शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

शहरातील वाहतूक समस्येचे मूळ केडीएमसीची कुचकामी यंत्रणा, 'त्या' अहवालाच्या अंमलबजावणीसाठी निधीची चणचण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2017 19:59 IST

शहरातील वाहतूक नियंत्रण व्यवस्था कोलमडायला केवळ रिक्षाचालक कारणीभूत नाहीत. त्याला कल्याण-डोंबिवली महापालिकेची कुचकामी यंत्रणा कारणीभूत आहे. आपापसात वाद घालण्यापेक्षा जे समस्येचे मुळ कारण आहे

डोंबिवली, दि. 15 - शहरातील वाहतूक नियंत्रण व्यवस्था कोलमडायला केवळ रिक्षाचालक कारणीभूत नाहीत. त्याला कल्याण-डोंबिवली महापालिकेची कुचकामी यंत्रणा कारणीभूत आहे. आपापसात वाद घालण्यापेक्षा जे समस्येचे मुळ कारण आहे त्यावर लक्ष केंद्रित करणे महत्वाचे आहे. महापालिकडे शहराची कोंडी तसेच अन्य नागरि समस्यांसाठी वेळ नसल्याने सर्व प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहेत. याचा स्फोट होण्याची यंत्रणा वाट बघत आहे का? असा खरमरीत सवाल रिक्षा युनियनसह रिक्षाचालकांनी आरटीओ आणि वाहतूक नियंत्रण अधिका-यांना केला.शहरातील वाहतूक कोंडीसह रिक्षातील चौथी सीट नको, अधिकृत स्टँड कुठले आदी प्रश्नांमुळे प्रवासी संघटना आणि रिक्षाचालक यांच्यात होत असलेले मतभेद मिटवण्यासाठ, समेट घडवून आणण्यासाठी शुक्रवारी डोंबिवलीत बैठक पार पडली. ती बैठक शहर वाहतूक विभागाचे पोलीस अधिकारी बाबासाहेब आव्हाड, गोविंद गंभीरे यांनी  आयोजित केली होती. त्याला आरटीओ अधिकारी संजय ससाणे, केडिएमटीचे सभापती संजय पावशे, व्यवस्थापक देवीदास टेकाळे, महापालिकेचे संजय भालेराव, रिक्षायुननियनचे शेखर जोशी, दत्ता माळेकर, काळु कोमास्कर, संजय मांजरेकर, अंकुश म्हात्रे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. प्रवासी संस्थांचेही पदाधिकारी उपस्थित होते. त्यावेळी झालेल्या चर्चेत कोमास्कर, माळेकर, जोशी यांनी चौथी सीट घेण्याबद्दल जो कोणी नियम तोडत असेल त्याच्यावर कारवाई करा, पण केडीएमटीच्या बसमधून जी अतिरिक्त प्रवासी ने-आण केली जाते त्याच्यावरही कारवाई करा अशी जोरदार मागणी केली. काहीही झाले की रिक्षाचालक मुजोर, रिक्षाचालक असे-तसे असे नानाविध आरोप केले जातात, सगळेच तसे नसतात हे का नाही ध्यान्यात घेतले जात असा सवाल विचारण्यात आला. महापालिकेचे हे धोरण म्हणजे तु लढो हम कपडे संभालते हैं अशी भूमिका झाली. महापालिका नेहमीच बघ्याची भूमिका घेते, ते योग्य नाही. सगळयांना नियम सारखे असून कधी म्हणायचे की चौथी सीट घ्या कधी नाही असे कुचकामी धोरण आरटीओ-ट्रॅफिकने घेऊ नये. तसेच चौथी सीट घेतली नाही म्हणुन आमच्या रिक्षाचालकावर एका प्रवाशाने हात उचलला त्याची जबाबदारी प्रवासी संस्थेने घ्यावी, असे आवाहन करण्यात आल्यावर मात्र प्रवासी संस्थांनी ही जबाबदारी आमची नाही हे स्पष्ट केले. एप्रिल महहिन्यात जो अहवाल देण्यात आला होता त्याची अंमलबजावणी महापालिकेने का केली नाही या मुद्यावर सगळळ्यांचे एकमत झाले, आणि आगामी होणारी बैठक ही आयुक्तांच्या दालनात व्हावी असा निर्णय घेण्यात आला. त्यावर त्या अहवालाची अंमलबजावणी करण्यासाठी निधीची चणचण असल्याचे स्पष्टीकरण महापालिकेने केल्याचे ससाणे म्हणाले. प्रवासी संस्थांनी फेरिवाले, खड्डे, सिग्नल यंत्रणा नसणे, रेलींग नसणे, गतीरोधक, झेब्रा क्रॉसिंग या सर्व विषयांवर लक्ष केंद्रित करावे अशी मागणी शेखर जोशी यांनी केली. त्याला सगळयांनी समर्थन केले. तर कायदा कोणी हातात घेऊ नये, त्यासाठी आरटीओ-ट्रॅफिक यंत्रणा सक्षम आहेत असा टोला दत्ता माळेकर यांनी प्रवासी संस्थांना लगावला. केवळ रिक्षाचालक लक्ष्य करु नये तर परिवहन व्यवस्था मजबूत करावी असेही त्यानिमित्ताने आवाहन पावशे यांनी टेकाळे यांना केले. प्रवासी समन्वय समिती  असावी असे आवाहन परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी केले, मागणीनूसार सर्वेक्षणासाठी अधिकारी पाठवला जाईल असे आश्वासन दिले. 

टॅग्स :Policeपोलिस