शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
5
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
6
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
7
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
8
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
9
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
10
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
11
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
12
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
13
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
14
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
15
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
16
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
17
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
18
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
19
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
20
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  

बीएसयूपीच्या घरांसाठी केडीएमसीत धाव, नगरसेविकेच्या पतीला घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 4:09 AM

कल्याण-डोंबिवली महापालिकेने इंदिरानगरात बीएसयूपी योजनेतून बांधलेली घरे १४७ लाभार्थ्यांना देण्याऐवजी त्यांना अपात्र ठरवले आहे. मात्र, आधारवाडी डम्पिंग ग्राउंड येथील साठेनगरातील ४० जणांना इंदिरानगरात घरे देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेने इंदिरानगरात बीएसयूपी योजनेतून बांधलेली घरे १४७ लाभार्थ्यांना देण्याऐवजी त्यांना अपात्र ठरवले आहे. मात्र, आधारवाडी डम्पिंग ग्राउंड येथील साठेनगरातील ४० जणांना इंदिरानगरात घरे देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या १४७ जणांनी सोमवारी महापालिका मुख्यालयात धाव घेतली. तेथे शिवसेना नगरसेविकेच्या पतीला घेराव घालत घरे का दिली जात नाहीत, असा जाब विचारत गोंधळ घातला.कल्याण पश्चिमेतील इंदिरानगरात झोपडपट्टीच्या जागेवर महापालिकेने केंद्र सरकारच्या बीएसयूपी योजनेतून घरे उभारली. झोपड्या रिकाम्या करताना तेथील नागरिकांना घरे देण्याचे आश्वासन देण्यात आले. परंतु, १४७ जणांना घरे देण्याऐवजी त्यांना अपात्र ठरवले आहे. त्यामुळे ते मे महिन्यापासून घरासाठी पाठपुरावा करत आहेत. मात्र, प्रशासन त्यांच्या प्रश्नाकडे कानाडोळा करत आहे. दुसरीकडे साठेनगरातील ४० नागरिकांना घरे दिली जाणार असल्याचे समजताच अपात्र लाभार्थ्यांपैकी शेवंतीबाई शिंदे, सखूबाई चव्हाण, रवी कांबळे, इम्तियाज शेख, दीपक थोरात, अनिता कांबळे आदींनी मुख्यालयात धाव घेतली. तेथे शिवसेना नगरसेविका प्रियंका भोईर यांचे पती विद्याधर भोईर उपस्थित होते. इंदिरानगर हा विभाग प्रियंका भोईर यांच्या प्रभागात येतो. त्यामुळे संतप्त नागरिकांनी विद्याधर भोईर यांना घेराव घातला. प्रश्न सोडवता येत नसेल, तर नगरसेविका कशाला झालात, असा सवाल नागरिकांनी त्यांना केला. तसेच त्यांनी तेथे ठिय्या देण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षारक्षकांनी त्यांना रोखले.नागरिकांच्या शिष्टमंडळाने गृहप्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील जोशी यांची भेट घेतली. त्यानंतर, आयुक्त गोविंद बोडके यांना एक निवेदन सादर केले. तीन दिवसांनंतर तपासून काय ते सांगू, असे आश्वासन आयुक्तांच्या वतीने जोशी यांनी शिष्टमंडळास दिले आहे.विद्याधर भोईर यांनी सांगितले की, कागदपत्रांची पूर्तता केली जात नाही. या कारणास्तव महापालिकेने त्यांची घरे रोखली आहेत. हा विषय महासभेत उपस्थित केला होता. महापालिकेने याविषयीची अट शिथिल करावी, अशी मागणी केली होती. नगरसेविकेने त्यांच्यासाठी काहीच केले नाही, ही त्यांची ओरड चुकीची आहे.घोळ काय? : इंदिरानगरातील ३३० झोपडीधारकांचे सुभाष असोसिएटच्या या खाजगी सर्वेक्षण कंपनीने सर्वेक्षण केले होते. त्यानंतर, झोपडीधारकांना घरे देण्याचा करार करण्यात आला. झोपड्या रिकाम्या केल्यानंतर संक्रमण शिबिरात पर्यायी घरे दिली गेली. पहिल्या टप्प्यात १० हजारांचा, तर दुसऱ्या टप्प्यात पाच हजार रुपयांचा घरभाड्याचा धनादेश त्यांना दिला गेला.घरे बांधून झाल्यावर ३३० पैकी १८७ जणांना घरे दिली गेली. मात्र, १४७ जणांना ती अजूनही मिळालेली नाहीत. सर्वेक्षण करणाºया कंत्राटदारामुळे घरे मिळत नसल्याचा आरोप वंचित राहिलेल्या झोपडीधारकांनी केला. १४७ जण २००९ च्या आधीपासून तेथे राहत होते. मात्र, महापालिकेने त्यांच्याकडून त्याचा पुरावा मागितल्याने ते चक्रावून गेले आहेत.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका