शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याची गुणवत्ता आता रोजच्या रोज समजणार; पालिकेचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 00:42 IST

शहरातील तलावांवर लावणार आधुनिक यंत्रणा

ठाणे : तलावांचे प्रदूषण रोखण्याबरोबरच त्यातील पाण्याची गुणवत्ता योग्य ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेने आता हायटेक प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानुसार, प्रशासनाने आता तलावांमध्ये अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यास सुरुवात केली आहे. याची सुरुवात कचराळी तलावापासून करण्यात आली आहे. यामुळे प्रशासनासह नागरिकांना रोजच्या रोज तलावातील पाण्याच्या गुणवत्तेची माहिती उपलब्ध होणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात येत्या दोन महिन्यांत मासुंदा, उपवन आणि आंबेघोसाळे तलावांतही यंत्रणा बसवली जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.ठाणे महापालिका हद्दीत आजघडीला ३५ तलाव शिल्लक असून त्यातील हाताच्या बोटांवर मोजता येतील, एवढेच तलाव सुस्थितीत आहेत. या तलावांचे क्षेत्रफळ ४० हेक्टर इतके आहे. आता शिल्लक राहिलेल्या या तलावांचे सुशोभीकरण, प्रदूषण नियंत्रणात ठेवणे आणि पाण्याची गुणवत्ता राखणे, अशा उपाययोजना केल्या जात आहेत. तलावांच्या पाण्याची गुणवत्ता राखण्यासाठी बायो-प्रॉडक्टचा डोस नियमितपणे दिला जात असून त्याचबरोबर एरिएशन यंत्रणाही चालवली जाते. त्यामुळे २४ तलावांपैकी १८ तलावांमध्ये पाण्याची गुणवत्ता मागील वर्षीपेक्षा सुधारल्याची बाब पर्यावरण अहवालातून समोर आली होती.

असे असले तरी तलावांच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी पाण्याचे नमुने प्रशासनाकडून घेतले जातात आणि ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जातात. परंतु, ही काहीशी अवघड प्रक्रिया असल्याने पालिकेला नियमितपणे त्यावर भर देता येत नव्हता. त्यामुळे तलावाच्या पाण्याच्या गुणवत्तेची माहिती दररोज उपलब्ध होत नसल्याने त्याठिकाणी तत्काळ उपाययोजना करणे प्रशासनाला शक्य होत नाही. परिणामी, पाण्याची गुणवत्ता सुधारण्यात अडचणी निर्माण होतात.

नेमकी ही बाब लक्षात घेऊन महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाने आता तलावांमध्ये अत्याधुनिक यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार सुरुवातीला कचराळी तलावामध्ये ही यंत्रणा बसवण्यात आली असून पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ती सुरू करण्यात आली आहे. या यंत्रणेमुळे प्रशासनासह नागरिकांना रोजच्यारोज पाणी गुणवत्तेची माहिती उपलब्ध होणार आहे.

तत्काळ उपाययोजना करणे होईल शक्यया यंत्रणेच्या माध्यमातून रोजच्यारोज एकाच वेळी सहा ठिकाणांहून तलावाचे पाणी शोषून त्याचे विश्लेषण करणार आहे. त्यामध्ये तलावात विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण तसेच अन्य घटकांची माहिती उपलब्ध होणार आहे. ही माहिती तत्काळ तलावाजवळ बसवलेल्या डिजिटल फलकावर प्रदर्शित होणार आहे. त्याचबरोबर ही माहिती महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागालाही तत्काळ मिळणार आहे. त्यामुळे पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी त्यांना तत्काळ उपाययोजना करणे शक्य होणार आहे. ही माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावरही प्रसारित करण्याचा प्रशासनाचा विचार आहे. त्यानंतर, शहरातील मासुंदा, उपवन आणि आंबेघोसाळे तलावांतही ही यंत्रणा बसवण्यात येणार असल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रमुख मनीषा प्रधान यांनी दिली.

टॅग्स :Waterपाणी