शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

सफाई कामगारांचा आज संप अटळ, युनियन आंदोलनावर ठाम, सकारात्मक चर्चा झाल्याचा केडीएमसी प्रशासनाचा दावा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 06:07 IST

विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात दीड वर्षापासून पाठपुरावा सुरू असतानाही केडीएमसी प्रशासनाने त्यांची पूर्तता करण्याच्या अनुषंगाने कोणतीही कार्यवाही होत नसल्याच्या निषेधार्थ अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेने शुक्रवारी कामबंद आंदोलनाची हाक दिली आहे.

कल्याण : विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात दीड वर्षापासून पाठपुरावा सुरू असतानाही केडीएमसी प्रशासनाने त्यांची पूर्तता करण्याच्या अनुषंगाने कोणतीही कार्यवाही होत नसल्याच्या निषेधार्थ अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेने शुक्रवारी कामबंद आंदोलनाची हाक दिली आहे.संपाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी महापालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीत ठोस आश्वासन न मिळाल्याने संप अटळ असल्याचे संघटनेने जाहीर केले आहे, तर सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विजय पगार यांनी केला आहे.महापालिकेत २७ गावांचे मिळून २ हजार ७०० सफाई कामगार आहेत. दीड वर्षापासून त्यांच्या मागण्या प्रलंबित आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही त्यांची पूर्तता झालेली नाही. महापालिका प्रशासनाकडून सुरू असलेल्या झुलवाझुलवी व दप्तरदिरंगाईप्रकरणी कामबंद आंदोलनाची हाक सफाई कर्मचारी संघटनेने दिली आहे. शुक्रवारी सकाळी ९ वाजता कल्याण पश्चिमेकडील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ सर्व कामगारांना एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.दरम्यान, गुरुवारी महापालिका सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त पगार यांच्यासमवेत डॉ. रेखा बहनवाल आणि प्रभाकर घिंगट या संघटनेच्या पदाधिकाºयांसमवेत बैठक झाली. यात प्रलंबित मागण्यांवर झालेल्या चर्चेदरम्यान समाधानकारक उत्तरे न दिली गेल्याने संप अटळ असल्याची घोषणा संघटनेने केली आहे. परंतु, चर्चा सकारात्मक झाल्याचा दावा उपायुक्त पगार यांनी केला आहे.यासंदर्भात ‘लोकमत’ने संघटनेचे संस्थापक राज्य अध्यक्ष नागेज कंडारे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, चर्चा झाली परंतु, मागण्या कधी पूर्ण करणार, यासाठी ठरावीक कालमर्यादा देण्यात आलेली नाही. त्यामुळे आम्ही आमच्या संपाच्या भूमिकेवर ठाम आहोत, असे त्यांनी सांगितले.कंत्राट पद्धत बंद करा, १२ वर्षांच्या फरकासह थकबाकी द्या२७ गावांतील कर्मचाºयांना किमान वेतन व सुविधा अधिसूचनेच्या दिनांकापासूनच्या फरकासह लागू करणे, लोकसंख्येच्या आधारे सरळसेवेने कामगार भरती, ठेकेदारी, कंत्राट पद्धत बंद करणे, ओबीसी कामगारांना वारसा हक्क मिळावा, अशी सरकारकडे शिफारस करावी, ३० दिवसांत वारसा हक्क, फंड, ग्रॅच्युइटी, शिल्लक रजा व इतर नैसर्गिक लाभ मिळावा, सफाई कामगाराला घर, पाणी आणि वीज या नागरी सुविधा उपलब्ध करून देणे, कामगारांना कुटुंबासह पाच लाखांचा वैद्यकीय विमा लागू करणे किंवा मासिक ५ हजार रुपये आरोग्यभत्ता देणे, आॅन ड्युटी अपघाती विमा १० लाख रुपये मंजूर करणे, १९९६-९७ ला भरती झालेल्या सर्व कामगारांना १२ वर्षांच्या फरकासह थकबाकी द्यावी, सफाई कामगारांची बायोमेट्रीक हजेरी बंद करावी, प्रत्येक हजेरीशेड भंगारमुक्तकरून सुविधायुक्त बनवावे, यासह अन्य प्रलंबित मागण्यांप्रकरणी संपाची हाक देण्यात आली आहे.