शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

खोपकर ते आव्हाड; राजकारणातील सूडचक्र

By संदीप प्रधान | Updated: November 21, 2022 10:58 IST

राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना व एकनाथ शिंदे यांनी ‘उठाव’ करून भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील अनेक प्रकल्प झटपट मार्गी लागत आहेत. नगरविकासाच्या निधीची गंगा दुथडी भरून वाहत आहे.

संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादक -

ठाणे ही सांस्कृतिक नगरी असली व येथे गाणे वाजविण्याच्या कार्यक्रमाला एकत्र येणारे राजकीय नेते परस्परांच्या गळ्यात गळे घालताना दिसत असले तरी ठाण्याचा राजकीय इतिहास हा काल रक्तरंजित होता व आजही हिंसक, सुडाचा आहे, हेच पुन्हा पुन्हा दिसत आहे. मते फुटल्याच्या संशयातून श्रीधर खोपकर यांची एकेकाळी ठाण्यात भररस्त्यात हत्या झाली होती. आता एखाद्याला राजकीय जीवनातून उठविण्याकरिता तलवार-चॉपर घेऊन मागे लागायची गरज नाही. विनयभंगाची केस पुरेशी आहे, हेच आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रकरणातून दिसून आले.राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना व एकनाथ शिंदे यांनी ‘उठाव’ करून भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील अनेक प्रकल्प झटपट मार्गी लागत आहेत. नगरविकासाच्या निधीची गंगा दुथडी भरून वाहत आहे. अशाच पद्धतीने कळवा येथे उभारण्यात आलेल्या एका पुलाच्या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री शिंदे व आव्हाड हजर होते. व्यासपीठावर कानगोष्टी करून, परस्परांना टाळ्या देऊन त्यांनी फोटोग्राफरना क्लिकची संधी दिली. त्यानंतर गर्दीतून तरातरा बाहेर पडण्याची आव्हाड यांना इतकी घाई का झाली होती, ते कळायला मार्ग नाही. परंतु गर्दीतून वाट काढत असताना भाजपची पदाधिकारी असलेली एक महिला त्यांच्या मार्गात आडवी आली. आव्हाड यांनी तिच्या खांद्याला स्पर्श करून तिला बाजूला केले. लागलीच तिने त्यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतरचे रामायण साऱ्यांनाच ठाऊक आहे. तत्पूर्वी ‘हर हर महादेव’ या चुकीचा इतिहास दाखवत असल्याचा आरोप असलेला चित्रपट बंद पाडायला काल-परवापर्यंत मंत्रिपदावर असलेले आव्हाड स्वत: सरसावले. त्यावेळी एका प्रेक्षकाला मारहाण झाल्याने त्याचे बालंट त्यांच्यावर आले.आपल्यासमोरचा विरोधक किती प्रबळ आहे व तो कुठल्या थराला जाऊ शकतो, याचे भान राजकारणात यायला हवे व त्याचे भान राखून पावले उचलायला हवीत. ठाण्यात मागील विधानसभा निवडणुकीपूर्वीपर्यंत शिवसेना व राष्ट्रवादी हेच स्पर्धक किंवा शत्रू होते. महाविकास आघाडी सरकार आल्यावर जिल्ह्यातील राजकीय गणिते उलटी-पालटी झाली. आव्हाड आणि मातोश्री यांची जवळीक सत्तेच्या काळात बरीच वाढल्याची चर्चा आहे. काँग्रेस जिल्ह्यात चिमटीत येणार नाही इतकी आहे. भाजपची ताकद गेल्या आठ वर्षांत वाढली असली तरी ठाण्यात या पक्षाकडे आश्वासक चेहरा नाही. त्यामुळे भिवंडीतील कपिल पाटील यांना केंद्रात राज्यमंत्री करून पक्षाने ताकद दिली. असे असले तरी राजकारण शिंदे-आव्हाड या जोडगोळीभोवती फिरते. राज्यात भाजपबरोबर सत्ता असली तरी ठाणे जिल्ह्यात डोंबिवलीतील रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामापासून अंबरनाथच्या गोळीबारात बाळासाहेबांची शिवसेना विरुद्ध भाजप संघर्ष वाढताना दिसतोय.

जिल्ह्यात भाजप वाढला तर आपली डोकेदुखी वाढेल, याची शिंदे यांनाही जाणीव आहे. त्यामुळे आव्हाड यांच्यावर हल्ले झाल्याने ठाण्यातील राजकीय पटलावरून भाजप हद्दपार होऊन बाळासाहेबांची शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत होण्याची शक्यता काहींना यात वाटते.दुसरीकडे मातोश्रीसोबत आव्हाडांची जवळीक ही भविष्यात डोकेदुखी ठरू नये याकरिता सत्ताधारी पक्षांनी सहमतीने केलेली ही खेळी असल्याचे काहींचे म्हणणे आहे. राजकारण पुढे जात नाही तोपर्यंत या घटनांचे कंगोरे उलगडणार नाहीत. पण ठाण्यातील राजकारणातील विखार तसुभर कमी झालेला नाही, हेच खरे.

 

टॅग्स :thaneठाणेJitendra Awhadजितेंद्र आव्हाडPoliceपोलिस