी समस्यांनाही तोंड द्यावे लागते. परंतु यात राज्य सरकार आणि नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असतो. वाढत्या वाहतूक कोंडीवर मेट्रो हा पर्याय आहे. वाढती वाहनांची संख्या हे प्रदूषणाचे मोठे कारण आहे.‘सर्वांचे सहकार्य आवश्यक’भविष्यात मुंबईची प्रवासी वाहून नेण्याची क्षमता वाढणार आहे. मेट्रोमुळे प्रवासाची गुणवत्ता चांगली होणार आहे. मेट्रो प्रकल्पामुळे मुंबईचा चेहरा बदलेल. भूमिगत असलेला हा एकमेव प्रकल्प असून भुयारी मार्गातून मेट्रो चालवणे हे मोठे आव्हान आहे. ठाण्यातही हा प्रकल्प हळुहळू राबविला जाईल. मेट्रो प्रकल्प ३ हा २०२१ पर्यंत पूर्ण होईल. मेट्रोतून दररोज १२ लाख प्रवासी प्रवास करतील. एकूण क्षमता १७ लाखांची आहे. इतका मोठा प्रकल्प वेळेत पूर्ण करायचा तर सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :thaneठाणे