शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

खोपकर ते आव्हाड; राजकारणातील सूडचक्र

By संदीप प्रधान | Updated: November 21, 2022 10:58 IST

राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना व एकनाथ शिंदे यांनी ‘उठाव’ करून भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील अनेक प्रकल्प झटपट मार्गी लागत आहेत. नगरविकासाच्या निधीची गंगा दुथडी भरून वाहत आहे.

संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादक -

ठाणे ही सांस्कृतिक नगरी असली व येथे गाणे वाजविण्याच्या कार्यक्रमाला एकत्र येणारे राजकीय नेते परस्परांच्या गळ्यात गळे घालताना दिसत असले तरी ठाण्याचा राजकीय इतिहास हा काल रक्तरंजित होता व आजही हिंसक, सुडाचा आहे, हेच पुन्हा पुन्हा दिसत आहे. मते फुटल्याच्या संशयातून श्रीधर खोपकर यांची एकेकाळी ठाण्यात भररस्त्यात हत्या झाली होती. आता एखाद्याला राजकीय जीवनातून उठविण्याकरिता तलवार-चॉपर घेऊन मागे लागायची गरज नाही. विनयभंगाची केस पुरेशी आहे, हेच आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रकरणातून दिसून आले.राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना व एकनाथ शिंदे यांनी ‘उठाव’ करून भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील अनेक प्रकल्प झटपट मार्गी लागत आहेत. नगरविकासाच्या निधीची गंगा दुथडी भरून वाहत आहे. अशाच पद्धतीने कळवा येथे उभारण्यात आलेल्या एका पुलाच्या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री शिंदे व आव्हाड हजर होते. व्यासपीठावर कानगोष्टी करून, परस्परांना टाळ्या देऊन त्यांनी फोटोग्राफरना क्लिकची संधी दिली. त्यानंतर गर्दीतून तरातरा बाहेर पडण्याची आव्हाड यांना इतकी घाई का झाली होती, ते कळायला मार्ग नाही. परंतु गर्दीतून वाट काढत असताना भाजपची पदाधिकारी असलेली एक महिला त्यांच्या मार्गात आडवी आली. आव्हाड यांनी तिच्या खांद्याला स्पर्श करून तिला बाजूला केले. लागलीच तिने त्यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतरचे रामायण साऱ्यांनाच ठाऊक आहे. तत्पूर्वी ‘हर हर महादेव’ या चुकीचा इतिहास दाखवत असल्याचा आरोप असलेला चित्रपट बंद पाडायला काल-परवापर्यंत मंत्रिपदावर असलेले आव्हाड स्वत: सरसावले. त्यावेळी एका प्रेक्षकाला मारहाण झाल्याने त्याचे बालंट त्यांच्यावर आले.आपल्यासमोरचा विरोधक किती प्रबळ आहे व तो कुठल्या थराला जाऊ शकतो, याचे भान राजकारणात यायला हवे व त्याचे भान राखून पावले उचलायला हवीत. ठाण्यात मागील विधानसभा निवडणुकीपूर्वीपर्यंत शिवसेना व राष्ट्रवादी हेच स्पर्धक किंवा शत्रू होते. महाविकास आघाडी सरकार आल्यावर जिल्ह्यातील राजकीय गणिते उलटी-पालटी झाली. आव्हाड आणि मातोश्री यांची जवळीक सत्तेच्या काळात बरीच वाढल्याची चर्चा आहे. काँग्रेस जिल्ह्यात चिमटीत येणार नाही इतकी आहे. भाजपची ताकद गेल्या आठ वर्षांत वाढली असली तरी ठाण्यात या पक्षाकडे आश्वासक चेहरा नाही. त्यामुळे भिवंडीतील कपिल पाटील यांना केंद्रात राज्यमंत्री करून पक्षाने ताकद दिली. असे असले तरी राजकारण शिंदे-आव्हाड या जोडगोळीभोवती फिरते. राज्यात भाजपबरोबर सत्ता असली तरी ठाणे जिल्ह्यात डोंबिवलीतील रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामापासून अंबरनाथच्या गोळीबारात बाळासाहेबांची शिवसेना विरुद्ध भाजप संघर्ष वाढताना दिसतोय.

जिल्ह्यात भाजप वाढला तर आपली डोकेदुखी वाढेल, याची शिंदे यांनाही जाणीव आहे. त्यामुळे आव्हाड यांच्यावर हल्ले झाल्याने ठाण्यातील राजकीय पटलावरून भाजप हद्दपार होऊन बाळासाहेबांची शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत होण्याची शक्यता काहींना यात वाटते.दुसरीकडे मातोश्रीसोबत आव्हाडांची जवळीक ही भविष्यात डोकेदुखी ठरू नये याकरिता सत्ताधारी पक्षांनी सहमतीने केलेली ही खेळी असल्याचे काहींचे म्हणणे आहे. राजकारण पुढे जात नाही तोपर्यंत या घटनांचे कंगोरे उलगडणार नाहीत. पण ठाण्यातील राजकारणातील विखार तसुभर कमी झालेला नाही, हेच खरे.

 

टॅग्स :thaneठाणेJitendra Awhadजितेंद्र आव्हाडPoliceपोलिस