शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

शहरातील वाहतूक समस्येचे मूळ केडीएमसीची कुचकामी यंत्रणा, 'त्या' अहवालाच्या अंमलबजावणीसाठी निधीची चणचण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2017 19:59 IST

शहरातील वाहतूक नियंत्रण व्यवस्था कोलमडायला केवळ रिक्षाचालक कारणीभूत नाहीत. त्याला कल्याण-डोंबिवली महापालिकेची कुचकामी यंत्रणा कारणीभूत आहे. आपापसात वाद घालण्यापेक्षा जे समस्येचे मुळ कारण आहे

डोंबिवली, दि. 15 - शहरातील वाहतूक नियंत्रण व्यवस्था कोलमडायला केवळ रिक्षाचालक कारणीभूत नाहीत. त्याला कल्याण-डोंबिवली महापालिकेची कुचकामी यंत्रणा कारणीभूत आहे. आपापसात वाद घालण्यापेक्षा जे समस्येचे मुळ कारण आहे त्यावर लक्ष केंद्रित करणे महत्वाचे आहे. महापालिकडे शहराची कोंडी तसेच अन्य नागरि समस्यांसाठी वेळ नसल्याने सर्व प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहेत. याचा स्फोट होण्याची यंत्रणा वाट बघत आहे का? असा खरमरीत सवाल रिक्षा युनियनसह रिक्षाचालकांनी आरटीओ आणि वाहतूक नियंत्रण अधिका-यांना केला.शहरातील वाहतूक कोंडीसह रिक्षातील चौथी सीट नको, अधिकृत स्टँड कुठले आदी प्रश्नांमुळे प्रवासी संघटना आणि रिक्षाचालक यांच्यात होत असलेले मतभेद मिटवण्यासाठ, समेट घडवून आणण्यासाठी शुक्रवारी डोंबिवलीत बैठक पार पडली. ती बैठक शहर वाहतूक विभागाचे पोलीस अधिकारी बाबासाहेब आव्हाड, गोविंद गंभीरे यांनी  आयोजित केली होती. त्याला आरटीओ अधिकारी संजय ससाणे, केडिएमटीचे सभापती संजय पावशे, व्यवस्थापक देवीदास टेकाळे, महापालिकेचे संजय भालेराव, रिक्षायुननियनचे शेखर जोशी, दत्ता माळेकर, काळु कोमास्कर, संजय मांजरेकर, अंकुश म्हात्रे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. प्रवासी संस्थांचेही पदाधिकारी उपस्थित होते. त्यावेळी झालेल्या चर्चेत कोमास्कर, माळेकर, जोशी यांनी चौथी सीट घेण्याबद्दल जो कोणी नियम तोडत असेल त्याच्यावर कारवाई करा, पण केडीएमटीच्या बसमधून जी अतिरिक्त प्रवासी ने-आण केली जाते त्याच्यावरही कारवाई करा अशी जोरदार मागणी केली. काहीही झाले की रिक्षाचालक मुजोर, रिक्षाचालक असे-तसे असे नानाविध आरोप केले जातात, सगळेच तसे नसतात हे का नाही ध्यान्यात घेतले जात असा सवाल विचारण्यात आला. महापालिकेचे हे धोरण म्हणजे तु लढो हम कपडे संभालते हैं अशी भूमिका झाली. महापालिका नेहमीच बघ्याची भूमिका घेते, ते योग्य नाही. सगळयांना नियम सारखे असून कधी म्हणायचे की चौथी सीट घ्या कधी नाही असे कुचकामी धोरण आरटीओ-ट्रॅफिकने घेऊ नये. तसेच चौथी सीट घेतली नाही म्हणुन आमच्या रिक्षाचालकावर एका प्रवाशाने हात उचलला त्याची जबाबदारी प्रवासी संस्थेने घ्यावी, असे आवाहन करण्यात आल्यावर मात्र प्रवासी संस्थांनी ही जबाबदारी आमची नाही हे स्पष्ट केले. एप्रिल महहिन्यात जो अहवाल देण्यात आला होता त्याची अंमलबजावणी महापालिकेने का केली नाही या मुद्यावर सगळळ्यांचे एकमत झाले, आणि आगामी होणारी बैठक ही आयुक्तांच्या दालनात व्हावी असा निर्णय घेण्यात आला. त्यावर त्या अहवालाची अंमलबजावणी करण्यासाठी निधीची चणचण असल्याचे स्पष्टीकरण महापालिकेने केल्याचे ससाणे म्हणाले. प्रवासी संस्थांनी फेरिवाले, खड्डे, सिग्नल यंत्रणा नसणे, रेलींग नसणे, गतीरोधक, झेब्रा क्रॉसिंग या सर्व विषयांवर लक्ष केंद्रित करावे अशी मागणी शेखर जोशी यांनी केली. त्याला सगळयांनी समर्थन केले. तर कायदा कोणी हातात घेऊ नये, त्यासाठी आरटीओ-ट्रॅफिक यंत्रणा सक्षम आहेत असा टोला दत्ता माळेकर यांनी प्रवासी संस्थांना लगावला. केवळ रिक्षाचालक लक्ष्य करु नये तर परिवहन व्यवस्था मजबूत करावी असेही त्यानिमित्ताने आवाहन पावशे यांनी टेकाळे यांना केले. प्रवासी समन्वय समिती  असावी असे आवाहन परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी केले, मागणीनूसार सर्वेक्षणासाठी अधिकारी पाठवला जाईल असे आश्वासन दिले. 

टॅग्स :Policeपोलिस