शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

केडीएमसीची आर्थिककोंडी : सरकारकडे थकले ९५० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 1:53 AM

केडीएमसीला यंदाच्या वर्षी ३०० कोटी व पुढील वर्षी ३३४ कोटींच्या तुटीचा सामना करावा लागणार आहे. महापालिकेस सरकारकडून एलबीटी व २७ गावांच्या हद्दवाढ अनुदानापोटी एकूण ९५० कोटी रुपयांचे अनुदान अपेक्षित आहे. सरकारने ते दिल्यास महापालिकेतील आर्थिककोंडी फुटू शकते. सध्या सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात महापालिका हद्दीतील आमदारांनी हा विषय लावून धरल्यास सरकारकडून हे अनुदान मिळू शकते, अशी अपेक्षा महापालिकेकडून व्यक्त केली जात आहे.

मुरलीधर भवार कल्याण : केडीएमसीला यंदाच्या वर्षी ३०० कोटी व पुढील वर्षी ३३४ कोटींच्या तुटीचा सामना करावा लागणार आहे. महापालिकेस सरकारकडून एलबीटी व २७ गावांच्या हद्दवाढ अनुदानापोटी एकूण ९५० कोटी रुपयांचे अनुदान अपेक्षित आहे. सरकारने ते दिल्यास महापालिकेतील आर्थिककोंडी फुटू शकते. सध्या सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात महापालिका हद्दीतील आमदारांनी हा विषय लावून धरल्यास सरकारकडून हे अनुदान मिळू शकते, अशी अपेक्षा महापालिकेकडून व्यक्त केली जात आहे.महापालिकेच्या २०१५-१६ मधील अंदाजपत्रकात महसुली खर्च ७०१ कोटींचा अपेक्षित होता. प्रत्यक्षात महापालिकेच्या तिजोरीत करवसुलीतून ६१७ कोटी रुपये जमा झाले. २०१६-१७ मधील अंदाजपत्रकात ९७७ कोटी अपेक्षित होते. प्रत्यक्षात ७६७ कोटी रुपये जमा झाले. यंदाच्या वर्षी एक हजार ७९ कोटी अपेक्षित होते. प्रत्यक्षात ३३ टक्के करवसुली झाली आहे. जून २०१५ मध्ये २७ गावे महापालिकेच्या हद्दीत आली. २०१५ चा अर्थसंकल्प एप्रिल २०१५ मध्येच तयार झाला होता. त्यामुळे २७ गावांतून मालमत्ता व अन्य करापोटी किती जमा होईल, याचा अंदाज त्यात नमूद केलेला नव्हता. २०१६-१७ मधील अर्थसंकल्प २७ गावांतून मालमत्ताकर व विकासकर अपेक्षित धरून उद्दिष्ट ९७७ कोटींचे ठेवण्यात आले होते. महापालिकेच्या तिजोरीत ७६७ कोटी जमा झाले. उर्वरित करवसुलीत महापालिकेचे कर्मचारी कमी पडले. असे असले तरी चित्र अगदीच निराशाजनक नव्हते. २०१५-१६ च्या वसुलीचा आकडा ६१७ कोटी होता. त्या तुलनेत २०१६-१७ मधील वसुलीत जवळपास १५० कोटींनी वाढ झालेली दिसून येते. संपूर्ण लक्ष्य गाठता आले नाही. मात्र, १५० कोटींची वाढ ही नाही म्हणता समाधानकारक असावी, यावरच प्रशासनाने समाधान मानले.प्रशासनाकडून अंदाज व्यक्त केले जातात. प्रस्तावित अर्थसंकल्प हा स्थायी समितीला सादर केला जातो. स्थायी समितीत त्यावर चर्चा होऊन तो अंतिम मंजुरीसाठी पुन्हा चर्चेसाठी महासभेत ठेवला जातो. तेथे चर्चेअंती त्याला महासभा मंजुरी देते. महासभेत सदस्यांनी सगळे खापर प्रशासनातील अधिकाºयांवर फोडले. त्यांच्या अनियोजनामुळे महापालिकेचे अर्थकारण फसल्याचा आरोप करत त्यांना दोषी धरले. अभ्यासपूर्ण चर्चा होऊन त्यात कमीजास्तीच्या सूचना सदस्यांकडून येणे अपेक्षित होते. मात्र, त्या आल्या नाहीत. महापालिका प्रशासनाने स्मार्ट सिटीसाठी यंदाच्या वर्षी अर्थसंकल्पात १५० कोटींची तरतूद केली होती. मात्र, प्रत्यक्ष कामास सुरुवात न झाल्याने हे १५० कोटी झालेले नाहीत. या मुद्द्याकडे डोळेझाक करून चालणार नाही.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका